करमाळा प्रतिनिधी रविवार दिनांक ४ जून रोजी वादळी वारा व वीजेच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे करमाळा तालुक्यातील केळीच्या बागा अक्षरशः जमीनदोस्त होवून शेतकर्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे . तरी नुकसान झालेल्या भागातील केळीच्या बागांचे त्वरीत पंचनामे करून शेतकर्यांना आर्थिक मदत मिळावी अशी मागणी भाजपाचे युवानेते तथा करमाळा तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष शंभूराजे जयवंतराव जगताप यांनी राज्याचे महसूल मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांचेकडे लेखी निवेदनाव्दारे केली आहे . तसेच मौजे गुळसडी येथे वादळी वाऱ्याच्या तडाख्यात वीज कोसळून पती व मुलादेखत कमल अडसूळ हि महिला मृत्युमुखी पडली .त्यांच्या कुटुंबियांना शासनाकडून आर्थिक मदत मिळण्याची मागणी देखील जगताप यांनी निवेदनाव्दारे केली आहे . निवेदनाच्या प्रती उचित कार्यवाही साठी आमदार संजयमामा शिंदे , जिल्हाधिकारी सोलापूर व तहसीलदार करमाळा यांना दिलेल्या आहेत .
आदरणीय प्रा. रामदास झोळ सरांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!काही माणसं आयुष्यात फक्त भेटत नाहीत… तर आयुष्य…
करमाळा (प्रतिनिधी) – ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शालेय प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या शासकीय दाखल्यांसाठी होणारी गैरसोय…
करमाळा प्रतिनिधी. करमाळा विधानसभा मतदारसंघात सखोल मतदार पुनर्निरीक्षण (SIR) कार्यक्रम अंतर्गत मतदार यादी अचूक करण्यासाठी…
* करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील भागवत कथा ज्ञानयज्ञ समिती व संत गजानन महाराज मंदिर समिती…
सोलापूर प्रतिनिधी शासनाच्या पगारी घेणाऱ्या सर्व शिक्षकांनी नेमणुकीच्या ठिकाणी राहणे अपेक्षित आहे असे होत नाही…
करमाळा प्रतिनिधी शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील नामांकित 'नामसाधना मॉडर्न स्कूल'…