करमाळा बसस्थानकात एकूण ७१एसटी बस ची आवश्यकता आहे.सध्या केवळ आगारात ५८ बसच कार्यरत आहेत.त्यातील बहुतांश बसचे आयुर्मान संपल्याने त्यांचा वापर होत नाही.यामुळे बस संख्या मर्यादित झाल्याने अनेक मार्गावरील बसच्या फेऱ्या अचानक रद्द केल्या जात आहेत.त्यामुळे तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रवाशांसह विद्याथ्र्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.त्यामुळे तातडीने आवश्यक वीस बस द्याव्यात अशी मागणी बागल गटाचे युवा नेते दिग्विजय बागल यांनी जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे
बागल यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की ज्या मार्गावर प्रवासी संख्या आहे, तिथेच बसच्या फेऱ्या वाढवण्याचे धोरण ठेवले आहे.ऊपलब्ध असलेल्या बस जुन्या असल्याने कधी रस्त्यात बंद पडतात. तालुक्यातील अनेक मार्गावरील फेर्यां बंद करण्यात आल्या आहेत.यामुळे ज्येष्ठ नागरिक,महिला,विद्यार्थ्यांना प्रवासात सवलत असताना ही त्रास सहन करावा लागत आहे.
त्यामुळे सध्या आगारात कार्यरत असलेल्या बसची तात्पुरती दुरुस्ती न करता आवश्यक दुरुस्ती करुन सुस्थितीत आणाव्यात. आवश्यक असलेल्या२० बस आगारात दाखल करुन पूर्वी प्रमाणे तालुक्यातील सर्व मार्गावरील बस सेवा पूर्ववत करावी.त्यामुळे नागरीकांची समस्येपासून कायमस्वरूपी सुटका होणार आहे.याबाबत आपल्या स्तरावरुन योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी दिग्विजय बागल यांनी निवेदनाद्वारे केली आहे
करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…
करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…
करमाळा प्रतिनिधी — गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव म्हणून साजरा न करता त्याला सामाजिक बांधिलकीची…
करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…
* करमाळा प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…
करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…