Categories: करमाळा

ऊस बिलासाठी तहसील कचेरीवर उद्या निघणारआक्रोश मोर्चा – राजाभाऊ कदम

करमाळा प्रतिनिधी: मोर्चा काढणार असल्याचे निवेदन तहसीलदार विजयकुमार जाधव साहेब यांना देण्यात आले यावेळेस बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम म्हणाले मकाई सहकारी साखर कारखान्याने नोव्हेंबर महिन्यापासून शेतकऱ्यांना पहिलाच हप्ता दिला नाही मकाई कारखान्याचे माजी चेअरमन दिग्विजय बागल यांना शेतकऱ्यांबाबत कसल्याही प्रकारची काळजी किंवा आत्मीयता दिसून येत नाही जर शेतकऱ्यांची चिंता दिग्विजय बागल यांना असती तर आत्तापर्यंत शेतकऱ्यांना पहिल्या हप्त्याची रक्कम थोड्या प्रमाणात का होईना दिली असती शेतकऱ्यांनी बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांच्या नेतृत्वाखाली दहा एप्रिल ला कुंभेज फाटा येथे रास्ता रोको आंदोलन केले होते तरीसुद्धा उसाची बिले मिळाली नव्हती म्हणून चेअरमनच्या घरावरती शेतकऱ्यांचा मोर्चा निघणार होता तेव्हा मोर्चाच्या धास्तीने मकाईचे चेअरमन यांनी मकाई चे कार्यकारी संचालक खाटमोडे साहेब यांच्यामार्फत मे अखेरपर्यंत बिले देतो अशे लेखी पत्र दिले होते परंतु अद्याप पर्यंत शेतकऱ्यांना ऊसाची बिले मिळालेली नाहीत .त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रचंड चीड निर्माण झालेली आहे शेतकऱ्यांना प्रपंच चालवणं कठीण झाले आहे शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आलीआहे तरीसुद्धा मकाई कारखाना शेतकऱ्यांच्या उसाची बिले देत नाही
त्याचप्रमाणे कमलाई साखर कारखान्याने डिसेंबर महिन्यापर्यंत पंधराशे रुपये दिले आहेत राहिलेली बिले शेतकऱ्यांची अद्याप पर्यंत दिलेली नाहीत त्यामुळे कमलाई कारखान्याबाबत सुद्धा शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रचंड चिड आहे कमलाई कारखाना आमदार बबनदादा शिंदे यांच्या मालकीचा आहे विठ्ठलराव शिंदे माढा कारखान्याची बिले 2,800 रुपयांनी शेतकऱ्यांना दिली मग कमलाईची बिले का थांबवली दोन्ही कारखाने बबन दादा शिंदे यांच्या मालकीचे आहेत दोन्ही कारखान्यांमध्ये असा भेदभाव का करतात त्यामुळे आमदार शिंदे यांच्या वरती करमाळा तालुक्यातील जनता प्रचंड नाराज आहे म्हणून मकाई आणि कमलाई कारखान्याच्या विरोधामध्ये शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा दिनांक 21 सात 2023 रोजी करमाळा तहसील कचेरी वरती निघणार आहे तेव्हा मकाई सहकारी साखर कारखाना व कमलाई साखर कारखाना यांनी ताबडतोब शेतकऱ्यांची ऊस बिले काढावीत मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी मोर्चामध्ये सहभागी व्हावे असे आव्हान बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांनी केले आहे.
यावेळेस लालासाहेब काळे , सुंदरदास काळे, पांडुरंग रोडे, सागर मारकड, दिगंबर मारकड, रावसाहेब पाटील, लाला शिंदे, रोकडे मच्छिंद्र काळे आदी शेतकरी उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

अखंड हिंदुस्तानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त १९ फेब्रुवारीला करमाळ्यात भव्य रक्तदान शिबीर

करमाळा प्रतिनिधी: अखंड हिंदुस्तानचे दैवत म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त करमाळा शहरात…

4 hours ago

जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना; १ मार्च रोजी पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी होणार-पृथ्वीराज पाटील

करमाळा प्रतिनिधी: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात…

9 hours ago

बार्शीचे मा.आमदार राजाभाऊ राऊत यांना विधानपरिषदेवर संधी द्यावी – माजी आमदार जयवंतराव जगताप

करमाळा प्रतिनिधी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी आपण…

14 hours ago

डिजिटल मिडिया पत्रकार संपादक संघटनेचे अध्यक्ष राजा माने यांना दुबईत “पत्रकाररत्न” आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मान

* करमाळा प्रतिनिधी डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे संस्थापक महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री. राजा माने…

21 hours ago

यशवंत परिवाराच्या वतीने स्व. अर्जुन तात्या फंड सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली

करमाळा प्रतिनिधी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांचे वडील, कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे…

1 day ago

विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांना पितृशोक; अर्जुन तात्या फंड सर यांचे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी: विद्या विकास मंडळचे अध्यक्ष तथा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांशी संबंधित नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालयाचे…

1 day ago