करमाळा प्रतिनिधी देशात राज्यात सध्या सत्ता परिवर्तनाची सुरुवात झाली असून काॅंग्रेस पक्षाला चांगले दिवस आल्याने बदलाची सुरूवात कसब्यातुन सुरु झाली असुन कर्नाटक राज्यात काँग्रेसन एक हाती सत्ता मिळवली आहे येत्या 2024 ला काँग्रेस मित्र पक्षाचे सरकार केंद्रात येणार असल्याचे मत काँग्रेस करमाळ्याचे तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप यांनी व्यक्त केले . कर्नाटक राज्यामध्ये काँग्रेसने एखादी सत्ता मिळून भाजपचा जोरदार पराभव केला आहे.कर्नाटक राज्यामध्ये काँग्रेसने मिळवलेल्या यशाबद्दल करमाळा काँग्रेस आयच्या वतीने फटाकेची आतिशबाजी करून एकमेकांना पेढे भरवत नागरिकांना पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे काँग्रेसचे शहराध्यक्ष सुजय जगताप सरचिटणीस संभाजी शिंदे नितीन चोपडे गणेश फलफले नागेश राखुंडे यतीन माने,खलील बागवान, बबलू चिंचकर यांच्यासह कार्यकर्त पदाधिकारी उपस्थित होते.देशात सध्या भाजपाविषयी प्रचंड चीड आहे भाजप सरकार हे घोषणांचे सरकार असून सर्वसामान्य जनतेला महागाईच्या लोटण्याचे काम या सरकारने केलेले आहे शेतकरी सर्वसामान्य जनता वाढती महागाई मराठा आरक्षणाचे प्रश्न ओबीसी वर्ग यांचे प्रश्न या सर्व प्रश्नांची उत्तरे या सरकारकडे नाहीत त्यामुळे संपूर्ण देशामध्ये काँग्रेसला वाढता जनाधार मिळत असून बदलाची वारी संपूर्ण देशभर पाहणार असल्याचे चित्र सध्या दिसत असून बदलाची सुरुवात कसबा पुणे येथून झाले असून याच्या 2024 आघाडीचे सरकार राज्यात तसेच केंद्रातही काँग्रेसला बहुमत मिळणार असल्याचे चित्र सध्या कर्नाटक राज्यात मिळालेल्या यशामुळे दिसत आहे.
करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…
करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…
करमाळा प्रतिनिधी — गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव म्हणून साजरा न करता त्याला सामाजिक बांधिलकीची…
करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…
* करमाळा प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…
करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…