करमाळा प्रतिनिधी:- अहमदनगर जिल्ह्याचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करण्याची धनगर समाजाची अनेक दिवसाची मागणी अखेर मान्य झाली आहे.राज्य सरकारने काल याबाबत शासन आदेश जारी करत अहमदनगर चे नामकरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर केले आहे.याबद्दल राज्य सरकारचे धनगर समाजाच्या वतीने आभार व्यक्त करत असलेचे मत धनगर समाजाचे नेते तथा भाजपचे जिल्हा चिटणीस विनोद महानवर यांनी केले आहे. याबाबत अधिक माहिती देताना महानवर म्हणाले की,जुलमी राजसत्ता असलेली अहमदनगरचे नाव बदलून याचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर ठेवणे म्हणजेच महाराणी अहिल्यादेविंच्या कार्याचा गौरव राज्य सरकारने केला आहे. ही बाब एक धनगर समाजासाठी व मी एक प्रतिनिधी म्हणून अभिमानास्पद आहे.हा निर्णय घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,आमदार गोपीचंद पडळकर,आमदार राम शिंदे,खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह सर्वच धनगर नेते कार्यकर्ते यांनी प्रयत्न केले त्या सर्वांचे आभार श्री महानवर यांनी व्यक्त केले आहेत.
करमाळा प्रतिनिधी: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात…
करमाळा प्रतिनिधी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी आपण…
* करमाळा प्रतिनिधी डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे संस्थापक महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री. राजा माने…
करमाळा प्रतिनिधी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांचे वडील, कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे…
करमाळा प्रतिनिधी: विद्या विकास मंडळचे अध्यक्ष तथा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांशी संबंधित नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालयाचे…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील विद्या विकास मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व…