संजय साखरे प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या साहित्य क्षेत्रातील अग्रगण्य नाव असलेले लोकशाहीर साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांचे 2020 हे जन्मशताब्दी वर्ष आहे. साहित्य व समाजकारणात आण्णाभाऊ साठे यांचे विशेष व उल्लेखनीय योगदान आहे .मागास समाजातून पुढे आलेल्या आण्णाभाऊ यांनी वंचित समाजाच्या व्यथा व वेदना आपल्या साहित्य व शाहिरी कृतीतून अतिशय परिणामकारक मांडलेल्या आहेत .त्याचबरोबर त्यांचे सामाजिक कार्य देखील मोलाचे आहे . म्हणूनच अशा या थोर समाजसुधारकाला भारतातील सर्वोच्च अशा भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे अशी मागणी करमाळ्याचे आमदार श्री संजयमामा विठ्ठलराव शिंदे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे केली आहे.
साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना केंद्र सरकारकडून भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा यासाठी महाराष्ट्र शासनाकडून शिफारस करण्यात यावी असे त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
* करमाळा : प्रतिनिधी आरोग्यसेवा ही समाजसेवेचा महत्त्वाचा भाग असून, सर्वसामान्य नागरिकांना वेळेवर तज्ज्ञ वैद्यकीय…
करमाळा प्रतिनिधी पवार जनरल हॉस्पिटल यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेले विशेष आरोग्य शिबिर नागरिकांच्या उत्स्फूर्त…
करमाळा : प्रतिनिधी — करमाळा शहरातील कै. नामदेवराव जगताप नगरपालिका उर्दू शाळेतील विद्यार्थिनींनी शिष्यवृत्ती परीक्षेत…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील बैलगाडा शर्यतींच्या शौकीनांसाठी यंदा मोठी पर्वणी आहे. स्व. अजितदादा पवार यांच्या…
करमाळा प्रतिनिधी श्रीदेवीचा माळ येथील श्री जगदंबा कमलादेवी मंदिरात सहस्र श्री दुर्गा सप्तशती पाठ सेवेचे…
करमाळा प्रतिनिधी करमाळा–कुर्डूवाडी–नेरले मार्गावर सुरू असलेली एसटी बससेवा अचानक बंद झाल्याने नेरले परिसरातील नागरिक, विद्यार्थी…