Categories: करमाळा

करमाळा शहरातील पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास बांगडी घागर मोर्चा काढण्यात येईल नगरसेविका स्वातीताई फंड यांचे मुख्याधिकारी यांना निवेदन*

*करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास बांगडी घागर मोर्चा काढण्यात येईल असे निवेदन नगरसेविका सौ स्वातीताई फंड यांनी मुख्याधिकारी सचिन तपसे यांना निवेदन दिले आहे. सदर निवेदन देतेवेळी रूपाली यादव, शशिकला मांगले, कोमल हसीजा,सोनिया राठोड जया कोरपे पूजा पंडित ज्योती भोसले रेश्मा आवटे,शुभांगी थोरात मनिषा जगदाळे सुमय्या काझी संगीता दारूवाले प्रिया घुमरे वेणु राणे ,शियाळ भाभी उपस्थित होते. त्यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे.उजनी धरण १००% भरलेले असताना नगरपालिकेच्या नियोजन शून्य कारभारामुळे करमाळा शहरात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे . एक दिवसाआड पाणी सुरू होणे गरजेचे असताना चार दिवसाला एकदा पाणी येत कधी पाईपलाईन खराब झाली आहे .तर कधी ‌ लाईटचा प्रॉब्लेम झाला आहे . अशी कारणे दिले जात आहे ‌ नाचता येईना अंगण वाकडे ‌ अशी परिस्थिती झाली आहे . करमाळा आणि पाण्या वाचून तरमाळ दसरा दिवाळी सण तोंडावर असतानाही पाण्याची कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे. पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी प्रशासन यांचा कारभार रामभरोसे चालू असून करमाळा नगरपालिकेला कुणी वालीच राहिला नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.. नगरपालिकेकडे वारंवार तक्रार केली असता उडवा उडवीचे उत्तरे दिली जातात.बिलापोटी दिलेल्या रकमेचा वापर कशासाठी केला असा प्रश्नही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. केवळ पाणीपुरवठा सुरू करायचा नावाखाली रोज हजारो रुपयांची बिले नगरपालिकेतून वसूल केली जातात. मात्र पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. त्याचप्रमाणे शहरात डेंगूची प्रचंड साथ पसरली असून डासाचे प्रमाण वाढले आहे. कोणतीही जंतुनाशके वापरली जात नाहीत. नगरपालिकेचे फॉगिंग मशिन बंद आहे ‌.आरोग्याचे ठेक्याचे बिल मात्र निघत आहे.पाण्याच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देत नाहीत. या सर्व प्रश्नांवर जनता संतप्त झाली असून . लवकरात लवकर प्रश्न मार्गी न लागल्यास प्रसंगी नगरपालिका प्रशासनाला बांगडी भरण्याचा घागर मोर्चा काढला जाईल असा इशारा नगरसेविका सौ. स्वातीताई फंड यांनी दिला आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना; १ मार्च रोजी पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी होणार-पृथ्वीराज पाटील

करमाळा प्रतिनिधी: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात…

8 mins ago

बार्शीचे मा.आमदार राजाभाऊ राऊत यांना विधानपरिषदेवर संधी द्यावी – माजी आमदार जयवंतराव जगताप

करमाळा प्रतिनिधी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी आपण…

6 hours ago

डिजिटल मिडिया पत्रकार संपादक संघटनेचे अध्यक्ष राजा माने यांना दुबईत “पत्रकाररत्न” आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मान

* करमाळा प्रतिनिधी डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे संस्थापक महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री. राजा माने…

12 hours ago

यशवंत परिवाराच्या वतीने स्व. अर्जुन तात्या फंड सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली

करमाळा प्रतिनिधी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांचे वडील, कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे…

21 hours ago

विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांना पितृशोक; अर्जुन तात्या फंड सर यांचे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी: विद्या विकास मंडळचे अध्यक्ष तथा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांशी संबंधित नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालयाचे…

1 day ago

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात बारावीची परीक्षा उत्साहात; ११०४ विद्यार्थी केंद्रावर परीक्षार्थी

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील विद्या विकास मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व…

2 days ago