करमाळा तालुक्यातील ४० गावांतील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारी रिटेवाडी उपसा सिंचन योजना आहे.रश्मी दिदी बागल यांनी पक्ष प्रवेश करते वेळी एकच प्रमुख मागणी केली होती ती म्हणजे रिटेवाडी उपसा सिंचन योजना मंजूर करावी. याची दखल घेत उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अधीक्षक अभियंता सिंचन भवन पुणे यांना आवश्यक लागणारा निधी उपलब्ध करून देणे विषयी अंदाजपत्रक सादर करण्याचे आदेश दिले आहेत. पुढील आठवड्यात सदरील योजनेच्या सर्व्हे साठी जवळपास ४५ लाख रुपये एवढ्या निधीची तरतूद होणार आहे.भाजप प्रदेशउपाध्यक्ष रश्मी दिदी बागल यांच्या पाठपुराव्याला यश मिळत असून तालुक्यातील पांढरेवाडी व केम- वडशिवने उपसा सिंचन योजने साठी शासन दरबारी पाठपूरावा सुरू आहेत.रीटेवाडी उपसा सिंचन योजना तात्काळ पूर्ण होऊन शेतकऱ्यांच्या शेतात पाणी येऊन आमचा हा भाग सुजलाम् सुफलाम् होणे विषयी आम्ही सातत्याने प्रयत्न राहीन असेही मकाई सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन भाजपचे युवा नेते दिग्विजय बागल यांनी बोलताना सांगितले.
करमाळा प्रतिनिधी: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात…
करमाळा प्रतिनिधी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी आपण…
* करमाळा प्रतिनिधी डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे संस्थापक महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री. राजा माने…
करमाळा प्रतिनिधी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांचे वडील, कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे…
करमाळा प्रतिनिधी: विद्या विकास मंडळचे अध्यक्ष तथा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांशी संबंधित नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालयाचे…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील विद्या विकास मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व…