करमाळा प्रतिनिधी करमाळा मंडळ अंतर्गत (आताचे पोथरे मंडळ) असलेल्या गावातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या नुकसानीची भरपाई द्या,’ अशी मागणी पोथरे येथील शेतकऱ्यांनी तहसीलदार समीर माने यांच्याकडे केली आहे. नायब तहसीलदार विजयकुमार जाधव यांनी हे निवेदन स्वीकारले. मंगळवारी (ता. २८) हे निवेदन देण्यात आले आहे.या निवेदनावर बळीराजादलचे हरिभाऊ हिरडे, शिवरत्न मित्रमंडळाचे अध्यक्ष हरिश्चंद्र झिंजाडे, रघुवीर जाधव, आबासाहेब झिंजाडे, ज्ञानदेव नायकोडे, बाळासाहेब खराडे आदींसह २५ शेतकऱ्यांच्या सह्या आहेत. निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, अतिवृष्टीमुळे करमाळा मंडळातील गावांमध्ये प्रचंड नुकसान झाले. मात्र आता आलेल्या मदतीमध्ये या मंडळाचा समावेश झालेला नाही. अतिवृष्टी धारक पीडित शेतकऱ्यांना मदत मिळत नाही. त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. नुकसान भरपाई मिळावी म्हणून पाऊस झाला तेव्हा पिकांचे पंचनामे करण्यात आले होते. तरीही मदत मिळत नसेल तर दुर्दैवी बाब असल्याचे म्हटले आहे.
करमाळा प्रतिनिधी श्रीदेवीचा माळ येथील श्री जगदंबा कमलादेवी मंदिरात सहस्र श्री दुर्गा सप्तशती पाठ सेवेचे…
करमाळा प्रतिनिधी करमाळा–कुर्डूवाडी–नेरले मार्गावर सुरू असलेली एसटी बससेवा अचानक बंद झाल्याने नेरले परिसरातील नागरिक, विद्यार्थी…
करमाळा प्रतिनिधी : कमला भवानी बहुउद्देशीय संस्था, करमाळा यांच्या वतीने पं. के. एन. बोळंगे…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील बसस्थानक परिसरात प्रवाशाच्या पर्समधून चोरीस गेलेल्या सुमारे १० लाख ५ हजार…
करमाळा प्रतिनिधी सात मिनिटांत 100 गणिते सोडविण्याच्या स्पर्धेत विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी; प्रथम ते सहाव्या…
करमाळा प्रतिनिधी श्रावण महिना हा भगवान महादेवाच्या भक्तीचा आणि उपासनेचा महिना मानला जातो. या पवित्र…