करमाळा तालुक्यातील ४० गावांतील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारी रिटेवाडी उपसा सिंचन योजना आहे.रश्मी दिदी बागल यांनी पक्ष प्रवेश करते वेळी एकच प्रमुख मागणी केली होती ती म्हणजे रिटेवाडी उपसा सिंचन योजना मंजूर करावी. याची दखल घेत उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अधीक्षक अभियंता सिंचन भवन पुणे यांना आवश्यक लागणारा निधी उपलब्ध करून देणे विषयी अंदाजपत्रक सादर करण्याचे आदेश दिले आहेत. पुढील आठवड्यात सदरील योजनेच्या सर्व्हे साठी जवळपास ४५ लाख रुपये एवढ्या निधीची तरतूद होणार आहे.भाजप प्रदेशउपाध्यक्ष रश्मी दिदी बागल यांच्या पाठपुराव्याला यश मिळत असून तालुक्यातील पांढरेवाडी व केम- वडशिवने उपसा सिंचन योजने साठी शासन दरबारी पाठपूरावा सुरू आहेत.रीटेवाडी उपसा सिंचन योजना तात्काळ पूर्ण होऊन शेतकऱ्यांच्या शेतात पाणी येऊन आमचा हा भाग सुजलाम् सुफलाम् होणे विषयी आम्ही सातत्याने प्रयत्न राहीन असेही मकाई सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन भाजपचे युवा नेते दिग्विजय बागल यांनी बोलताना सांगितले.
करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…
करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…
जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…
* करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक अकलूज…
करमाळा प्रतिनिधी सध्याच्या आधुनिक काळात पत्रकारिता क्षेत्रात मोठ्या संख्येने नवोदित आणि होतकरू तरुण वर्ग…
करमाळा : प्रतिनिधी करमाळा शहरासह तालुक्यातील नागरिकांसाठी आरोग्यसेवेच्या क्षेत्रात महत्त्वाची भर पडणार असून, जाधव-पाटील हॉस्पिटलमध्ये…