Categories: Uncategorized

कोर्टी आणि वीट जि.प गटातील गावांचा पाण्यासाठी आणि रेल्वे थांब्यासाठी लोकसभा मतदानावर बहिष्कार


करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील कोर्टी आणि वीट जिल्हा परिषद गटातील बहुतांश गावांमधुन आगामी लोकसभा निवडणुकीवर बहीष्कार घालण्याचे ग्रामपंचायत ठराव संमत झालेले असुन, यामुळे तब्बल ५५ ते ६० गावातुन मतदान होणार नाही अशी परिस्थिती आहे. सोलापुरचे जिल्हाधिकारी श्री. कुमार आशिर्वाद यांनी ज्या ज्या ठिकाणी असे बहिष्काराचे निर्णय होत आहे किंवा कळत आहे अशा ठिकाणी जाऊन संबधित मतदारांचे प्रश्न ऐकुन त्यावर तातडीने उपाययोजना करणेचे बाबत सर्व प्रशासन अधिकारी यांना सुचित केले आहे. त्यामुळे सदर बहिष्कार घालणाऱ्या ग्रामस्थांची समजुत काढण्यासाठी प्रशासनाला कसरत करावी लागणार आहे. वस्तुतः एवढया मोठया प्रमाणावर बहिष्कार होण्याचा हा पहिलाच प्रसंग असुन यापुर्वी करमाळा तालुक्यातील रिटेवाडी गावातील लोकांनी बहिष्कार घातला होता. वस्तुतः आम्ही अशा काही गावातील लोकांच्या जनभावना जाणून घेतल्या असता , लोकाच्या मागण्या पूर्ण न झाल्यानेच हा उद्रेक होत आहे. आजची तरुणाई या सर्व गोष्टी स्वतः हाताळत असुन, प्रत्येक गावोगावी बैठकांचे सत्र चालु आहे. पारेवाडी रेल्वे स्टेशनवर एक्सप्रेस गाडीचा थांबा मागणी गेली ३० वर्षांपासून होत असुन, मोदी सरकारच्या काळातही रेल्वे एक्सप्रेस थांबली नाहीच , ऊलट चालु असणाऱ्या गाडया बंद करून, सर्वसामान्य ग्रामिण भागातील नागरिकांचे , प्रवाशांचे प्रचंड नुकसान केले असल्याचे सांगितले जात आहे. या संदर्भात गेली दोन तीन दिवसां पासुन रेल्वे वरिष्ठ अधिकारी पारेवाडी रेल्वे स्टेशन व परिसरातील नागरिकांशी संवाद साधत असुन,बहिष्कार निर्णय कायम आहे. दिनांक-२६ फेब्रु रोजी पंतप्रधान यांचे हस्ते संपूर्ण राज्यातील रेल्वेचे कामांचे उद्‌घाटन होत असुन , त्याची जय्यत तयारी एकीकडे चालु असताना या कार्यक्रमावर देखिल बहिष्कार घालण्याचा निर्णय केत्तुर आणि परिसरातील नागरिकांनी घेतला आहे. पारेवाडी, गुलमोहरवाडी, भगतवाडी, जिंती, रामवाडी व इतर ठिकाणी रेल्वे गेट च्या ठिकाणी झालेल्या बोगदयाची व रस्त्याची कामे अतिशय निकृष्ट दर्जाची झाली असुन , याबाबत नागरिका मधुन तीव्र संताप व्यक्त होत आहे. मग अशा निकृष्ट कामांचे उद्घाटन माननीय पंतप्रधानांनी करूच नये असे सर्वसामान्य नागरिकांना वाटते. लोकांचे मुलभुत प्रश्न जर प्रशासन सोडवत नसेल तर मग मतदान देऊन तरी काय फायदा अशी उदासिनता तयार होत असुन, जवळपास निम्म्या करमाळा तालुक्यात मतदानावर बहिष्कार टाकल्यामुळे प्रशासनावरील ताण वाढणार असल्याचे चित्र दिसत आहे.
बहिष्काराचा निर्णय आमच्या हक्कांसाठी आहे- राजेंद्र भोसले-सरपंच प्रतिनिधी राजुरी
मागण्या मान्य न झाल्यास बहिष्कार होणारच होणार- सरपंच सुनील ढवळे( देलवडी), सरपंच पोपटराव माळशिकारे( गोयेगाव),
सरपंच नवनाथ गायकवाड ( पोमलवाडी), सरपंच सचिन वेळेकर ( केत्तुर), सरपंच प्रतिनिधी पांडुरंग नवले( पारेवाडी)

saptahikpawanputra

Recent Posts

अखंड हिंदुस्तानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त १९ फेब्रुवारीला करमाळ्यात भव्य रक्तदान शिबीर

करमाळा प्रतिनिधी: अखंड हिंदुस्तानचे दैवत म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त करमाळा शहरात…

7 hours ago

जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना; १ मार्च रोजी पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी होणार-पृथ्वीराज पाटील

करमाळा प्रतिनिधी: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात…

11 hours ago

बार्शीचे मा.आमदार राजाभाऊ राऊत यांना विधानपरिषदेवर संधी द्यावी – माजी आमदार जयवंतराव जगताप

करमाळा प्रतिनिधी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी आपण…

17 hours ago

डिजिटल मिडिया पत्रकार संपादक संघटनेचे अध्यक्ष राजा माने यांना दुबईत “पत्रकाररत्न” आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मान

* करमाळा प्रतिनिधी डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे संस्थापक महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री. राजा माने…

23 hours ago

यशवंत परिवाराच्या वतीने स्व. अर्जुन तात्या फंड सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली

करमाळा प्रतिनिधी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांचे वडील, कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे…

1 day ago

विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांना पितृशोक; अर्जुन तात्या फंड सर यांचे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी: विद्या विकास मंडळचे अध्यक्ष तथा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांशी संबंधित नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालयाचे…

2 days ago