Categories: करमाळा

NO NPS,NO GPS,NO UPS ,आम्हाला हवी OPS- श्री तात्यासाहेब जाधव जिल्हानेते,जुनी पेन्शन संघटना सोलापूर

करमाळा प्रतिनिधी NO NPS,NO GPS,NO UPS ,आम्हाला हवी OPS  अशी मागणी  श्री तात्यासाहेब जाधव जिल्हानेते,जुनी पेन्शन संघटना यांनी केली  आहे.याबाबत पुढे बोलताना सांगितले आहे की अखेर Vote for OPS या सरकारी कर्मचाऱ्यांच्या नाऱ्याचा परिणाम झालाच…आजकेंद्र सरकारने युनिफाईड पेन्शन स्कीम (UPS)योजनेस मंजुरी दिली.

*गेल्या वर्षी याच दिवसात दिल्लीत ऐतिहासिक पेन्शन रॅली झाली…सरकारने त्यावेळी त्याकडे तितके गांभीर्याने लक्ष दिले नाही…लाखो लोक सरकारी कर्मचारी येवून वोट फॉर ओपीएसचा नारा देत होते आणि त्या नाऱ्याच्या परिणामांची दखल आज घ्यावी लागली… परंतु ही नव्याने आलेली योजना प्रथमदर्शनी NPS योजनेचे सुधारित रूप आहे.शासनाने आता NPS शासन हिस्सा 18 टक्के करत निश्चित नवीन NPS घ्यावी का UPS याचा विकल्प निवडावा हा पेच निर्माण केला आहे.कारण 25 वर्षे महिन्याच्या पगाराच्या 28% रक्कम पेन्शन योजनेसाठी शेअर मार्केटमध्ये गुंतवून एक निश्चित रक्कम UPS(Unified pension scheme) पेन्शन मध्ये घ्यावी की NPS(National pension scheme) मधून अधिक रक्कम मिळेल हा गोंधळ निर्माण होणार.मूळ OPS (old pension scheme) या मागणी पासून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न नाही ना?? याचा विचार ही करायला हवा….*

सध्या प्राथमिक माहिती नुसार कशी असेल नवीन पेन्शन UPS योजना

• जर एखाद्या कर्मचाऱ्याने किमान 25 वर्षे काम केले असेल, तर त्याला निवृत्तीपूर्वीच्या शेवटच्या 12 महिन्यांच्या बेसिक पगाराच्या किमान 50 टक्के पेन्शन नक्कीच मिळेल.

• जर कर्मचाऱ्याने 10 वर्षांनी नोकरी सोडली तर कर्मचाऱ्यांना 10,000 रुपये पेन्शन मिळेल.

• सध्या कर्मचाऱ्यांचा 10 टक्के वाटा आहे तर केंद्र सरकारचा 14 टक्के हिस्सा आहे. मात्र यापुढे केंद्र सरकार 18 टक्के हिस्सा असेल.

• 1 जानेवारी 2004 नंतर रुजू झालेल्या परंतु सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनाही ही नवीन योजना लागू होईल.

• कर्मचाऱ्यांना NPS किंवा UPS यापैकी एक निवडण्याचा पर्याय असेल.

या चळवळीत अनेक वर्षे काम करणाऱ्या माझ्या सारख्या कार्यकर्त्याला या योजनेबद्दल तातडीने मत व्यक्त करताना एकच सांगायचे आहे…आमची मागणी जुनी पेन्शन योजनेची आहे..योजनेचे नाव सरकारने कोणतेही द्यावे.फक्त त्यासाठी सेवेत असताना जो पगार मिळतो त्यातून कोणत्याही प्रकारची रक्कम पेन्शन योजनेसाठी कपात करू नये हे नवीन योजनेचे मूळ असायला हवे…पण पुन्हा शासन हिस्सा वाढवून देवून योजेनेवर महिन्याला कर्मचारी सेवेत असेपर्यंत 30 ते 35 वर्ष वेतनाच्या 28 टक्के खर्च करण्यापेक्षा सेवानिवृत्तीनंतर सरकारी कर्मचाऱ्याला पूर्वापार चालत असलेल्या धोरणानुसार पेन्शन द्यायला हवी.

नुकतेच लोकसभेत सरकारने पेन्शन योजनेबाबत कोणताही विचार सुरू नसल्याचे बोलले होते. पण आज केंद्र सरकारने नवीन पेन्शन योजना मंजूर केली.हे होऊ शकले केवळ आपल्या एकजुटीने… जुनी पेन्शनच्या आंदोलनासाठी आपल्या तालुक्याच्या,जिल्ह्याच्या ठिकाणी, त्याचबरोबर मुंबई, नागपूर,दिल्ली मध्ये येणारे बंधू भगिनी यांच्या एकजुटीचे हे यश आहे…NMOPS या आपल्या देशपातळीवर काम करणाऱ्या संघटनेचे नेतृत्व करणारे विजयकुमार बंधू,वितेश खांडेकर या नेतृत्व करणाऱ्या मंडळींचा त्याग आहे…आता आपली ही वज्रमूठ अधिक घट्ट करूया… *जुनी पेन्शनची रेल्वे दूर गेली म्हणणाऱ्यांनी आज NPS च्या रेल्वेची चेन ओढली आहे… पण आपल्याला यूपीएससी रेल्वेत बसायचे नाही… आपण पुन्हा एकदा ओपीएस ची रेल्वे स्टेशन वरून सोडायला लावायची आहे..त्यासाठी नोकरीच्या शेवटच्या दिवसापर्यंत संघर्ष करण्याची तयारी आपण सर्वांनी ठेवू…*शासकीय कर्मचाऱ्यांना हव्या असणाऱ्या जुन्या पेंशन साठी 15 सप्टेंबर 2024 रोजी शिर्डी येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटनेच्या महाअधिवेशनात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा नेते श्री तात्यासाहेब जाधव यांनी केले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

अखंड हिंदुस्तानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त १९ फेब्रुवारीला करमाळ्यात भव्य रक्तदान शिबीर

करमाळा प्रतिनिधी: अखंड हिंदुस्तानचे दैवत म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त करमाळा शहरात…

7 hours ago

जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना; १ मार्च रोजी पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी होणार-पृथ्वीराज पाटील

करमाळा प्रतिनिधी: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात…

11 hours ago

बार्शीचे मा.आमदार राजाभाऊ राऊत यांना विधानपरिषदेवर संधी द्यावी – माजी आमदार जयवंतराव जगताप

करमाळा प्रतिनिधी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी आपण…

17 hours ago

डिजिटल मिडिया पत्रकार संपादक संघटनेचे अध्यक्ष राजा माने यांना दुबईत “पत्रकाररत्न” आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मान

* करमाळा प्रतिनिधी डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे संस्थापक महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री. राजा माने…

23 hours ago

यशवंत परिवाराच्या वतीने स्व. अर्जुन तात्या फंड सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली

करमाळा प्रतिनिधी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांचे वडील, कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे…

1 day ago

विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांना पितृशोक; अर्जुन तात्या फंड सर यांचे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी: विद्या विकास मंडळचे अध्यक्ष तथा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांशी संबंधित नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालयाचे…

2 days ago