गत वर्षी कमी पडलेल्या पावसामुळे धरण केवळ 60.66 % इतकेच भरले. त्यातच कालवा सल्लागार समितीच्या अयोग्य व ढिसाळ नियोजनामुळे बेमालूमपणे पाणी कॅनाल व नदीतून सोडण्यात आले. उजनी जलाशय काठावरील शेतकरी यास विरोध करत असताना आजी माजी लोकप्रतिनिधींनी बघ्याची भूमिका घेतली. मात्र उजनी धरणग्रस्त संघर्ष समितीने उजनीच्या पाण्याच्या ढिसाळ नियोजनाला तीव्र विरोध केला . वरच्या धरणातून पाणी सोडण्याची मागणी रेटून धरली. शासनातले मंत्री, जिल्हाधिकारी, कालवा सल्लागार समिती, याना निवेदने देऊन चर्चा घडवून आणल्या. प्रसंगी आंदोलन ही केले. निकराचा लढा उभारला .उजनी धरणग्रस्त संघर्ष समितीचा अंकुश राहिला म्हणून तरी पाणी नियोजनाच्या बेबंद शाही ला आळा बसला अन्यथा आणखीन पाणी खाली गेले असते . मात्र कुणालाच पाझर फुटला नाही . ना पाण्याचे नियोजन झाले ना वरच्या धरणातून पाणी सोडले . व्हायचे तेच झाले . पाणी पातळी निचांकीला गेली. वीज कपात आठ तासावरून सहा तास करण्यात आली.
मात्र आता उजनी पाणलोट क्षेत्रात पाऊस समाधानकारक झाल्याने तेवीस दिवसात 18.54 % इतके पाणी वाढले असून वजा 41.54 % इतका पाणी साठा झाला आहे. यामुळे उजनी जलाशय काठावरील शेती पंपाचा वीज पुरवठा पूर्ववत आठ तास करण्यात यावा अशी मागणी उजनी धरणग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रा.शिवाजी बंडगर यांनी केली आहे.
करमाळा (प्रतिनिधी) – ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शालेय प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या शासकीय दाखल्यांसाठी होणारी गैरसोय…
करमाळा प्रतिनिधी. करमाळा विधानसभा मतदारसंघात सखोल मतदार पुनर्निरीक्षण (SIR) कार्यक्रम अंतर्गत मतदार यादी अचूक करण्यासाठी…
* करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील भागवत कथा ज्ञानयज्ञ समिती व संत गजानन महाराज मंदिर समिती…
सोलापूर प्रतिनिधी शासनाच्या पगारी घेणाऱ्या सर्व शिक्षकांनी नेमणुकीच्या ठिकाणी राहणे अपेक्षित आहे असे होत नाही…
करमाळा प्रतिनिधी शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील नामांकित 'नामसाधना मॉडर्न स्कूल'…
पणजी /प्रतिनिधी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या तिसऱ्या पणजी गोवा येथे ४ मे २०२६…