Categories: करमाळा

भाजपची हुकुमशाही मोडीत काढण्यासाठी करमाळ्यात इंडिया आघाडीच्या नेत्यांची वज्रमुठ येत्या दोन दिवसांत भव्य मेळाव्याची घोषणा

करमाळा प्रतिनिधी भाजपची हुकुमशाही मोडीत काढण्यासाठी लोकशाही वाचविण्यासाठी करमाळा तालुक्यात इंडिया आघाडीच्या माध्यमातून सर्व घटक पक्षाचे नेते एकत्र आले आहेत. करमाळा येथील हॉटेल राजयोग येथे समविचारी इंडिया आघाडीच्या घटकपक्ष नेत्यांची बैठक संपन्न झाली .यामध्ये करमाळा तालुक्यातील प्रा .रामदास झोळसर, कामगार नेते दशरथ आण्णा कांबळे, सावंत गटाचे नेते सुनील सावंत, काँग्रेस आॕयचे तालुका अध्यक्ष प्रतापराव जगताप, सुजय जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या ॲड सविता शिंदे, तालुका अध्यक्ष हनुमंत मांढरे पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र गोडगे, गणेश मंगवडे, ,शिवसेना ठाकरे गटाचे नेते शहराध्यक्ष संजय शिंदे यांनी भारतीय जनता पार्टीविरुधात एकत्र येऊन माढा मतदारसंघातून इंडिया आघाडीच्या माध्यमातून काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. करमाळा तालुक्यात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवून इंडिया आघाडीची भूमिका समजावून सांगणार आहोत.भाजपची हुकुमशाही देशांमध्ये वाढत चालली आहे. सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करून शेतकरी मजूर घटकांना वंचित ठेवण्याचे काम भाजपने करून भांडवलशाहीची निर्मिती केली आहे ‌ . सध्या लोकशाही धोक्यात आली आहे. भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांना फसवणाऱ्या लोकांना आपल्याबरोबर घेऊन आपल्या पक्षाचे हित जपण्याशिवाय सामान्य जनतेकडे बघण्यास हे सरकार तयार नाही. त्यामुळे आम्ही इंडिया आघाडीच्या माध्यमातून सध्या सक्षम पर्याय म्हणून काम करणार आहोत. भारतात बेरोजगारी शिक्षणाचा प्रश्न बिकट झाला आहे.गरीबांना शिक्षण घेणे अवघड झाले आहे. भाजप हुकुमशाही करत आहे . विरोधी पक्ष ठेवायाचा नाही घटकपक्षाची तोडमोड करून धमकी देऊन ईडीच्या माध्यमातून लोकशाही संपवण्याचा काम करत आहेत. यावेळी प्रा रामदास झोळसर म्हणाले की मराठा.धनगर, मुस्लिम आरक्षणिविषयी सरकारने फक्त दिशाभूल करून समाजाला फसवण्याचे काम केले आहे.त्यामुळे या समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी लोकशाही जिवंत राहण्यासाठी इंडिया आघाडीची गरज आहे त्याकरिता जास्तीत जास्त मतदान करून घेणे आवश्यक आहे.करमाळा तालुक्यामध्ये शेतकरी यांची ऊसाची बिले न देणारे त्यांचे नावावर कर्ज काढणारे सर्वसामान्य जनतेला अडचणीत आणणाऱ्यांना साखर कारखानदारांना लबाड पुढारी लोकांना बळ देणाऱ्या भारतीय जनता पार्टीला त्यांची जागा दाखवून देण्यासाठी इंडिया आघाडीच्या पाठीशी जनतेने उभा राहणे गरजेचे आहे.त्यामुळे करमाळा तालुक्यातील जनतेला इंडिया आघाडीची भूमिका समजावून सांगण्यासाठी येत्या दोन तीन दिवसात भव्य मेळावा आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

अखंड हिंदुस्तानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त १९ फेब्रुवारीला करमाळ्यात भव्य रक्तदान शिबीर

करमाळा प्रतिनिधी: अखंड हिंदुस्तानचे दैवत म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त करमाळा शहरात…

7 hours ago

जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना; १ मार्च रोजी पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी होणार-पृथ्वीराज पाटील

करमाळा प्रतिनिधी: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात…

11 hours ago

बार्शीचे मा.आमदार राजाभाऊ राऊत यांना विधानपरिषदेवर संधी द्यावी – माजी आमदार जयवंतराव जगताप

करमाळा प्रतिनिधी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी आपण…

17 hours ago

डिजिटल मिडिया पत्रकार संपादक संघटनेचे अध्यक्ष राजा माने यांना दुबईत “पत्रकाररत्न” आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मान

* करमाळा प्रतिनिधी डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे संस्थापक महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री. राजा माने…

23 hours ago

यशवंत परिवाराच्या वतीने स्व. अर्जुन तात्या फंड सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली

करमाळा प्रतिनिधी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांचे वडील, कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे…

1 day ago

विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांना पितृशोक; अर्जुन तात्या फंड सर यांचे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी: विद्या विकास मंडळचे अध्यक्ष तथा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांशी संबंधित नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालयाचे…

2 days ago