महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगेपाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी आंदोलन चालू आहे.अवकाळी पाऊस दुष्काळ शेतीमालाचे कमी भाव त्यामुळे मराठा समाजात संकटात आहे. समाज आत्महत्या करत आहे. त्यामुळे आरक्षण गरजेचे असल्याचे मत निर्णय ग्रामपंचायत माजी सरपंच व हिंदवी स्वराज्य ग्रुप चे संस्थापक श्री औदुंबर राजे भोसले यांनी व्यक्त केले आहे .
कुणबी म्हणून मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण दिले आहे. आणि कुणबी व मराठा एकच आहेत, मराठा समाजाला ओबीसी आरक्षण पाहिजे, एवढे मोठे आंदोलन सुरू असताना देखील सरकार आरक्षण निर्णय घेत नाही.रात्री नियमबाह्य राष्ट्रपती राजवट उठते ,पहाटे मंत्रिमंडळाचा शपथविधी होतो, कलम 370 हा उठवले जाते, राम मंदिराचा निकाल लागतो, सिंचन घोटाळा आरोप अजित पवार यांच्यावर होतो त्यांनी पक्ष प्रवेश केला की तो आरोप रद्द होतो, आदर्श घोटाळ्याचा आरोप अशोक चव्हाण यांच्यावर होतो पक्ष प्रवेश केला की रद्द होतो, एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप होतो पक्ष प्रवेश केल्याविरुद्ध होतो, हे सर्व होत असताना सरकार समाज नाराज होतो का जनता नाराज होते का याचा विचार करत नाही .फक्त मराठा व धनगर आरक्षण म्हटले की ओबीसी समाज नाराज होईल एसटी समाज नाराज होईल हे कारण दाखवून आरक्षण चा निर्णय घेतला जात नाही. आरक्षण दाबण्याचा प्रयत्न होत आहे. चिरडण्याचा प्रयत्न होत आहे .आंदोलन करताना घात करण्याचा प्रयत्न होत आहे. आंदोलन कर्त्यावर बिन बुडाचे आरोप करून बदनाम करायचा प्रयत्न होत आहे. आरक्षण देण्याचे नाटक करून वकील सदावर्ते मार्फत कोर्टात याचिका दाखल होते, निकाल विरुद्ध लागतो. बहुजन समाजाला टार्गेट करायचे, नेत्यांना टारगेट करायचे, त्यांना निर्णयापासून पदापासून दूर ठेवायचे ,मुख्यमंत्री व्हायची वेळ आली की त्यांचा अपघात होतो ,खडसे मुख्यमंत्री व्हायचे म्हणले की त्यांना पक्षातून बाजूला केले जाते, पंकजाताई मुंडे विधानसभेला पराभव केला जातो, हक्कासाठी आंदोलन केले की मेटे साहेबांसारख्यांचे मृत्यू होतात,भुजबळ ,पडळकर, शेंडगे या नेत्याने पुढे करून मराठा ओबीसी वाद लावायचा प्रयत्न होतो, परंतु देशातील महाराष्ट्रातील मराठा ओबीसी सर्व एकच आहेत आणि कोणताही असा वाद होता व नाही आणि यापुढे देखील वाद होणार नाही. आम्ही सर्व एकत्र आहोत ,एकत्र राहणार. हे सर्व षडयंत्र सरकार चालवणारे देवेंद्र फडणवीस करत आहेत.मांजराला वाटते मी डोळे मिटून चोरून दूध पीत आहे.परंतु मांजराचे डोळे मिटले असले तरी समाजाचे डोळे उघडे आहेत. हे सरकारने विसरू नये.आंदोलन कर्त्याच्या जीवाला धोका झाल्यास त्या सर्वस्वी देवेंद्र फडणवीस जबाबदार असतील, त्यांना समाज सोडणार नाही. असा इशारा औदुंबरराजे यांनी दिला आहे.पुढे बोलताना राजे म्हणाले आमची मागणी ओबीसीतून आहे .तुम्ही दहा टक्के वेगळे देत आहात, समाज किती टक्के आहे. दहा टक्के आरक्षण समाजाला योग्य आहे का, राज्य सरकारला 50 टक्के च्या पुढे आरक्षण द्यायचा अधिकार नाही, हे आरक्षण कोर्टात टिकू शकत नाही. हे सर्वांना माहिती आहे फक्त समाजाला वेळ काढूपणाचे धोरण आहे .त्यामुळेआमची मागणी आरक्षणा ओबीसीतून पाहिजे आणि आम्ही ते घेणारच असा विश्वास औदुंबरराजे यांनी व्यक्त केला
करमाळा प्रतिनिधी इंटरनेट केबल टाकण्यासाठी मुंबई येथील एका खासगी कंपनीकडून करमाळा तालुक्यात नियमबाह्य व बेकायदेशीर…
करमाळा / प्रतिनिधी करमाळा, येथील एकलव्य प्राथमिक आश्रमशाळेत निवासी विद्यार्थ्यांसाठी बंक बेडची व्यवस्था करण्यात आली…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात सुरू असलेल्या हनुमान चालीसा पठण उपक्रमाने सलग 151 आठवड्यांचा टप्पा यशस्वीरित्या…
आदरणीय प्रा. रामदास झोळ सरांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!काही माणसं आयुष्यात फक्त भेटत नाहीत… तर आयुष्य…
करमाळा (प्रतिनिधी) – ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शालेय प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या शासकीय दाखल्यांसाठी होणारी गैरसोय…
करमाळा प्रतिनिधी. करमाळा विधानसभा मतदारसंघात सखोल मतदार पुनर्निरीक्षण (SIR) कार्यक्रम अंतर्गत मतदार यादी अचूक करण्यासाठी…