करमाळा प्रतिनिधी
सीना कोळगाव प्रकल्पा मध्ये अत्यल्प प्रमाणात पाणी साठा राहीला आहे.पाणी पातळी डेड स्टॉक मध्ये गेली आहे.परंतू वारीच्या नावाखाली पाणी सोडण्याचा घाट काही जणांकडून घालण्यात आला आहे.जर सीना कोळगाव धरणातून वारीच्या नावाखाली पाणी सोडले तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सीना कोळगाव धरणग्रस्त समितीचे अध्यक्ष मकाई सहकारी साखर कारखाना संचालक सतीश नीळ यांनी कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग धाराशिव यांना निवेदनाद्वारे दिला आहे.सदर निवेदनात म्हटले आहे कि धरणग्रस्त बांधवांनी घरे,जमीनी धरणासाठी देऊन त्याग केला आहे.जून संपत आला तरी पाऊस पडला नाही पाण्या अभावी उभी पिके अगोदरच जळून गेली आहेत. पाणी पातळी खालावल्याने केबल. पाईप वाढवावे लागत आहेत. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. करमाळा तालुक्यातील मिरगव्हाण, हिवरे, हिसरे, कोळगाव, निमगाव (ह) आवाटी व परंडा तालुक्यातील डोंजा, कौडगाव व परिसरातील सर्व शेतकरी अगोदरच मेटाकुटीला आला आहे. विनाकारण कोणी तरी वारीच्या नावाखाली पाणी मागत असेल तर ते आम्ही धरणग्रस्त शेतकरी सहन करणार नाही.तरीही पाणी सोडल्यास आम्हा धरणग्रस्त संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल असे नीळ यांनी म्हटले आहे.सदर निवेदनाच्या प्रति पोलिस निरीक्षक करमाळा परांडा.तहसीलदार करमाळा यांना देण्यात आल्या आहेत.
करमाळा, प्रतिनिधी : करमाळा येथील श्री संत नामदेव शिंपी समाजाच्या वतीने श्रीसंत नामदेव शिंपी महाराज…
करमाळा प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसचे करमाळा तालुकाध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य भरत (भाऊ) आवताडे यांच्या…
* करमाळा, प्रतिनिधी : करमाळा शहरातील शाहूनगर परिसरातील नागरिकांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या पाणीप्रश्नाच्या निराकरणाच्या दिशेने…
करमाळा (प्रतिनिधी) – करमाळा येथील ग्रामदैवत श्रीजगदंबा कमलादेवी मंदिराच्या जतन व संवर्धनाच्या कामाला भाविकांचा उत्स्फूर्त…
करमाळा प्रतिनिधी : संजय गांधी निराधार योजनेची प्रकरणे मार्च महिन्यामध्ये मंजूर झाली होती त्यानंतर चार…
करमाळा प्रतिनिधी भाषा ही केवळ परीक्षेतील गुणांची बाब नसून विद्यार्थ्यांच्या विचारांना आकार देणारे आणि जगाशी…