Categories: करमाळा

पंढरपूर म्हणजे दक्षिण काशी गोरगरिबांना गरजेच्या .अशा सोलापूर जिल्हा निगडीत पूर्वीच्या सर्व रेल्वेगाड्या पूर्ववत सुरू करा- माजी आमदार नारायण पाटील

करमाळा प्रतिनिधी पंढरपूर म्हणजे दक्षिण काशी होय, गरीबांना गरजेच्या अशा सोलापूर जिल्ह्याशी निगडीत पुर्वीच्या सर्व रेल्वे गाड्या पूर्ववत सुरू करा अशी मागणी माजी आमदार नारायण पाटील यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या कडे एका निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत सविस्तर माहिती देताना पाटील यांनी सांगितले की कोरोना कालावधी अगोदर गरीबांना प्रवास करण्याची सोय म्हणून अनेक पॅसेंजर गाड्या तसेच मध्यमवर्गीय प्रवाशासही तिकीट खर्च परवडेल अशा एक्सप्रेस गाड्या चालू होत्या. परंतु अलिकडील काही महिन्यांपासून ह्यातील अनेक गाड्या बंद करण्यात आल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यातील अनेक रेल्वे स्थानकावरील थांबे काढून टाकण्यात आले आहेत. ज्या गाड्या धावत आहेत त्यांचे जनरलचे डब्बे कमी करुन एसी डब्बे वाढवण्यात आले आहेत. यामुळे आता गरीब प्रवाशास रेल्वे प्रवास करणे अशक्य झाले आहे. सोलापूर जिल्ह्यातील विजापुर-मुंबई पॅसेंजर, पंढरपूर-शिर्डी एक्सप्रेस यासह काही गाड्या बंद करण्यात आल्या.वास्तविक पाहता पंढरपूर तीर्थक्षेत्राची दक्षिण काशी म्हणून ओळख आहे. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ तसेच सोलापूर शहरानजीक श्रीक्षेत्र तुळजापूर येथे वर्षभर भाविकांची गर्दी असते. अनेक मोठ्या शहरातुन व अनेक राज्यातुन भाविकभक्तगण येथे दर्शनासाठी येतात. पाठीमागील काळात रेल्वे हे या प्रवाशांचे दळणवळणाचे प्रमुख साधन होते. यामुळे सोलापूर जिल्ह्यातीतुन धावणाऱ्या सर्व फास्ट पॅसेंजर गाड्या पुर्ववत सुरु कराव्यात. तसेच या गाड्यासाठी व सध्या धावत असलेल्या गाड्यासाठी रेल्वे वेळापत्रकातून वगळलेल्या पुर्वी मान्यता असलेल्या सर्व रेल्वे स्टेशनसाठी थांबा देण्याचे नियोजन केले जावे. सोलापूर -पुणे-मुंबई या दरम्यान लोकल रेल्वे सेवा सुरु करण्यात यावी. सोलापूर जिल्ह्यातील व्यापार, उद्योग,शिक्षण,आरोग्य,पर्यटन कृषी यावर सदर रेल्वे बंद असल्याने परिणाम होत आहे. सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी,जेष्ठ नागरिक, छोटे व्यावसायिक, व्यापारी, नोकरदार, रुग्ण, महिला,शेतकरी आदि सर्व घटकांची दळणवळण गैरसोय टाळण्यासाठी पुर्वीच्या रेल्वे गाड्या तातडीने सुरु करण्यात याव्यात अशी मागणी आपण या निवेदनातुन केली असल्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले.तसेच या निवेदनाची प्रत रेल्वे बोर्डाचे सीईओ अनिलकुमार लाहोटी यांनाही पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

अखंड हिंदुस्तानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त १९ फेब्रुवारीला करमाळ्यात भव्य रक्तदान शिबीर

करमाळा प्रतिनिधी: अखंड हिंदुस्तानचे दैवत म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त करमाळा शहरात…

2 hours ago

जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना; १ मार्च रोजी पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी होणार-पृथ्वीराज पाटील

करमाळा प्रतिनिधी: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात…

7 hours ago

बार्शीचे मा.आमदार राजाभाऊ राऊत यांना विधानपरिषदेवर संधी द्यावी – माजी आमदार जयवंतराव जगताप

करमाळा प्रतिनिधी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी आपण…

12 hours ago

डिजिटल मिडिया पत्रकार संपादक संघटनेचे अध्यक्ष राजा माने यांना दुबईत “पत्रकाररत्न” आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मान

* करमाळा प्रतिनिधी डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे संस्थापक महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री. राजा माने…

18 hours ago

यशवंत परिवाराच्या वतीने स्व. अर्जुन तात्या फंड सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली

करमाळा प्रतिनिधी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांचे वडील, कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे…

1 day ago

विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांना पितृशोक; अर्जुन तात्या फंड सर यांचे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी: विद्या विकास मंडळचे अध्यक्ष तथा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांशी संबंधित नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालयाचे…

1 day ago