त्यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की नगरपरिषद हद्दीत असणाऱ्या रेणुका नगर परिसरात ३० ते ३५ वर्षांपासून ४० ते ५० कुटुंब राहतात. त्या परिसरात अद्यापही रस्ते व गटारी सुविधा उपलब्ध नाही तसेच तेथील असणाऱ्या महिला व पुरुषांसाठी शौचालय सुविधा उपलब्ध नाही .तेथील असणाऱ्या महिला शौचास उघड्यावर जातात तसेच काही महिला झाडांना पडदे लावून शौचास बसतात. उघड्यावर शौचास बसल्याने तेथील परिसरात साथीचे रोग पसरून नागरिक आजारी पडण्याची शक्यता आहे. तसेच परिसरात गटारी उपलब्ध नसल्याने येथील परिसरात दुर्गंधी पसरली आहे त्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो तसेच त्या ठिकाणी नगरपालिकेची घंटागाडी येत नाही…तरी नगर परिषद प्रशासनाने त्याठिकाणी शौचालय, गटारी व रस्ते उपलब्ध करून द्यावेत. अन्यथा करमाळा नगर परिषद समोर रेणुका नगरमधील सर्व पिडीत नागरिकांसमवेत आम्ही दिनांक २८/०५/२०२४ रोजी ठिय्या आंदोलन करून बोंबाबोंब आंदोलन करणार आहोत याची नगर परिषदेने दखल घ्यावी पीडित नागरिकाना नागरी सुविधा न पुरविल्यामुळे आदोलन करण्याऱ्याची पूर्ण जबाबदारी नगर पालिकेतील मुख्याधिकारी याची असेल याची करमाळा नगर पालिकेने नोंद घ्यावी वरील आमच्या मागण्या पूर्ण करण्याची मागणी केली आहे.
करमाळा प्रतिनिधी भाषा ही केवळ परीक्षेतील गुणांची बाब नसून विद्यार्थ्यांच्या विचारांना आकार देणारे आणि जगाशी…
करमाळा प्रतिनिधी - मानव एकता दिनानिमित्त संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन दिल्ली शाखा करमाळा यांचे वतीने…
करमाळा प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.…
करमाळा प्रतिनिधी दिग्वीजय बागल यांची ' मूख्यमंत्री बळीराजा पाणंद/ शेत रस्ता समिती च्या करमाळा विधानसभा…
करमाळा प्रतिनिधी : मुक्ता साळवे शैक्षणिक अभियान, करमाळा यांच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे…
करमाळा (प्रतिनिधी): विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांना लहानपणापासूनच दैनंदिन जीवन, प्रशासकीय कामकाज, शासकीय…