Categories: Uncategorized

करमाळा नगरपालिकेने पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास नगरपालिकेवर हंडा मोर्चा काढण्याचा शिवसेना शहर प्रमुख सौ. कीर्ती स्वामी यांचा इशारा

करमाळा प्रतिनिधी उजनी धरण १००% काटोकाठ भरलेले असताना नगरपालिकेच्या नियोजन शून्य कारभारामुळे करमाळा शहरात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून प्रशासनात तात्काळ याबाबत योग्य ती कारवाई करून पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास नगरपालिकेवर शिवसेना महिला आघाडी घागर मोर्चा काढील असा इशारा शहर प्रमुख कीर्ती स्वामी यांनी दिला आहे. त्यांनी याबाबतचे निवेदन नगरपालिकेचे मुख्याधिकारी सचिन तपसे यांना दिले आहे .यावेळी आरती स्वामी, जया दसंगे, उज्वला शिंदे, आरती सूर्यपुजारी, मंगेश सूर्यपुजारी, बबलू कुलकर्णी, उमेश वनारसे, विजय देशपांडे रमेश वायकर आदी नागरिक उपस्थित होते.विशेषता खडक पुरावर पाणी येत नाही. नगरपालिकेकडे वारंवार तक्रार केली असता उडवा उडवीचे उत्तरे दिली जातात.. बिलापोटी दिलेल्या रकमेचा वापर कशासाठी केला असा प्रश्नही महिलांनी उपस्थित केला आहे. केवळ पाणीपुरवठा सुरू करायचा नावाखाली रोज हजारो रुपयांची बिले नगरपालिकेतून वसूल केली जातात. मात्र पाणीपुरवठा सुरळीत होत नाही त्याचप्रमाणे शहरात डेंगूची प्रचंड साथ पसरली असून डासाचे प्रमाण वाढले आहे. कोणतीही जंतुनाशके वापरली जात नाहीत. नगरपालिकेचे  फॉगिंग मशिन बंद आहे तालुक्याचे आमदार व इतर लोकप्रतिनिधी पाण्याच्या प्रश्नाकडे लक्ष देत नाहीत. गेल्या वर्षी नियोजन मंडळातून पाईपलाईन दुरुस्तीसाठी १६ लाख रुपये ठेकेदाराला नगरपालिकेने आणलेली जंतुनाशक पावडर बोगस आहे. या सर्व प्रश्नांवर जनता संतप्त झाली असून आता शिवसेना आग्रही झाली आहे . लवकरात लवकर प्रश्न मार्गी न लागल्यास प्रसंगी बांगडी मोर्चा काढला जाईल असा इशाराही दिला आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

श्रीजगदंबा कमलादेवी मंदिराच्या जतन संवर्धनासाठी भाविकांचा वाढता प्रतिसाद; विकास चौकटे यांची ₹३,००१ देणगी

करमाळा (प्रतिनिधी) – करमाळा येथील ग्रामदैवत श्रीजगदंबा कमलादेवी मंदिराच्या जतन व संवर्धनाच्या कामाला भाविकांचा उत्स्फूर्त…

8 hours ago

संजय गांधी निराधार योजनेची प्रकरने चार महिन्यापासून मंजूर झाली नाहीत तत्काळ मंजूर करा अन्यथा आंदोलन करू – राजाभाऊ कदम

करमाळा प्रतिनिधी : संजय गांधी निराधार योजनेची प्रकरणे मार्च महिन्यामध्ये मंजूर झाली होती त्यानंतर चार…

9 hours ago

ग्रामीण विद्यार्थ्यांच्या इंग्रजी अभिव्यक्तीला जिल्हास्तरीय व्यासपीठ* *लोकशिक्षिका स्व. लीलाताई दिवेकर यांच्या स्मरणार्थ करमाळ्यात उद्या वक्तृत्व स्पर्धा

करमाळा प्रतिनिधी भाषा ही केवळ परीक्षेतील गुणांची बाब नसून विद्यार्थ्यांच्या विचारांना आकार देणारे आणि जगाशी…

1 day ago

मानव एकता दिनानिमित्त संत निरंकारी मंडळाच्या शिबीरात १६६ जणांचे रक्तदान*

करमाळा प्रतिनिधी - मानव एकता दिनानिमित्त संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन दिल्ली शाखा करमाळा यांचे वतीने…

2 days ago

जयकुमार गोरे यांच्यावरील आक्षेपार्ह वक्तव्याचा करमाळ्यात भाजपकडून तीव्र निषेध

  करमाळा प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.…

3 days ago

नाशवंत गोष्टीकडे दुर्लक्ष करून शाश्वत गोष्टी लक्षात घेवून युवकांनी समाजकारण व राजकारणातून जनतेची सेवा करावी . – मा .आ जयवंतराव जगताप

करमाळा प्रतिनिधी दिग्वीजय बागल यांची ' मूख्यमंत्री बळीराजा पाणंद/ शेत रस्ता समिती च्या करमाळा विधानसभा…

3 days ago