Categories: करमाळा

धनगर समाजाची अनेक दिवसाची मागणी अखेर मान्य,अहमदनगर जिल्ह्याचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर,राज्य सरकारचे आभार :- विनोद महानवर


करमाळा प्रतिनिधी:- अहमदनगर जिल्ह्याचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करण्याची धनगर समाजाची अनेक दिवसाची मागणी अखेर मान्य झाली आहे.राज्य सरकारने काल याबाबत शासन आदेश जारी करत अहमदनगर चे नामकरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर केले आहे.याबद्दल राज्य सरकारचे धनगर समाजाच्या वतीने आभार व्यक्त करत असलेचे मत धनगर समाजाचे नेते तथा भाजपचे जिल्हा चिटणीस विनोद महानवर यांनी केले आहे. याबाबत अधिक माहिती देताना महानवर म्हणाले की,जुलमी राजसत्ता असलेली अहमदनगरचे नाव बदलून याचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर ठेवणे म्हणजेच महाराणी अहिल्यादेविंच्या कार्याचा गौरव राज्य सरकारने केला आहे. ही बाब एक धनगर समाजासाठी व मी एक प्रतिनिधी म्हणून अभिमानास्पद आहे.हा निर्णय घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,आमदार गोपीचंद पडळकर,आमदार राम शिंदे,खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह सर्वच धनगर नेते कार्यकर्ते यांनी प्रयत्न केले त्या सर्वांचे आभार श्री महानवर यांनी व्यक्त केले आहेत.

saptahikpawanputra

Recent Posts

श्रीजगदंबा कमलादेवी मंदिराच्या जतन संवर्धनासाठी भाविकांचा वाढता प्रतिसाद; विकास चौकटे यांची ₹३,००१ देणगी

करमाळा (प्रतिनिधी) – करमाळा येथील ग्रामदैवत श्रीजगदंबा कमलादेवी मंदिराच्या जतन व संवर्धनाच्या कामाला भाविकांचा उत्स्फूर्त…

6 hours ago

संजय गांधी निराधार योजनेची प्रकरने चार महिन्यापासून मंजूर झाली नाहीत तत्काळ मंजूर करा अन्यथा आंदोलन करू – राजाभाऊ कदम

करमाळा प्रतिनिधी : संजय गांधी निराधार योजनेची प्रकरणे मार्च महिन्यामध्ये मंजूर झाली होती त्यानंतर चार…

7 hours ago

ग्रामीण विद्यार्थ्यांच्या इंग्रजी अभिव्यक्तीला जिल्हास्तरीय व्यासपीठ* *लोकशिक्षिका स्व. लीलाताई दिवेकर यांच्या स्मरणार्थ करमाळ्यात उद्या वक्तृत्व स्पर्धा

करमाळा प्रतिनिधी भाषा ही केवळ परीक्षेतील गुणांची बाब नसून विद्यार्थ्यांच्या विचारांना आकार देणारे आणि जगाशी…

1 day ago

मानव एकता दिनानिमित्त संत निरंकारी मंडळाच्या शिबीरात १६६ जणांचे रक्तदान*

करमाळा प्रतिनिधी - मानव एकता दिनानिमित्त संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन दिल्ली शाखा करमाळा यांचे वतीने…

2 days ago

जयकुमार गोरे यांच्यावरील आक्षेपार्ह वक्तव्याचा करमाळ्यात भाजपकडून तीव्र निषेध

  करमाळा प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.…

3 days ago

नाशवंत गोष्टीकडे दुर्लक्ष करून शाश्वत गोष्टी लक्षात घेवून युवकांनी समाजकारण व राजकारणातून जनतेची सेवा करावी . – मा .आ जयवंतराव जगताप

करमाळा प्रतिनिधी दिग्वीजय बागल यांची ' मूख्यमंत्री बळीराजा पाणंद/ शेत रस्ता समिती च्या करमाळा विधानसभा…

3 days ago