करमाळा प्रतिनिधी अवकाळी पावसाचा तडाखा बसुन अचानक झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे देवळाली परिसरातील काही घरावरील पत्रे उडाले व शेतीचे भरपूर प्रमाणात नुकसान झाले त्यामध्ये केळी,ऊस आंबा,लिंबू यांसारख्या फळबागांचे नुकसान झाले त्याचबरोबर देवळाली गावातील श्री मारूती शंकर बिचितकर यांची झाड पडून गाई दगावली सदर नुकसानीची दखल मा.सरपंच आशिष अण्णा गायकवाड यांनी घेतली व लगेच प्रशासनाला फोन वरून संपर्क साधला व सदर नुकसानीचे पंचनामे त्वरित करण्यात यावे असे सांगितले त्याचबरोबर मा.सरपंच यांनी करमाळा तालुक्याचे कर्तव्यदक्ष आमदार श्री संजयमामा शिंदे यांना संपर्क साधला त्यांनीही प्रशासनाला आदेशित केले त्यानंतर मा.तहसीलदार श्री विजयकुमार जाधव साहेब यांनी मंडल अधिकारी, तलाठी भाऊसाहेबव कृषी सहायक यांना सदर नुकसानीची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे सांगितले संबंधित घटनेचे पंचनामे न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मा.सरपंच आशिष अण्णा गायकवाड यांनी दिला आहे.
करमाळा (प्रतिनिधी) – करमाळा येथील ग्रामदैवत श्रीजगदंबा कमलादेवी मंदिराच्या जतन व संवर्धनाच्या कामाला भाविकांचा उत्स्फूर्त…
करमाळा प्रतिनिधी : संजय गांधी निराधार योजनेची प्रकरणे मार्च महिन्यामध्ये मंजूर झाली होती त्यानंतर चार…
करमाळा प्रतिनिधी भाषा ही केवळ परीक्षेतील गुणांची बाब नसून विद्यार्थ्यांच्या विचारांना आकार देणारे आणि जगाशी…
करमाळा प्रतिनिधी - मानव एकता दिनानिमित्त संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन दिल्ली शाखा करमाळा यांचे वतीने…
करमाळा प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.…
करमाळा प्रतिनिधी दिग्वीजय बागल यांची ' मूख्यमंत्री बळीराजा पाणंद/ शेत रस्ता समिती च्या करमाळा विधानसभा…