करमाळा प्रतिनिधी अवकाळी पावसाचा तडाखा बसुन अचानक झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे देवळाली परिसरातील काही घरावरील पत्रे उडाले व शेतीचे भरपूर प्रमाणात नुकसान झाले त्यामध्ये केळी,ऊस आंबा,लिंबू यांसारख्या फळबागांचे नुकसान झाले त्याचबरोबर देवळाली गावातील श्री मारूती शंकर बिचितकर यांची झाड पडून गाई दगावली सदर नुकसानीची दखल मा.सरपंच आशिष अण्णा गायकवाड यांनी घेतली व लगेच प्रशासनाला फोन वरून संपर्क साधला व सदर नुकसानीचे पंचनामे त्वरित करण्यात यावे असे सांगितले त्याचबरोबर मा.सरपंच यांनी करमाळा तालुक्याचे कर्तव्यदक्ष आमदार श्री संजयमामा शिंदे यांना संपर्क साधला त्यांनीही प्रशासनाला आदेशित केले त्यानंतर मा.तहसीलदार श्री विजयकुमार जाधव साहेब यांनी मंडल अधिकारी, तलाठी भाऊसाहेबव कृषी सहायक यांना सदर नुकसानीची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे सांगितले संबंधित घटनेचे पंचनामे न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मा.सरपंच आशिष अण्णा गायकवाड यांनी दिला आहे.
करमाळा प्रतिनिधी इंटरनेट केबल टाकण्यासाठी मुंबई येथील एका खासगी कंपनीकडून करमाळा तालुक्यात नियमबाह्य व बेकायदेशीर…
करमाळा / प्रतिनिधी करमाळा, येथील एकलव्य प्राथमिक आश्रमशाळेत निवासी विद्यार्थ्यांसाठी बंक बेडची व्यवस्था करण्यात आली…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात सुरू असलेल्या हनुमान चालीसा पठण उपक्रमाने सलग 151 आठवड्यांचा टप्पा यशस्वीरित्या…
आदरणीय प्रा. रामदास झोळ सरांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!काही माणसं आयुष्यात फक्त भेटत नाहीत… तर आयुष्य…
करमाळा (प्रतिनिधी) – ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शालेय प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या शासकीय दाखल्यांसाठी होणारी गैरसोय…
करमाळा प्रतिनिधी. करमाळा विधानसभा मतदारसंघात सखोल मतदार पुनर्निरीक्षण (SIR) कार्यक्रम अंतर्गत मतदार यादी अचूक करण्यासाठी…