Categories: करमाळा

जिल्हा प्रशासनाने उजनी धरण परिसरातील वीज कपात केल्यास शेतकऱ्यांची ऊस , केळी व इतर पिके वाया जातील व शेतकरी उध्वस्त होतील . – शंभूराजे जगताप जिल्हाध्यक्ष , भाजपा युवा मोर्चा

करमाळा प्रतिनिधी चालुवर्षी पाऊस खूपच कमी पडल्याने सर्वांना दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे . सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेले उजनी धरण सुद्धा कमी पाऊस झाल्याने अर्ध्या क्षमतेपेक्षा जास्त भरले नाही . करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचा उजनी धरणासाठी खूप मोठा त्याग आहे . कित्येक शेतकऱ्यांच्या जमिनी धरणात गेल्या तेव्हा कुठे हरित पट्टा विकसीत झालेला आहे . तालुक्यातील ३७ गावामधील शेतकरी धरणग्रस्त आहेत खरंतर त्यांचा या पाण्यावर प्रथम हक्क आहे . एकुण ११०.८९ टीएमसी क्षमतेपैकी धरणग्रस्त शेतकऱ्यांचे हक्काचे २ टीएमसी पाणी सदैव अबाधित राहीले पाहिजे . जिल्हा प्रशासनाने याबाबत काटेकोर नियोजन केले पाहिजे . मात्र प्रसार माध्यमातून व समाज माध्यमातून जिल्हा प्रशासनाकडून उजनी काठच्या गावांमधील वीज कपात करण्याबाबतच्या निर्णय झाल्याचे कळत आहे . जर या शेतकऱ्यांची वीज कपात केली तर ऊस , केळी व इतर पिके जळून खाक होतील , कोट्यावधी रुपयांचे नुकसान होवून शेतकरी अडचणीत येतील . सध्या या परिसरात ऊस पट्टयासह केळीचा पट्टा विकसीत होत आहे . येथिल केळीला जगात मागणी असून प्रगत देशांमध्ये मोठ्या प्रमाणात येथील केळी निर्यात केली जात आहे . ऊसाच्या तुलनेत केळीला चांगला भाव मिळाल्याने तालुक्यासह जिल्ह्याच्या अर्थकारणाला गती मिळत आहे . चालु वर्षी सुद्धा ऊस व केळी पिकांचे लागणी सह खोडवे व निडवे अशी उभी पिकं आहेत . जरी दुष्काळी परिस्थिती असली तरी पिण्याच्या पाण्यासह या परिसरातील शेतकरी त्यांचे पशुधन व उभी पिकं पण वाचली पाहिजेत त्यासाठी आपण नेहमीच शेतकऱ्यांसोबत आहोत अन् त्यांच्यावर प्रशासनाकडून अन्याय होता कामा नये असे मत जगताप गटाचे यूवा नेते तथा भाजपा जिल्हा यूवा मोर्चा अध्यक्ष शंभूराजे जगताप यांनी व्यक्त केले आहे . तालुक्यातील विवीध पक्षा च्या नेत्यांनी खरं तर अशा प्रसंगी शेतकऱ्यांच्या पाठीशी राहिले पाहिजे पण तसे होताना दिसत नाही . प्रशासनाने विज कपातीचा निर्णय घेवू नये .कमित कमी दररोज ८ तास पूर्ण दाबाने वीज पुरवावी अन्यथा जिल्हाप्रशासन व महावितरण कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल असेही त्यांनी सांगितले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना; १ मार्च रोजी पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी होणार-पृथ्वीराज पाटील

करमाळा प्रतिनिधी: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात…

2 hours ago

बार्शीचे मा.आमदार राजाभाऊ राऊत यांना विधानपरिषदेवर संधी द्यावी – माजी आमदार जयवंतराव जगताप

करमाळा प्रतिनिधी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी आपण…

7 hours ago

डिजिटल मिडिया पत्रकार संपादक संघटनेचे अध्यक्ष राजा माने यांना दुबईत “पत्रकाररत्न” आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मान

* करमाळा प्रतिनिधी डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे संस्थापक महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री. राजा माने…

14 hours ago

यशवंत परिवाराच्या वतीने स्व. अर्जुन तात्या फंड सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली

करमाळा प्रतिनिधी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांचे वडील, कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे…

23 hours ago

विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांना पितृशोक; अर्जुन तात्या फंड सर यांचे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी: विद्या विकास मंडळचे अध्यक्ष तथा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांशी संबंधित नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालयाचे…

1 day ago

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात बारावीची परीक्षा उत्साहात; ११०४ विद्यार्थी केंद्रावर परीक्षार्थी

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील विद्या विकास मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व…

2 days ago