मराठा योद्धा मनोज जरांगे यांनी मराठा समाजाच्या हितासाठी अन्न व पाण्याचा त्याग केला आहे. त्याच्या जीवाला काही बरं वाईट झाले तर सपुर्ण महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे सरकारने वेळीच जागे होऊन याकडे लक्ष देण्याचे गरजेचे असल्याचे मत प्राध्यापक मिलिंद फंड यांनी व्यक्त केले आहे. तरी यावेळी उपस्थित असलेल्या विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे यांनी आरक्षण मिळणार नाही. तोपर्यंत कोणत्याही राजकीय व्यासपीठावर चालणार नाही अशी भूमिका जाहीर केली आहे.मागील चार दिवसांपासून करमाळा शहरात व तालुक्यात मराठा समाजाच्या वतीने वेगवेगळे आंदोलने केले जात आहे. त्यामध्ये तालुक्यातील सर्व सकल मराठा समाज सहभागी होत आहे. चार दिवसांपासून मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी करमाळ्यातही साखळी उपोषण सुरू आहे. या उपोषणाला आज महिलांच्या वतीने पाठिंबा देण्यात आला. तर रोज वेगवेगळ्या दोन गावातील कार्यकर्ते येऊन उपोषणाला पाठिंबा देत आहेत. तर आज ब्राह्मण समाजानेही मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे यांनी आपण जरी सधन असलो. तरी आज बराचसा समाज मागासलेला आहे. त्यांना आरक्षणाची गरज आहे. आपण राजकीय व्यासपीठावर कायम दिसत असलो तरी जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत इथून पुढे पुन्हा राजकीय स्टेजवर दिसणार नाही अशी भूमिका यावेळी त्यांनी जाहीर केली आहे. तर वेळोवेळी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना गरज भासेल त्यावेळी आपण सोबत लढत राहू असेही आश्वासन दिले आहे.
करमाळा प्रतिनिधी: अखंड हिंदुस्तानचे दैवत म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त करमाळा शहरात…
करमाळा प्रतिनिधी: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात…
करमाळा प्रतिनिधी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी आपण…
* करमाळा प्रतिनिधी डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे संस्थापक महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री. राजा माने…
करमाळा प्रतिनिधी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांचे वडील, कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे…
करमाळा प्रतिनिधी: विद्या विकास मंडळचे अध्यक्ष तथा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांशी संबंधित नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालयाचे…