करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील नगरपालिकेच्या जुने बोअरवेल (विंधन विहीर) दुरुस्त रिबोअर करून पाणीटंचाई दुर न केल्यास आंदोलन करणार असल्याचा इशारा मुख्याधिकारी करमाळा नगरपरिषदेस निवेदनाद्वारे नगरसेविका सौ स्वातीताई महादेव फंड यांनी दिला आहे.
सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे उजनी मायनसमनध्ये गेल्यामुळे करमाळा शहरामध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झालेली आहे. करमाळा शहरामध्ये अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झालेली आहे. करमाळा शहरास तीन ते चार दिवसाआड पाणी पुरवठा कमी दाबाने होत आहे.करमाळा नगरपरिषदेने करमाळा शहरातील विविध भागामध्ये बोअरवेल (विंधन विहिर) घेतलेले आहेत. सदरचे बोअरवेल सद्य स्थितीत काही भागामध्ये कार्यरत आहेत. तर काही भागातील बोअरवेल नादुरुस्त आहेत. सदर नादुरुस्त बोअरवेल तेथील मोटार व बोअरवेल रिबोअर करुन तात्काळ चालु करण्यात यावेत. व त्याठिकाणी नविन सिंटेक्सच्या पाण्याची टाकी बसविण्यात यावेत. त्यामुळे शहरात निर्माण झालेली पाणी टंचाई काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल.याबाबत आपण अधिकाऱ्यांना वारंवार समक्ष भेटून तोंडी सांगून सुध्दा याकडे दुर्लक्ष केले गेले आहे. संबंधीत अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष दिले असते तर करमाळा शहराला पाणी टंचाईचा सामना करावा लागला नसता. तरी आपण लवकरात लवकर शहरातील नादुरुस्त बोअरवेल दुरुस्त करुन होणारी पाणी टंचाई दूर करावी. अन्यथा करमाळा नगरपरिषद कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात असे दिलेल्या निवेदनात नगसेविका स्वातीताई महादेव फ़ंड यांनी म्हटले आहे.
करमाळा प्रतिनिधी: अखंड हिंदुस्तानचे दैवत म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त करमाळा शहरात…
करमाळा प्रतिनिधी: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात…
करमाळा प्रतिनिधी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी आपण…
* करमाळा प्रतिनिधी डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे संस्थापक महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री. राजा माने…
करमाळा प्रतिनिधी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांचे वडील, कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे…
करमाळा प्रतिनिधी: विद्या विकास मंडळचे अध्यक्ष तथा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांशी संबंधित नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालयाचे…