पुढे बोलताना श्री.जगताप म्हणाले कि वास्तविक पहाता मा.राहुलजी गांधी यांची वाढती लोकप्रियता पहाता भा.ज.पा. सरकारच्या पायाखालची वाळु सरकली आहे आणि म्हणुनच अशी कट कारस्थाने रचण्याचा डाव भा.ज.पा.अनेक वर्षापासुन करत आहे. यातुन लोकशाही संपवण्याचा हेतु हा भा.ज.पा.सरकारचा आहे हे स्पष्ट होते. भारत जोडो यात्रेमुळे भा.ज.पा.विरोधी देशातील सर्व छोटे – मोठे पक्ष एकत्रित येत असुन देशातील सामान्य जनता हि भक्कमपणे काँग्रेस पक्षाच्या पाठीशी उभी रहात आहे. मा.राहुलजी गांधी यांना नक्कीच न्यायदेवतेकडुन न्याय मिळेल असा ठाम विश्वासही श्री.जगताप यांनी शेवटी व्यक्त केला. भा.ज.पा.सरकारच्या निषेधाचे पत्र आज नायब तहशिलदार मा.जाधवसाहेब यांना देण्यात आले.यावेळी ओ.बी.सी.विभागाचे तालुकाध्यक्ष गफुरभाई शेख, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सुजय जगताप,तालुका उपाध्यक्ष अशोक घरबुडे व आनंद झोळ,बबलु चिंचकर,योगेश राखुंडे,निखिल शिंदे,गितेश लोकरे, गणेश फलफले, नितीन चोपडे,बालाजी पवार,विकी महानवर आदी पदिधिकारी उपस्थित होते.
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील सिध्दार्थनगर परिसरात घडलेल्या घरफोडी प्रकरणाचा करमाळा पोलिसांनी अल्पावधीत छडा लावत तीन…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा, प्रतिनिधी : शहरातील नागरिकांना स्वच्छ व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या सामाजिक बांधिलकीतून…
करमाळा प्रतिनिधी शिवसेना श्रमिक राष्ट्रीय कामगार सेना सोलापूर जिल्हाध्यक्ष अमोल जाधव यांच्या 31 मार्च रोजी…
करमाळा प्रतिनिधी अक्कलकोट तालुक्यातील खैराट जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका रेखा सोनकवडे यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांनी अत्यंत…
करमाळा प्रतिनिधी हनुमान जयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळ, सावंत गल्ली यांच्या वतीने गुरुवार…