Categories: करमाळा

रिटेवाडी उपसा सिंचन योजना लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी, सर्वांगीण विकासासाठी मला एक वेळ आमदार म्हणून निवडून द्या -प्रा. रामदास झोळ सर

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्याच्या उत्तर भागातील शेतीच्या पाण्याचा कायमचा प्रश्न सोडविण्यासाठी, उजनीतील अतिरिक्त पाणी उचलून उत्तर भागाला देण्यासाठी, रिटेवाडी उपसा सिंचन योजना लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी, सर्वांगीण विकासासाठी मला एक वेळ आमदार म्हणून निवडून द्या, असे मत प्रा.रामदास झोळ सर यांनी व्यक्त केले आहे. मौजे वीट ता. करमाळा येथील जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शेतकरी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ आण्णा कांबळे, काॅग्रेसचे जेष्ठ नेते हरीभाऊ मंगवडे, ओबीसी काँग्रेस तालुकाध्यक्ष गफुर शेख, मकाईचे माजी संचालक सुभाष शिंदे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्यध्यक्ष रवींद्र गोडगे, जिल्हा युवा नेते गणेश मंगवडे, तालुकाध्यक्ष सुदर्शन शेळके, वाशिंबेचे माजी सरपंच भगवान डोंबाळे, प्रशांत बागल, स्वाभिमानी शेतकरी संघटना तालुका उपाध्यक्ष सुहास काळे-पाटील, भीमराव ननवरे, चंद्रशेखर जगताप, संभाजी शिंदे उपस्थित होते. यावेळी शेतकरी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ आण्णा कांबळे म्हणाले की, चार उमेदवारांमध्ये प्रा. रामदास झोळ सर उच्चशिक्षित, सुसंस्कृत, अभ्यासू, प्रामाणिक, नेतृत्व आहे. गटातटाच्या नेत्यांना बाजूला सारून प्रा. रामदास झोळ सर यांना एक वेळ आपली आमदार म्हणून सेवा करण्याची संधी द्यावी. मागच्या पंचवार्षिक निवडणूकीत दिलेल्या आश्वासनाचे काय झाले?याच जाब जनतेने विचारला पाहिजे. रेडिमेड गांरमेंट, सूतगिरणी सुरू झाली का? रोडकिंग, पाणीदार असणारे रोड कुठे झाले? पाण्याचा प्रश्न का सुटला नाही? आदिनाथ, मकाई बंद असल्यामुळे शेतकरी, कामगार यांची अवस्था बिकट का झाली? याचा विचार गांभीर्याने करून रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण, उद्योग, रोजगार निर्मितीसाठी एक वेळ प्रा. रामदास झोळ सर यांना निवडून द्या, असे आवाहन दशरथ आण्णा कांबळे यांनी केले आहे. यावेळी पुढे बोलताना प्रा. रामदास झोळ सर म्हणाले की,
रिटेवाडी उपसासिंचन योजना मार्गी लागल्यास वीट ,रावगांव, मांगी, जातेगांव या भागातील चाळीस गावांना याचा मोठा फायदा होणार आहे.
वीट, वंजारवाडी, पिंपळवाडी बरोबर पंचक्रोशीतील गावांमध्ये पिण्याचे पाणी सुद्धा देऊ शकले नाहीत. येथे दुष्काळामध्ये टॅंकरने पाणीपुरवठा आम्ही केला आहे. रस्ते केंद्र व राज्य सरकारने केले आहेत. यात लोकप्रतिनिधी म्हणून आपण काय केलं? वीट-उमरड रस्ता आणखी तसाच आहे. पाण्याचा प्रश्न तसाच आहे. रिटेवाडी उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून पाणी चाळीस गावाला मिळाले पाहिजे. याकरिता आमचें जेष्ठ सहकारी नेते स्व.शहाजी माने यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले होते. तेव्हा कुठे शासनाने याकरीता सर्वेसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. रिटेवाडी उपसासिंचन योजना सुरू करून वीट गावासह चाळीस गावाला हक्काचे पाणी मिळवुन देऊन, शेतकरी समृद्ध करण्याचा आमचा प्रयत्न आहे. वीट ते देवळाली रस्ता यांना करता आला नाही. रस्त्यावर साधा मुरुम सुध्दा टाकला नाही. करमाळा तालुक्यात दौरा करीत असताना सभेला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. कै. नामदेवराव जगताप यांनी शिक्षणाची सोय केली, यांच्या‌नंतर शिक्षणाची अवस्था बिकट असुन, युवकांना रोजगार आत्मनिर्भर करण्यासाठी एकही व्यावसायिक शिक्षणाची सोय कुणी केली नाही. आम्ही मात्र‌‌ शिक्षणासाठी देवळाली येथे जागा घेऊन तेथे व्यावसायिक शिक्षणाची सोय करून महाविद्यालय, ज्युनिअर कॉलेज २०२६ पर्यंत सुरू करण्याचा आमचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. करमाळा तालुक्यात आधुनिक शिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न आहे. लोकप्रतिनिधी शिक्षणाचा विषय काढत नाही, कारण त्यांना पुढे पुढे लाचारी करणारी माणसे हवी आहेत. शिक्षणामुळे आपले जीवन समृद्ध होणार त्यामुळे जातीवर, गटातटाच्या ऐवजी विकासासाठी मतदान करा. बेरोजगारांची समस्या गंभीर असून एम. आय. डी. सी. २९ वर्षाखाली स्थापन झाली, तेथे साधी पाण्याची सोय आतापर्यंतच्या लोकप्रतिनिधींना करता आली नाही. पाण्याची उपलब्धता नसल्यामुळे, जागेचे भाव जास्त असल्यामुळे कुठलेही उद्योग येथे येण्यासाठी तयार नाही. आम्ही पाण्याचे नियोजन करून, जागेचे भाव कमी करून, येथे उद्योग आणुन रोजगारनिर्मिती करणार असल्याचे त्यांनी सांगितले . करमाळा तालुक्यातील युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी २०२२ ला नोकरी महोत्सवाचे आयोजन करुन रोजगार मिळवून दिला असून २०२४ ला रोजगार मेळावा घेऊन ३४४ यूवकांना रोजगार मिळवून देण्याचे काम केले आहे. विदयार्थ्याना शिक्षण घेण्यासाठी भरमसाठ फी भरावी लागते. शैक्षणिक समानतेच्या धोरणावर विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, वसतिगृह भत्ता मिळवून दिला आहे. आरक्षणाची खरी गरज गरीब गरजू मराठा समाजाला असुन त्यांना न्याय मिळवून देणार असल्याचेही सांगितले. शेतकऱ्यांच्या पाण्याविषयी कुणी बोलत नाही. रिटेवाडीचा सर्व्हे साठी निधी मंजूर झाला. त्यात श्रेयवादाची लढाई झाली. शेतकरी बिलासाठी कुणी लोकप्रतिनिधी पुढे आला नाही. असे राजकारणी निवडून दिले तर तेच दिवस पुढे येणार आहेत. त्यामुळे करमाळा तालुक्यातील रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, उद्योग, रोजगार निर्मितीसाठी, सर्वांगीण विकासासाठी, एक वेळ आमदार म्हणून निवडून देण्याचे आवाहन प्रा.रामदास झोळ सर यांनी केले आहे. वीट गावामध्ये ग्रामस्थांच्या वतीने जेसीबी वरून फुलांची उधळण करून प्रा. रामदास झोळ सर यांचें भव्य स्वागत करण्यात आले. या सभेला वीट गाव व परिसरातील शेतकरी, युवक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सभेचे प्रास्ताविक श्रीकांत साखरे-पाटील यांनी केले. तर आभार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र गोडगे यांनी मानले.

