Categories: करमाळा

उजनी जलाशयाच्या काठावरील शेतीपंपाचा वीजपुरवठा पूर्वीप्रमाणे म्हणजे आठ तास तातडीने सुरळीत करण्याची मागणी -दिग्विजय बागल

करमाळा प्रतिनिधी- उजनी जलाशयाच्या काठावरील शेतीपंपाचा वीजपुरवठा पूर्वीप्रमाणे म्हणजे आठ तास तातडीने सुरळीत करण्यात यावा असे आवाहन मकाई कारखान्याचे माजी चेअरमन व जिल्हा भाजपाचे युवा नेते दिग्विजय बागल यांनी आज केले. याबाबत अधिक बोलताना श्री. बागल म्हणाले की गतवर्षी अपुऱ्या पर्जन्यामुळे उजनी धरण केवळ 60 टक्के भरले होते. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये उजनी धरणाची पाणी पातळी झपाट्याने खालावली व वजा 60 टक्के धरण झाले. त्यामुळे प्रशासनाने उजनीकाठावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा आठ तासाच्या ऐवजी सहा तास केला होता. परंतु सध्या सर्वत्र पडत असलेल्या समाधानकारक पावसामुळे उजनी धरणांमधील पाणी पातळी हळूहळू वाढत असून उजनी धरण सध्या वजा 32 टक्के इतके झाले आहे. पुणे, मावळ व उजनी लाभक्षेत्रात सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे थोड्याच दिवसात उजनी धरण भरण्याची शक्यता असून, तसे आशादायक चित्र निर्माण झाले आहे. सध्या उजनी धरणाची वाढत चाललेली पाणी पातळी लक्षात घेता उजनी जलाशयाच्या काठावरील शेतकऱ्यांचा वीज पुरवठा पूर्वीप्रमाणे म्हणजे आठ तास सुरळीत करण्यात यावा अशी उजनी काठावरील शेतकऱ्यांची मागणी आहे. सध्या सहा तास वीज पुरवठा चालू असल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. याशिवाय सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील चांगला पाऊस झाल्याने सध्या पाण्याची मागणी सर्वत्र कमीच आहे. तरी जिल्हा प्रशासनाने उजनी जलाशयाच्या काठावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत म्हणजे सलग आठ तास करावा, याबाबत आपण स्वतः माननीय जिल्हाधिकारी यांना पत्राद्वारे विनंती केली असून लवकरच याबाबत निश्चित कार्यवाही होईल, असे शेवटी श्री. बागल यांनी सांगितले.

saptahikpawanputra

Recent Posts

मानव एकता दिनानिमित्त संत निरंकारी मंडळाच्या शिबीरात १६६ जणांचे रक्तदान*

करमाळा प्रतिनिधी - मानव एकता दिनानिमित्त संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन दिल्ली शाखा करमाळा यांचे वतीने…

57 seconds ago

जयकुमार गोरे यांच्यावरील आक्षेपार्ह वक्तव्याचा करमाळ्यात भाजपकडून तीव्र निषेध

  करमाळा प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.…

23 hours ago

नाशवंत गोष्टीकडे दुर्लक्ष करून शाश्वत गोष्टी लक्षात घेवून युवकांनी समाजकारण व राजकारणातून जनतेची सेवा करावी . – मा .आ जयवंतराव जगताप

करमाळा प्रतिनिधी दिग्वीजय बागल यांची ' मूख्यमंत्री बळीराजा पाणंद/ शेत रस्ता समिती च्या करमाळा विधानसभा…

23 hours ago

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त करमाळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

  करमाळा प्रतिनिधी : मुक्ता साळवे शैक्षणिक अभियान, करमाळा यांच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे…

24 hours ago

शासकीय कामकाजाचे प्रत्यक्ष धडे! ‘नामसाधना’च्या चिमुकल्यांनी स्वतः अर्ज लिहून मांडल्या समस्या; मुख्याधिकाऱ्यांकडून कौतुक

करमाळा (प्रतिनिधी): विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांना लहानपणापासूनच दैनंदिन जीवन, प्रशासकीय कामकाज, शासकीय…

2 days ago