मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यामध्ये सर्वाधिक चर्चेचा आणि महत्त्वाचा असल्याने येत्या काळामध्ये शैक्षणिक दृष्ट्या सरकारकडे मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणींविषयी सरकारकडे कोणत्या प्रकारची मागणी असायला हवी तसेच समाजाच्या काय अडचणी आहेत हे मनोज दादा जरांगे पाटील आणि झोळ सरांच्या मध्ये झालेल्या चर्चेचे प्रमुख मुद्दे होते.
यामध्ये
२) SEBC, OBC व इतर सर्वच जातींना जात पडताळणी प्रमाणपत्र प्रवेशावेळी सादर करावे लागते हे प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत सहा महिने वाढवण्यात यावी.
३) १०० % फी माफी ही सरसकट सर्व मुलींना देण्यात यावी सध्याच्या शासन निर्णया नुसार OPEN प्रवर्गातील मुलींना वगळण्यात आले आहे. यामध्ये OPEN प्रवर्गातील मुलींचा देखील समावेश करण्याची मागणी जरांगे पाटील यांच्याकडे करण्यात आली.
४) ओबीसीच्या विद्यार्थ्यांना सरसकट वस्तीगृह भत्ता देण्यात यावा सध्या प्रत्येक जिल्ह्यासाठी ६००विद्यार्थ्यांना भत्ता देण्याची तरतूद शासनाच्या पत्रकात आहे.हा नियम बदलून OBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना डॉ.पंजाबराब देशमुख वसतिगृह भत्ता प्रमाणे सरसकट भत्ता देण्यात यावा.यामुळे आता कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.
करमाळा, प्रतिनिधी : करमाळा येथील श्री संत नामदेव शिंपी समाजाच्या वतीने श्रीसंत नामदेव शिंपी महाराज…
करमाळा प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसचे करमाळा तालुकाध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य भरत (भाऊ) आवताडे यांच्या…
* करमाळा, प्रतिनिधी : करमाळा शहरातील शाहूनगर परिसरातील नागरिकांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या पाणीप्रश्नाच्या निराकरणाच्या दिशेने…
करमाळा (प्रतिनिधी) – करमाळा येथील ग्रामदैवत श्रीजगदंबा कमलादेवी मंदिराच्या जतन व संवर्धनाच्या कामाला भाविकांचा उत्स्फूर्त…
करमाळा प्रतिनिधी : संजय गांधी निराधार योजनेची प्रकरणे मार्च महिन्यामध्ये मंजूर झाली होती त्यानंतर चार…
करमाळा प्रतिनिधी भाषा ही केवळ परीक्षेतील गुणांची बाब नसून विद्यार्थ्यांच्या विचारांना आकार देणारे आणि जगाशी…