saptahikpawanputra

Recent Posts

अखंड हिंदुस्तानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त १९ फेब्रुवारीला करमाळ्यात भव्य रक्तदान शिबीर

करमाळा प्रतिनिधी: अखंड हिंदुस्तानचे दैवत म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त करमाळा शहरात…

7 hours ago

जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना; १ मार्च रोजी पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी होणार-पृथ्वीराज पाटील

करमाळा प्रतिनिधी: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात…

11 hours ago

बार्शीचे मा.आमदार राजाभाऊ राऊत यांना विधानपरिषदेवर संधी द्यावी – माजी आमदार जयवंतराव जगताप

करमाळा प्रतिनिधी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी आपण…

17 hours ago

डिजिटल मिडिया पत्रकार संपादक संघटनेचे अध्यक्ष राजा माने यांना दुबईत “पत्रकाररत्न” आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मान

* करमाळा प्रतिनिधी डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे संस्थापक महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री. राजा माने…

23 hours ago

यशवंत परिवाराच्या वतीने स्व. अर्जुन तात्या फंड सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली

करमाळा प्रतिनिधी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांचे वडील, कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे…

1 day ago

विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांना पितृशोक; अर्जुन तात्या फंड सर यांचे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी: विद्या विकास मंडळचे अध्यक्ष तथा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांशी संबंधित नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालयाचे…

2 days ago