करमाळा (प्रतिनिधी) – करमाळा शहराला होणारा पाणीपुरवठा रोज सकाळी ठीक सात वाजता नियमितपणे होण्यासाठी पालिका प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करावी व पुरेशा दाबाने पाण्याचे वितरण करावे याबाबतीत कसलाही हलगर्जीपणा करू नये अशा स्पष्ट सूचना माजी आ. जयवंतराव जगताप यांनी पालिकेचे मुख्याधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
उजनी जलाशयाची पाणी पातळी सध्या प्रचंड हलावलेली असल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दहीगाव येथील जॅकवेलला पाणी मिळण्यासाठी चारी खोदून कसेबसे पाणी मिळवून पंपिंग करावे लागत असल्यामुळे सकाळी साडेसात ऐवजी बऱ्याचदा पाणी उशिरा येत असल्याने तसेच सकाळी ८ ते ९ या दरम्यान विजेचे भारनियमन केले जात असल्यामुळे पुरेशा प्रमाणात पाणी मिळू शकत नाही, परिणामी विजेअभावी इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना सध्या पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. याबाबतच्या नागरिकांच्या असलेल्या वाढत्या तक्रारी मकाईचे माजी संचालक विवेक येवले यांनी माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या कानावर घातल्यानंतर जगताप यांनी याबाबत अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिलेले आहेत.
करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…
करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…
करमाळा प्रतिनिधी — गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव म्हणून साजरा न करता त्याला सामाजिक बांधिलकीची…
करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…
* करमाळा प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…
करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…