Categories: करमाळा

जिल्हा प्रशासनाने उजनी धरण परिसरातील वीज कपात केल्यास शेतकऱ्यांची ऊस , केळी व इतर पिके वाया जातील व शेतकरी उध्वस्त होतील . – शंभूराजे जगताप जिल्हाध्यक्ष , भाजपा युवा मोर्चा

करमाळा प्रतिनिधी चालुवर्षी पाऊस खूपच कमी पडल्याने सर्वांना दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे . सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेले उजनी धरण सुद्धा कमी पाऊस झाल्याने अर्ध्या क्षमतेपेक्षा जास्त भरले नाही . करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचा उजनी धरणासाठी खूप मोठा त्याग आहे . कित्येक शेतकऱ्यांच्या जमिनी धरणात गेल्या तेव्हा कुठे हरित पट्टा विकसीत झालेला आहे . तालुक्यातील ३७ गावामधील शेतकरी धरणग्रस्त आहेत खरंतर त्यांचा या पाण्यावर प्रथम हक्क आहे . एकुण ११०.८९ टीएमसी क्षमतेपैकी धरणग्रस्त शेतकऱ्यांचे हक्काचे २ टीएमसी पाणी सदैव अबाधित राहीले पाहिजे . जिल्हा प्रशासनाने याबाबत काटेकोर नियोजन केले पाहिजे . मात्र प्रसार माध्यमातून व समाज माध्यमातून जिल्हा प्रशासनाकडून उजनी काठच्या गावांमधील वीज कपात करण्याबाबतच्या निर्णय झाल्याचे कळत आहे . जर या शेतकऱ्यांची वीज कपात केली तर ऊस , केळी व इतर पिके जळून खाक होतील , कोट्यावधी रुपयांचे नुकसान होवून शेतकरी अडचणीत येतील . सध्या या परिसरात ऊस पट्टयासह केळीचा पट्टा विकसीत होत आहे . येथिल केळीला जगात मागणी असून प्रगत देशांमध्ये मोठ्या प्रमाणात येथील केळी निर्यात केली जात आहे . ऊसाच्या तुलनेत केळीला चांगला भाव मिळाल्याने तालुक्यासह जिल्ह्याच्या अर्थकारणाला गती मिळत आहे . चालु वर्षी सुद्धा ऊस व केळी पिकांचे लागणी सह खोडवे व निडवे अशी उभी पिकं आहेत . जरी दुष्काळी परिस्थिती असली तरी पिण्याच्या पाण्यासह या परिसरातील शेतकरी त्यांचे पशुधन व उभी पिकं पण वाचली पाहिजेत त्यासाठी आपण नेहमीच शेतकऱ्यांसोबत आहोत अन् त्यांच्यावर प्रशासनाकडून अन्याय होता कामा नये असे मत जगताप गटाचे यूवा नेते तथा भाजपा जिल्हा यूवा मोर्चा अध्यक्ष शंभूराजे जगताप यांनी व्यक्त केले आहे . तालुक्यातील विवीध पक्षा च्या नेत्यांनी खरं तर अशा प्रसंगी शेतकऱ्यांच्या पाठीशी राहिले पाहिजे पण तसे होताना दिसत नाही . प्रशासनाने विज कपातीचा निर्णय घेवू नये .कमित कमी दररोज ८ तास पूर्ण दाबाने वीज पुरवावी अन्यथा जिल्हाप्रशासन व महावितरण कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल असेही त्यांनी सांगितले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळ्यात श्री संत नामदेव शिंपी महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहास भक्तिमय प्रारंभ११ ऑगस्ट रोजी संजीवन समाधी सोहळा महाप्रसाद,

करमाळा, प्रतिनिधी : करमाळा येथील श्री संत नामदेव शिंपी समाजाच्या वतीने श्रीसंत नामदेव शिंपी महाराज…

1 day ago

स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी स्व. रुक्मिणी विठ्ठल आवताडे यांच्या २७ व्या पुण्यस्मरणानिमित विशाल महाराज खोले यांचा ‘आई-वडील हेच खरे दैवत’चा हृदयस्पर्शी संदेश

करमाळा प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसचे करमाळा तालुकाध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य भरत (भाऊ) आवताडे यांच्या…

1 day ago

शाहुनगर पाणीप्रश्नाला मोठा दिलासा; नवीन चार इंची पाईपलाईनच्या कामाचा शुभारंभ उत्साहात नगरपरिषदेचा महत्त्वाकांक्षी उपक्रम

* करमाळा, प्रतिनिधी : करमाळा शहरातील शाहूनगर परिसरातील नागरिकांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या पाणीप्रश्नाच्या निराकरणाच्या दिशेने…

2 days ago

श्रीजगदंबा कमलादेवी मंदिराच्या जतन संवर्धनासाठी भाविकांचा वाढता प्रतिसाद; विकास चौकटे यांची ₹३,००१ देणगी

करमाळा (प्रतिनिधी) – करमाळा येथील ग्रामदैवत श्रीजगदंबा कमलादेवी मंदिराच्या जतन व संवर्धनाच्या कामाला भाविकांचा उत्स्फूर्त…

3 days ago

संजय गांधी निराधार योजनेची प्रकरने चार महिन्यापासून मंजूर झाली नाहीत तत्काळ मंजूर करा अन्यथा आंदोलन करू – राजाभाऊ कदम

करमाळा प्रतिनिधी : संजय गांधी निराधार योजनेची प्रकरणे मार्च महिन्यामध्ये मंजूर झाली होती त्यानंतर चार…

3 days ago

ग्रामीण विद्यार्थ्यांच्या इंग्रजी अभिव्यक्तीला जिल्हास्तरीय व्यासपीठ* *लोकशिक्षिका स्व. लीलाताई दिवेकर यांच्या स्मरणार्थ करमाळ्यात उद्या वक्तृत्व स्पर्धा

करमाळा प्रतिनिधी भाषा ही केवळ परीक्षेतील गुणांची बाब नसून विद्यार्थ्यांच्या विचारांना आकार देणारे आणि जगाशी…

4 days ago