Categories: करमाळा

मराठा व ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांना नोकरी शैक्षणिक विकासासाठी शासनाने आरक्षणासंदर्भात अटी शिथिल करून न्याय देण्याची प्राध्यापक रामदास झोळ यांची मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्याकडे मागणी

*करमाळा प्रतिनिधी मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी केले असून शासनाने मराठा व ओबीसी सवलती शिथील कराव्यात अशी मागणी दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक रामदास झोळसर यांनी मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्याकडे अंतरवली सराटी येथे भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे. अंतरवाली सराटी येथे संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांची भेट घेऊन वाढदिवसानिम्मित सत्कार करून दिर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी शैक्षणिक धोरणाबाबत प्राध्यापक रामदास झोळसर म्हणाले की मराठा ओबीसी समाजाला जातपडताळणी शैक्षणिक अडचणी येत आहेत वस्तीगृह भत्ता याबाबत शासनाने अटी शिथिल करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले .याबाबत आपण आवाज उठवल्यानंतर सकारात्मक निर्णय होईल.याचबरोबर मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सोलापूर येथे सात ऑगस्टला होणाऱ्या शांतता रॅली संदर्भात चर्चा करण्यात आली .यावेळी त्यांच्यासोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रवींद्र गोडगे, गणेश मंगवडे, प्रशांत नाईकनवरे ,निलेश शिंदे ,सुहास काळे पाटील, भीमराव ननवरे हे उपस्थित होते. यावेळी प्राध्यापक रामदास झोळ यांनी मनोज दादा जरांगे पाटील यांच्याशी नोकरी, शिक्षण व आरक्षण यामध्ये सध्या उद्भवत असलेल्या अडचणी या मुद्द्यांवर चर्चा केली. यामध्ये,*
1. सामान्य प्रशासन विभागाने जात पडताळणी बाबत काढलेल्या शासन निर्णयामध्ये फक्त SEBC च्या विद्यार्थ्यांना सहा महिन्याची मुदत दिलेली आहे. ती मुदतवाढ सरसकट सर्व मागासवर्गीय जातींना देण्यात यावी.
2. बहुजन समाज कल्याण विभागाने 14 जून 2024 रोजी काढलेला 1554 अभ्यासक्रमा बाबतचा शासन निर्णय SEBC,EWS व OPEN च्या विद्यार्थ्यांना लागू करावा.
3. केंद्र सरकारचे EWS आरक्षण SEBC च्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी लागू करावे.
4. OBC च्या विद्यार्थ्यांना वस्तीग्रह भत्ता डॉ. पंजाबराव देशमुख वस्तीग्रह भत्याप्रमाणे सरसकट लागू करावा.
इत्यादी विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.असुन याबाबत शासनाने विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी शिक्षणासाठी नोकरीसाठी आरक्षणासंदर्भात अटी शिथिल करून या समाजाला न्याय मिळवून देऊ असा विश्वास मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला असल्याचे सांगितले.

saptahikpawanputra

Recent Posts

अखंड हिंदुस्तानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त १९ फेब्रुवारीला करमाळ्यात भव्य रक्तदान शिबीर

करमाळा प्रतिनिधी: अखंड हिंदुस्तानचे दैवत म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त करमाळा शहरात…

7 hours ago

जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना; १ मार्च रोजी पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी होणार-पृथ्वीराज पाटील

करमाळा प्रतिनिधी: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात…

11 hours ago

बार्शीचे मा.आमदार राजाभाऊ राऊत यांना विधानपरिषदेवर संधी द्यावी – माजी आमदार जयवंतराव जगताप

करमाळा प्रतिनिधी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी आपण…

17 hours ago

डिजिटल मिडिया पत्रकार संपादक संघटनेचे अध्यक्ष राजा माने यांना दुबईत “पत्रकाररत्न” आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मान

* करमाळा प्रतिनिधी डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे संस्थापक महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री. राजा माने…

23 hours ago

यशवंत परिवाराच्या वतीने स्व. अर्जुन तात्या फंड सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली

करमाळा प्रतिनिधी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांचे वडील, कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे…

1 day ago

विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांना पितृशोक; अर्जुन तात्या फंड सर यांचे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी: विद्या विकास मंडळचे अध्यक्ष तथा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांशी संबंधित नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालयाचे…

2 days ago