Categories: करमाळा

उजनी जलाशय पाण्याची वाढ झाल्यामुळे आठ तास वीज पुरवठा करण्याची शेतकऱ्यांची मागणी -प्राध्यापक शिवाजीराव बंडगर

करमाळा प्रतिनिधी – सन 1977 पासून आज पर्यंत 47 वर्षात सर्वात जास्त निचांकी पातळी 59.99 % गाठलेल्या उजनी धरणातील पाणी पातळी 7 जून पासून आज अखेर तेवीस दिवसात सव्वा दोन मीटर ने वाढली असून त्यामुळे उजनी जलाशय काठावरील शेतकर्यांना दिलासा मिळाला असून पातळी खालावल्याने हतबल झालेला,मेटाकुटीस आलेला शेतकरी आता आठ तास वीज पुरवठा चालू करण्याची मागणी करू लागला आहे असे मत प्राध्यापक शिवाजीराव बंडगर सर यांनी व्यक्त केले आहे.

गत वर्षी कमी पडलेल्या पावसामुळे धरण केवळ 60.66 % इतकेच भरले. त्यातच कालवा सल्लागार समितीच्या अयोग्य व ढिसाळ नियोजनामुळे बेमालूमपणे पाणी कॅनाल व नदीतून सोडण्यात आले. उजनी जलाशय काठावरील शेतकरी यास विरोध करत असताना आजी माजी लोकप्रतिनिधींनी बघ्याची भूमिका घेतली. मात्र उजनी धरणग्रस्त संघर्ष समितीने उजनीच्या पाण्याच्या ढिसाळ नियोजनाला तीव्र विरोध केला . वरच्या धरणातून पाणी सोडण्याची मागणी रेटून धरली. शासनातले मंत्री, जिल्हाधिकारी, कालवा सल्लागार समिती, याना निवेदने देऊन चर्चा घडवून आणल्या. प्रसंगी आंदोलन ही केले. निकराचा लढा उभारला .उजनी धरणग्रस्त संघर्ष समितीचा अंकुश राहिला म्हणून तरी पाणी नियोजनाच्या बेबंद शाही ला आळा बसला अन्यथा आणखीन पाणी खाली गेले असते . मात्र कुणालाच पाझर फुटला नाही . ना पाण्याचे नियोजन झाले ना वरच्या धरणातून पाणी सोडले . व्हायचे तेच झाले . पाणी पातळी निचांकीला गेली. वीज कपात आठ तासावरून सहा तास करण्यात आली.

मात्र आता उजनी पाणलोट क्षेत्रात पाऊस समाधानकारक झाल्याने तेवीस दिवसात 18.54 % इतके पाणी वाढले असून वजा 41.54 % इतका पाणी साठा झाला आहे. यामुळे उजनी जलाशय काठावरील शेती पंपाचा वीज पुरवठा पूर्ववत आठ तास करण्यात यावा अशी मागणी उजनी धरणग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रा.शिवाजी बंडगर यांनी केली आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

श्रीजगदंबा कमलादेवी मंदिराच्या जतन संवर्धनासाठी भाविकांचा वाढता प्रतिसाद; विकास चौकटे यांची ₹३,००१ देणगी

करमाळा (प्रतिनिधी) – करमाळा येथील ग्रामदैवत श्रीजगदंबा कमलादेवी मंदिराच्या जतन व संवर्धनाच्या कामाला भाविकांचा उत्स्फूर्त…

8 hours ago

संजय गांधी निराधार योजनेची प्रकरने चार महिन्यापासून मंजूर झाली नाहीत तत्काळ मंजूर करा अन्यथा आंदोलन करू – राजाभाऊ कदम

करमाळा प्रतिनिधी : संजय गांधी निराधार योजनेची प्रकरणे मार्च महिन्यामध्ये मंजूर झाली होती त्यानंतर चार…

9 hours ago

ग्रामीण विद्यार्थ्यांच्या इंग्रजी अभिव्यक्तीला जिल्हास्तरीय व्यासपीठ* *लोकशिक्षिका स्व. लीलाताई दिवेकर यांच्या स्मरणार्थ करमाळ्यात उद्या वक्तृत्व स्पर्धा

करमाळा प्रतिनिधी भाषा ही केवळ परीक्षेतील गुणांची बाब नसून विद्यार्थ्यांच्या विचारांना आकार देणारे आणि जगाशी…

1 day ago

मानव एकता दिनानिमित्त संत निरंकारी मंडळाच्या शिबीरात १६६ जणांचे रक्तदान*

करमाळा प्रतिनिधी - मानव एकता दिनानिमित्त संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन दिल्ली शाखा करमाळा यांचे वतीने…

2 days ago

जयकुमार गोरे यांच्यावरील आक्षेपार्ह वक्तव्याचा करमाळ्यात भाजपकडून तीव्र निषेध

  करमाळा प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.…

3 days ago

नाशवंत गोष्टीकडे दुर्लक्ष करून शाश्वत गोष्टी लक्षात घेवून युवकांनी समाजकारण व राजकारणातून जनतेची सेवा करावी . – मा .आ जयवंतराव जगताप

करमाळा प्रतिनिधी दिग्वीजय बागल यांची ' मूख्यमंत्री बळीराजा पाणंद/ शेत रस्ता समिती च्या करमाळा विधानसभा…

3 days ago