गत वर्षी कमी पडलेल्या पावसामुळे धरण केवळ 60.66 % इतकेच भरले. त्यातच कालवा सल्लागार समितीच्या अयोग्य व ढिसाळ नियोजनामुळे बेमालूमपणे पाणी कॅनाल व नदीतून सोडण्यात आले. उजनी जलाशय काठावरील शेतकरी यास विरोध करत असताना आजी माजी लोकप्रतिनिधींनी बघ्याची भूमिका घेतली. मात्र उजनी धरणग्रस्त संघर्ष समितीने उजनीच्या पाण्याच्या ढिसाळ नियोजनाला तीव्र विरोध केला . वरच्या धरणातून पाणी सोडण्याची मागणी रेटून धरली. शासनातले मंत्री, जिल्हाधिकारी, कालवा सल्लागार समिती, याना निवेदने देऊन चर्चा घडवून आणल्या. प्रसंगी आंदोलन ही केले. निकराचा लढा उभारला .उजनी धरणग्रस्त संघर्ष समितीचा अंकुश राहिला म्हणून तरी पाणी नियोजनाच्या बेबंद शाही ला आळा बसला अन्यथा आणखीन पाणी खाली गेले असते . मात्र कुणालाच पाझर फुटला नाही . ना पाण्याचे नियोजन झाले ना वरच्या धरणातून पाणी सोडले . व्हायचे तेच झाले . पाणी पातळी निचांकीला गेली. वीज कपात आठ तासावरून सहा तास करण्यात आली.
मात्र आता उजनी पाणलोट क्षेत्रात पाऊस समाधानकारक झाल्याने तेवीस दिवसात 18.54 % इतके पाणी वाढले असून वजा 41.54 % इतका पाणी साठा झाला आहे. यामुळे उजनी जलाशय काठावरील शेती पंपाचा वीज पुरवठा पूर्ववत आठ तास करण्यात यावा अशी मागणी उजनी धरणग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रा.शिवाजी बंडगर यांनी केली आहे.
करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…
करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…
जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…
* करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक अकलूज…
करमाळा प्रतिनिधी सध्याच्या आधुनिक काळात पत्रकारिता क्षेत्रात मोठ्या संख्येने नवोदित आणि होतकरू तरुण वर्ग…
करमाळा : प्रतिनिधी करमाळा शहरासह तालुक्यातील नागरिकांसाठी आरोग्यसेवेच्या क्षेत्रात महत्त्वाची भर पडणार असून, जाधव-पाटील हॉस्पिटलमध्ये…