करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील दोन सहकारी संस्था मकाई आणि आदिनाथ सहकारी साखर कारख्यान्याच्या निवडणुकीचा धुराळा उडणार असुन, विद्यमान चेअरमन धनंजय डोंगरे यांनी लवकरच निवडणुक होणेबाबत संकेत दिले असुन, त्यासाठीची आवश्यक रककम भरणा केलेचे वक्तव्य केलेले आहे. तर एकीकडे दत्तकलेचे संस्थापक असणारे प्रा. रामदास झोळ यांनी बचाव चा नारा देऊन जागृती चालु केली आहे. त्यांचे समवेत बचावची काही नेतेमंडळीही नुकतीच एका बैठकीत दिसुन आलेले आसुन, आदिनाथ कारखान्याची निवडणुक बिनविरोध करावी म्हणुनही वल्गना होत आहेत.. याविषयी केत्तुरचे माजी सरपंच व पश्चिम भागातील जाणकार व अभ्यासु युवक नेते ॲॅड. अजित विघ्ने यांना या सर्व पार्श्वभुमी बाबत मत विचारले असता, त्यांनी सांगितले की, आदिनाथ व मकाई साखर कारखान्यांना वाचवायचे असेल तर त्यासाठी शेतकरी सभासदांनी एक होवुन सर्वसामान्य लोकांनी कारखान्याच्या निवडणुकीत उतरून बचावसाठी एकत्र यायला पाहीजे तरच शेतकरी सभासदांचे भले होईल.. फक्त बचाव आणि हटाव म्हणुन भागणार नाही तर आपले कारखाने वाचावेत ही प्रेरणा प्रत्येकाच्या मनात उत्पन्न झाली पाहीजे.. अन्यथा कारखान्यांचे आणि पर्यायाने शेतकरी, कामगार यांचे वाटोळे निश्चित आहे. तालुक्यात नवी जुनी अनेक मंडळी निवडणुकीसाठी नटलेली असुन, बचाव चे नाटक यापुर्वीही अनेक निवडणुकात झालेले आहे. ज्यांना कारखाने व्यवस्थित चालवायचे नाहीत त्यांनी निवडणुकीत उभा राहण्याचे पापही करू नये. तसेच निवडणुकीत अनेक गटातटाचे पॅनल होतील आणि मग नवे जुने पुढारी आपआपल्या पॅनलमधुन उमेदवारी घेतील.. बचाव बचाव म्हणुन पुळकाही आणतील परंतु अशा लबाड आणि ढोंगी पुढाऱ्यांना वेळीच दुर करावे.. तीच तीच माणसे आपले उदयोगधंदे सोडुन या निवडणुकांमधे येत आहेत त्या सर्वांना नाकारावे आणि नवीन दमाच्या आणि होतकरू अशा शेतकऱ्यांच्या पोरांनी पुढे येऊन आदिनाथ आणि मकाई कारखान्याची निवडणुक लढवावी असे आपले स्पष्ट मत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. शेजारीच असणारे खाजगी कारखाने बारामती अॅग्रो, अंबालिका, दौंड , नवीन हळगाव, विठ्ठल यांनी गाळप क्षमता वाढवली असुन भविष्यात ऊस दराची स्पर्धा होणार असुन, ऊस मिळविण्याची देखिल स्पर्धा लागणार आहे. त्यामुळे या स्पर्धेत टिकण्यासठी सक्षम नेतृत्वाची गरज आहे व सक्षम संचालक मंडळाची गरज आहे. त्यासाठी आता सर्वसामान्य शेतकरी सभासंदानी स्वतःहुन पुढे आले पाहीजे. अन्यथा पहीले पाढे पंच्चावन झालेच म्हणुन समजा. बचाव हा प्रत्येकाच्या मनात असायला पाहीजे. काही लोकांनी बचावचे दिलेले नारे कितपत खरे आहेत ते आगामी काळात दिसणारच असुन, सर्वसामान्य शेतकरी सभासदांना या निवडणुकीत उमेदवारी देण्यासाठी आपण आमदार. संजयमामा शिंदे व माजी आमदार. जयवंतराव जगताप साहेब यांना बोलणार असल्याचे देखिल या निमित्ताने त्यांनी सांगितले.
करमाळा प्रतिनिधी: अखंड हिंदुस्तानचे दैवत म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त करमाळा शहरात…
करमाळा प्रतिनिधी: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात…
करमाळा प्रतिनिधी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी आपण…
* करमाळा प्रतिनिधी डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे संस्थापक महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री. राजा माने…
करमाळा प्रतिनिधी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांचे वडील, कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे…
करमाळा प्रतिनिधी: विद्या विकास मंडळचे अध्यक्ष तथा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांशी संबंधित नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालयाचे…