समरसता साहित्य परिषद महाराष्ट्रच्यावतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राज्यस्तरीय खुल्या लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती समरसता साहित्य परिषदेच्या सोलापूर शाखेचे अध्यक्ष प्रा. माधव कुलकर्णी, महिला आयाम प्रमुख वसुंधरा शर्मा-कुलकर्णी यांनी दिली.
अहिल्यादेवी : न्यायप्रिय आदर्श प्रशासक व समाज सुधारक, अहिल्यादेवींचे धर्मकार्य व राष्ट्रीय दृष्टिकोन, अहिल्यादेवी होळकर भारतीय स्त्री चिंतनाच्या आदर्श, अहिल्यादेवींचे जीवन कार्य, आजच्या युगातील प्रासंगिकता, अहिल्यादेवी व पारंपरिक स्थापत्य आणि कलाविकास असे विषय या स्पर्धेसाठी आहेत. या राज्यस्तरीय लेखन स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक दहा हजार एक रुपये, द्वितीय पारितोषिक सात हजार एक रुपये, तृतीय पारितोषिक पाच हजार एक रुपये, उत्तेजनार्थ तीन हजार एक रुपये तसेच जिल्हास्तरावर विशेष बक्षिसे आहेत. या लेखासाठी 800 ते 1000 शब्दांची मर्यादा आहे. कोणत्याही एका विषयावर लेख पूर्ण टाइप करून किंवा सुंदर हस्ताक्षरात लिहावा. त्यावर स्पर्धकाचे नाव, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी आणि जिल्हा लिहून ीरारीरीरींरारहसारळश्र.लेा या ई-मेलवर 10 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 5 पर्यंत पाठवावा. ई-मेल वर लेख पाठवताना विषयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी खुली लेखन स्पर्धा असा उल्लेख करावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…
जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…
* करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक अकलूज…
करमाळा प्रतिनिधी सध्याच्या आधुनिक काळात पत्रकारिता क्षेत्रात मोठ्या संख्येने नवोदित आणि होतकरू तरुण वर्ग…
करमाळा : प्रतिनिधी करमाळा शहरासह तालुक्यातील नागरिकांसाठी आरोग्यसेवेच्या क्षेत्रात महत्त्वाची भर पडणार असून, जाधव-पाटील हॉस्पिटलमध्ये…
करमाळा: प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा सातत्याने खंडित करणे आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज वीज…