सध्या सर्वत्र विविध शैक्षणिक प्रवेशासाठी ची प्रक्रिया सुरू असून यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी कुणबी प्रमाणपत्रासाठी प्रस्ताव सादर केलेले आहेत कुणबी नोंदींची प्रक्रिया ही संथगतीने सुरु आहे दाखले मिळण्यास विलंब होत आहे ही संपूर्ण प्रक्रियाच गतिमान करण्यात यावी तसेच विविध शैक्षणिक प्रवेशासाठी जात पडताळणी प्रमाणपत्र बंधनकारक असण्याचा नियम विद्यार्थ्यांना जाचक ठरत असून जुन्या नियमाप्रमाणे जातपडताळणी प्रस्तावाच्या पोहोच पावतीवर प्रवेश देत प्रवेश प्रक्रिया पार पाडण्यात यावी अशी मागणी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे राज्य साखर संघाच्या संचालिका भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा रश्मी दिदी बागल यांनी केली,यावर मंत्री महोदय यांनी सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन दिले आहे. करमाळा तालुक्यातील विविध प्रश्न संदर्भात रश्मी बागल यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन तालुक्यातील विविध प्रश्न संदर्भात निवेदन देऊन ते सोडविण्यासाठी त्यांच्याशी चर्चा केली चर्चा सकारात्मक झाले असून विविध प्रश्न सोडवण्याचे आश्वासन महसूलमंत्र्यांनी दिले याची माहिती बागल यांनी दिली आहे.
करमाळा (प्रतिनिधी) – करमाळा येथील ग्रामदैवत श्रीजगदंबा कमलादेवी मंदिराच्या जतन व संवर्धनाच्या कामाला भाविकांचा उत्स्फूर्त…
करमाळा प्रतिनिधी : संजय गांधी निराधार योजनेची प्रकरणे मार्च महिन्यामध्ये मंजूर झाली होती त्यानंतर चार…
करमाळा प्रतिनिधी भाषा ही केवळ परीक्षेतील गुणांची बाब नसून विद्यार्थ्यांच्या विचारांना आकार देणारे आणि जगाशी…
करमाळा प्रतिनिधी - मानव एकता दिनानिमित्त संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन दिल्ली शाखा करमाळा यांचे वतीने…
करमाळा प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.…
करमाळा प्रतिनिधी दिग्वीजय बागल यांची ' मूख्यमंत्री बळीराजा पाणंद/ शेत रस्ता समिती च्या करमाळा विधानसभा…