करमाळा(प्रतिनिधी) – करमाळा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दहीगाव पाणी पुरवठा योजनेत तांत्रिक बिघाडामुळे वारंवार पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे हे
माहीत असताना पालिकेने या कामी लागणाऱ्या निधीच्या मागणीचा प्रस्ताव का दिला नाही ? असा सवाल आमदार संजयमामा शिंदे यांनी पालिका प्रशासनाला केला आहे.१९९३ साली सुरू झालेल्या योजनेसाठी दहीगाव येथून पाणी उपसा करणारे २४० अश्वशक्तीचे दोन व २०० अश्वशक्तीच्या विद्युतपंपांमध्ये वारंवार बिघाड होत असल्याने पाणीपुरवठा विस्कळीत होणे,शहरांतर्गत असलेल्या जलवाहिन्या खराब झाल्याने बऱ्याच ठिकाणी अपुरा व दूषित पाणीपुरवठा होणे या प्रकारांमुळे शहरवासीयांमध्ये वाढता असंतोष आहे.
याविषयीच्या अडचणी जाणून घेण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार, मकाईचे माजी संचालक विवेक येवले यांनी न.प.पाणीपुरवठा विभागाचे अभियंता फिरोज शेख यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांच्यासमवेत आमदार शिंदे यांच्याशी चर्चा केली.त्यावेळी शेख यांनी दोन नवीन विद्युतपंप घेण्यासाठी व अन्य दुरुस्तीसाठी किमान दोन कोटी रुपये निधीची गरज आहे व न.पा. फंडात पैसे नसल्याचे सांगितले.त्यावर आ.शिंदे यांनी हा प्रश्न आज उदभवलेला नाही, मग आजवर तुम्ही या विषयी का गप्प राहिलात ? असा सवाल उपस्थित करून सदरचा निधी मागणीचा प्रस्ताव ताबडतोब जिल्हाधिकाऱयांमार्फत सादर करा,मी निधी उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करतो असे सांगितले.यावेळी माजी नगरसेवक रामकृष्ण माने,अर्बन बँकेचे माजी व्हा.चेअरमन फारूक जमादार, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष विजयराव पवार उपस्थित होते.
करमाळा, प्रतिनिधी १ मे २०२६ — कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत करमाळा येथे…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्याच्या पूर्व भागाची वरदायिनी असलेल्या दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या उन्हाळी आवर्तनाचा बोजवारा…
करमाळा, प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराजांविषयी कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या पार्श्वभूमीवर करमाळा तालुक्यात राजकीय वातावरण…
पंढरपूर प्रतिनिधी : पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरलेले भव्य मोफत आरोग्य…
करमाळा(प्रतिनिधी) - येणाऱ्या विधान परिषद निवडणुकीत सुनेत्रा वहिनींनी सोलापूर जिल्ह्याचे नेते,स्व.अजितदादांचे सदैव निष्ठावंत समर्थक असलेले…
करमाळा (प्रतिनिधी): केंद्र सरकारच्या दहा हजार शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्याच्या धोरणांतर्गत करमाळा तालुक्यात स्थापन…