करमाळा प्रतिनिधी मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये आम्ही सर्व उमेदवाराचे अर्ज अटी शर्तीची पूर्तता करून अर्ज दाखल केले असताना आमचे अर्ज अपात्र झालेले असुन ते अर्ज नक्कीच मंजूर होतील असे मत मकाई बचाव समितीचे प्रमुख प्राध्यापक रामदास झोळ सर यांनी व्यक्त केले. बारा बंगले करमाळा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते या पत्रकार परिषदेला आदिनाथचे माजी अध्यक्ष वामनराव बदे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रवींद्र गोडगे अमोल घुमरे उपस्थित होते.यावेळी पुढे बोलताना प्राध्यापक रामदास झोळ सर म्हणाले की तीन वर्षे सलग ऊस घालण्याचा मुद्दा चुकीचा असून इतर साखर कारखान्याने 79 बी नुसार ऊस घालणे बंधनकारक नसल्याचा नियम असताना घटनेत कारखान्याचे उपविधीमध्ये बदल न केल्यामुळे अर्ज अपात्र ठरले आहे.काल झालेल्या सुनावणीमध्ये आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये संत शिरोमणीमध्ये असे असतानाही सर्व अर्ज मंजूर केले आहेत त्यामुळे आमचेही अर्ज मंजूर होतील प्रादेशिक सहसंचालक यांच्याकडे अर्ज मंजूर होऊन आम्हास नक्की न्याय मिळेल याबाबत आम्हाला अपेक्षेनुसार न्याय मिळाला नाही तर उच्च न्यायालयात आम्ही जाणार असल्याचे प्राध्यापक रामदास झोळ सर यांनी सांगितले.
करमाळा, प्रतिनिधी : करमाळा येथील श्री संत नामदेव शिंपी समाजाच्या वतीने श्रीसंत नामदेव शिंपी महाराज…
करमाळा प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसचे करमाळा तालुकाध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य भरत (भाऊ) आवताडे यांच्या…
* करमाळा, प्रतिनिधी : करमाळा शहरातील शाहूनगर परिसरातील नागरिकांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या पाणीप्रश्नाच्या निराकरणाच्या दिशेने…
करमाळा (प्रतिनिधी) – करमाळा येथील ग्रामदैवत श्रीजगदंबा कमलादेवी मंदिराच्या जतन व संवर्धनाच्या कामाला भाविकांचा उत्स्फूर्त…
करमाळा प्रतिनिधी : संजय गांधी निराधार योजनेची प्रकरणे मार्च महिन्यामध्ये मंजूर झाली होती त्यानंतर चार…
करमाळा प्रतिनिधी भाषा ही केवळ परीक्षेतील गुणांची बाब नसून विद्यार्थ्यांच्या विचारांना आकार देणारे आणि जगाशी…