करमाळा प्रतिनिधी मकाई निवडणुकीत अपात्र ठरवण्यात आलेल्या १४ उमेदवारांनी दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल आला असून यामध्ये आम्हाला दिलासा मिळाला आहे. उच्च न्यायालयामध्ये मी दाखल केलेल्या रीट याचिकांवरती माननीय न्यायाधीश यांनी असे आदेश पारित केलेले आहेत की रिटर्निंग ऑफिसरने ज्या कारणाने अर्ज नामंजूर केलेले आहेत त्या कारणाविषयी अर्जदाराला कारखान्याच्या उपविधी प्रमाणे त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी दिली नाही.तसेच याबाबत अर्जदारांनी रिटर्निंग ऑफिसर च्या समोर ९ जुन रोजी सकाळी अकरा वाजता उपस्थित राहून आपले म्हणणे मांडण्याची संधी दिलेली आहे. त्याचबरोबर संबंधित रिटर्निंग ऑफिसरने सुधारित आदेश पारित करावेत असेही आदेश दिले आहेत आणि त्या सुधारित आदेशानुसार पुढची कार्यवाही करावी असे सांगितले आहे. त्याचबरोबर जर आम्हाला रिटर्निंग ऑफिसर चे म्हणणे मान्य नसेल तर पुढील प्रक्रियेसाठी आम्हाला पुन्हा संधी उच्च न्यायालयाने आम्हाला दिलेली आहे.
त्याचबरोबर जर आम्हाला रिटर्निंग ऑफिसरचे म्हणणे मान्य नसेल तर पुढील प्रक्रियेसाठी आम्हाला पुन्हा संधी उच्च न्यायालयाने दिलेली आहे, असे प्रा. रामदास झोळ यांनी सांगितले आहे.
करमाळा प्रतिनिधी: अखंड हिंदुस्तानचे दैवत म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त करमाळा शहरात…
करमाळा प्रतिनिधी: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात…
करमाळा प्रतिनिधी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी आपण…
* करमाळा प्रतिनिधी डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे संस्थापक महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री. राजा माने…
करमाळा प्रतिनिधी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांचे वडील, कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे…
करमाळा प्रतिनिधी: विद्या विकास मंडळचे अध्यक्ष तथा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांशी संबंधित नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालयाचे…