Categories: करमाळा

कृष्णा खोर्‍यातील पाणी उजनी कोळगाव धरणात येण्याचा सर्वाधिक लाभ करमाळ्याचाच . – प्रा.शिवाजी बंडगर प्रकल्पाचे जनक विजयसिंह पाटील यांचा शिवरत्नवर करमाळकरांच्या वतीने सत्कार!

करमाळा प्रतिनिधी 

कृष्णा भिमा स्थिरीकरण योजनेस काल राज्य सरकार ने 3326 कोटी रुपये मंजूर केले .त्यामुळे सहा जिल्हे आणि बत्तीस तालुक्यातील साडेपाच लाख हेक्टर शेतीला पाणी मिळणार आहे. याचा लाभ पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडय़ातील दुष्काळी भागाला होणार आहे. विशेषता हे पाणी क्रुष्णा खोर्‍यातून उजनी धरणात येवून पुढे सिना कोळगाव धरण मार्गाने मराठवाडय़ात जाणार असल्याने करमाळा तालुक्याला याचा सर्वाधिक लाभ होणार असल्याने धरणासाठी सर्वस्व त्यागणार्या उजनी व कोळगाव धरणग्रस्तासह संपूर्ण करमाळा तालुक्यालाच आनंद झाला असल्याचे प्रतिपादन उजनी धरणग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रा.शिवाजी बंडगर यांनी काल अकलुज येथे शिवरत्न बंगल्यावर बोलताना केले.

क्रुष्णा भिमा स्थिरीकरण योजनेस सरकारने काल निधी मंजूर केल्यानंतर या योजनेचे जनक माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा सन्मान करमाळा तालुक्याच्या वतीने शिवरत्न बंगला,अकलुज येथे करण्यात आला. या वेळी प्रा बंडगर बोलत होते. या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्या सविताराजे भोसले, सदस्य दिलीपदादा तळेकर , आदिनाथ चे माजी उपाध्यक्ष शहाजीराव देशमुख,माजी जिल्हापरिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे ,उदयसिंह मोरे पाटील, माजी संचालक संतोष खाटमोडे पाटील,वांगीचे माजी सरपंच विठ्ठल शेळके ,माणिकराव साखरे, शिवशंकर माने,महेंद्र पाटील, सरडे बापू,औदुंबर भोसले,अमरजीतसिंह साळुंके,महारूद्र पाटील, हनुमंत पाटील, आबा टापरे, चैतन्य पाठक,गणेश घोरपडे,बाळासाहेब महानवर आदि उपस्थित होते.

पुढे बोलताना बंडगर म्हणाले की,या योजनेस काहीनी विरोध करत खिल्ली उडवली होती . परंतु विजयसिंह मोहिते पाटील यानी आपली राजकीय ताकद पणाला लावली . सतत याचा पाठपुरावा चालूच ठेवला . प्रथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना साडे आठ लोकांच्या सहीचे निवेदन त्याना दिले. आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते पाटील यांनीही या योजनेचा ध्यास घेतला होता. या सर्वांच्या प्रयत्नाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी सकारात्मक प्रतिसाद दिला . अपुर्या पावसा मुळे उजनी तसेच कोळगाव धरण अनेकदा भरली जात नाहीत. त्यावेळी शेकडो एकर शेती धोक्यात येते. वीज कपातीच्या संकटाला सामोरे जावे लागते. क्रुष्णा खोर्‍यातील वाया जाणारे पाणी उजनी आणि कोळगाव धरणात येणार असल्याने ही समस्या निर्माण होणार नाही. रिटेवाडी उपसासिंचन सारखी योजना ही होवू शकते. त्यामुळे करमाळा तालुक्यातील सिंचन क्षेत्र वाढणार आहे.

चौकट- माजी उपमुख्य मंत्री विजयसिंह मोहिते पाटील याना क्रुष्णा भिमा स्थिरीकरण योजनेचे श्रेय मिळु नये म्हणून काहीनी या योजनेस खूप विरोध केला.पण विजयसिंह मोहिते पाटील, रणजितसिंह मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते पाटील यानी याचा अविरत पाठपुरावा केला आणि आज निधी मंजूर झाला. करमाळा तालुक्याला याचा सर्वाधिक लाभ होणार आहे. सूर्य चंद्र असे पर्यंत विजयसिंह मोहिते पाटील यांच नाव या निमित्ताने आता घेतले जाईल.

शहाजीराव देशमुख
माजी उपाध्यक्ष आदिनाथ कारखाना.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळ्यात श्री संत नामदेव शिंपी महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहास भक्तिमय प्रारंभ११ ऑगस्ट रोजी संजीवन समाधी सोहळा महाप्रसाद,

करमाळा, प्रतिनिधी : करमाळा येथील श्री संत नामदेव शिंपी समाजाच्या वतीने श्रीसंत नामदेव शिंपी महाराज…

1 day ago

स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी स्व. रुक्मिणी विठ्ठल आवताडे यांच्या २७ व्या पुण्यस्मरणानिमित विशाल महाराज खोले यांचा ‘आई-वडील हेच खरे दैवत’चा हृदयस्पर्शी संदेश

करमाळा प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसचे करमाळा तालुकाध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य भरत (भाऊ) आवताडे यांच्या…

1 day ago

शाहुनगर पाणीप्रश्नाला मोठा दिलासा; नवीन चार इंची पाईपलाईनच्या कामाचा शुभारंभ उत्साहात नगरपरिषदेचा महत्त्वाकांक्षी उपक्रम

* करमाळा, प्रतिनिधी : करमाळा शहरातील शाहूनगर परिसरातील नागरिकांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या पाणीप्रश्नाच्या निराकरणाच्या दिशेने…

1 day ago

श्रीजगदंबा कमलादेवी मंदिराच्या जतन संवर्धनासाठी भाविकांचा वाढता प्रतिसाद; विकास चौकटे यांची ₹३,००१ देणगी

करमाळा (प्रतिनिधी) – करमाळा येथील ग्रामदैवत श्रीजगदंबा कमलादेवी मंदिराच्या जतन व संवर्धनाच्या कामाला भाविकांचा उत्स्फूर्त…

3 days ago

संजय गांधी निराधार योजनेची प्रकरने चार महिन्यापासून मंजूर झाली नाहीत तत्काळ मंजूर करा अन्यथा आंदोलन करू – राजाभाऊ कदम

करमाळा प्रतिनिधी : संजय गांधी निराधार योजनेची प्रकरणे मार्च महिन्यामध्ये मंजूर झाली होती त्यानंतर चार…

3 days ago

ग्रामीण विद्यार्थ्यांच्या इंग्रजी अभिव्यक्तीला जिल्हास्तरीय व्यासपीठ* *लोकशिक्षिका स्व. लीलाताई दिवेकर यांच्या स्मरणार्थ करमाळ्यात उद्या वक्तृत्व स्पर्धा

करमाळा प्रतिनिधी भाषा ही केवळ परीक्षेतील गुणांची बाब नसून विद्यार्थ्यांच्या विचारांना आकार देणारे आणि जगाशी…

3 days ago