करमाळा प्रतिनिधी – देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांनी 99 व्या मन की बात कार्यक्रमातून देशाला संबोधित केले, या कार्यक्रमाचे नियोजन भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा तालुक्यातील वीट, मोरवड, पिंपळवाडी, रोशेवाडी, हिवरवाडी, देवळाली, खडकेवाडी, गुरसळी, मिरगव्हाण, अर्जुननगर , हिसरे, हिवरे, कोळगाव, निमगाव ह, गौंडरे,
शेलगाव क, सौंदे, विहाळ, वंजारवाडी, करंजे, भालेवाडी, बिटरगाव श्री ,जातेगाव, केम, शेलगाव वांगी, कुंभारगाव आदी ठिकाणी कार्यक्रम संपन्न झाले,.
या मन की बात कार्यक्रमातून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागालँड येथे 75 वर्षानंतर प्रथमच दोन महिला विधानसभा सदस्य म्हणून निवडणूक जिंकून स्त्री शक्तीची ताकद दाखवली त्याबद्दल अभिनंदन केले,
2013 साली देशात अवयवदान करणाऱ्यांची संख्या 5000 होती तर 2022 साली ही संख्या 15000 झाली आहे या सर्व परिवारांचे मोदी यांनी आभार मानले, तसेच देशाला प्रगती पथावर नेण्यासाठी सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करावा व शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यासाठी प्रयत्न करावे असे सांगितले,
हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, शक्ती केंद्रप्रमुख, बूथ प्रमुख व कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले ,
करमाळा, प्रतिनिधी : करमाळा येथील श्री संत नामदेव शिंपी समाजाच्या वतीने श्रीसंत नामदेव शिंपी महाराज…
करमाळा प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसचे करमाळा तालुकाध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य भरत (भाऊ) आवताडे यांच्या…
* करमाळा, प्रतिनिधी : करमाळा शहरातील शाहूनगर परिसरातील नागरिकांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या पाणीप्रश्नाच्या निराकरणाच्या दिशेने…
करमाळा (प्रतिनिधी) – करमाळा येथील ग्रामदैवत श्रीजगदंबा कमलादेवी मंदिराच्या जतन व संवर्धनाच्या कामाला भाविकांचा उत्स्फूर्त…
करमाळा प्रतिनिधी : संजय गांधी निराधार योजनेची प्रकरणे मार्च महिन्यामध्ये मंजूर झाली होती त्यानंतर चार…
करमाळा प्रतिनिधी भाषा ही केवळ परीक्षेतील गुणांची बाब नसून विद्यार्थ्यांच्या विचारांना आकार देणारे आणि जगाशी…