Categories: करमाळा

करमाळा मतदार संघातील शेतकऱ्यांना रब्बी आवर्तना द्वारे शेतीसाठी उजनीतून पाण्याची पाळी देण्यात यावी-आमदार नारायण आबा पाटील

करमाळा प्रतिनिधी करमाळा मतदार संघातील शेतकऱ्यांना रब्बी आवर्तना द्वारे शेतीसाठी उजनीतून पाण्याची पाळी देण्यात यावी अशी मागणी आमदार नारायण (आबा) पाटील यांनी केली आहे. यासाठी त्यांनी कार्यकारी संचालक (कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे ) यांना निवेदन दिले आहे. या बाबत अधिक माहिती देताना आमदार नारायण (आबा) पाटील म्हणाले कि उजनी धरणातून करमाळा मतदार संघातील दहिगाव उपसा सिंचन योजनेसाठी 1.80 टी एम सी इतका पाणी साठा राखीव आहे तर भीमा सीना जोडकालवा अर्थात बोगद्यासाठी 3.50 टी एम सी एवढा पाणी साठा राखीव ठेवण्यात आला आहे. तर सीना कोळगाव धरणातून सीना कोळगाव उपसा सिंचन योजना पुन्हा कार्यान्वित करणे गरजेचे आहे. तसेच मतदार संघातील सर्वात मोठा तलाव म्हणून गणल्या गेलेल्या मांगी तलाव ( 890 एम सी एफ टी ) यातूनही आवर्तन देणे गरजेचे आहे. यातील दहिगाव उपसा सिंचन योजना व सीना भीमा जोडकालवा यामधून रब्बी आवर्तन देण्यासाठी संबंधित विभागास तातडीने आदेश दिले जावेत. सध्या या योजनेवर आधारित कृषी क्षेत्रात केळी, ऊस यासारखी नागदि पिके तर गहू, ज्वारी, हरभरा, मका, कांदा आदी पिके उभी आहेत यासाठी रब्बी आवर्तन देऊन या पिकांची जोपासना करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी आपल्याकडे शेतीसाठी पाण्याची मागणी केली असून या सर्व योजनाच्या लाभ क्षेत्रातील पीक उत्पादन वाढण्यासाठी रब्बी आवर्तन देणे गरजेचे आहे.तरी आपण या विभागातील जिल्हा तसेच तालुका पातळीवरील अधिकाऱ्यांना रब्बी आवर्तन देण्याची सूचना करावी अशी मागणी आमदार नारायण (आबा) पाटील यांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रति मुख्य अभियंता जलसंपदा विभाग पुणे, अधीक्षक अभियंता लाभ क्षेत्र प्राधिकरण सोलापूर, अधीक्षक अभियंता धाराशिव पाटबंधारे विभाग व कार्यकारी अभियंता सीना कोळगाव प्रकल्प विभाग (परांडा) यांना पाठविण्यात आल्याची माहिती करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक देवांनंद बागल यांनी दिली.
[12/29, 18:58] +91 92729 93941: करमाळा मतदार संघातील शेतकऱ्यांना रब्बी आवर्तना द्वारे शेतीसाठी उजनीतून पाण्याची पाळी देण्यात यावी अशी मागणी आमदार नारायण (आबा) पाटील यांनी केली आहे. यासाठी त्यांनी कार्यकारी संचालक (कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे ) यांना निवेदन दिले आहे. या बाबत अधिक माहिती देताना आमदार नारायण (आबा) पाटील म्हणाले कि उजनी धरणातून करमाळा मतदार संघातील दहिगाव उपसा सिंचन योजनेसाठी 1.80 टी एम सी इतका पाणी साठा राखीव आहे तर भीमा सीना जोडकालवा अर्थात बोगद्यासाठी 3.50 टी एम सी एवढा पाणी साठा राखीव ठेवण्यात आला आहे. तर सीना कोळगाव धरणातून सीना कोळगाव उपसा सिंचन योजना पुन्हा कार्यान्वित करणे गरजेचे आहे. तसेच मतदार संघातील सर्वात मोठा तलाव म्हणून गणल्या गेलेल्या मांगी तलाव ( 890 एम सी एफ टी ) यातूनही आवर्तन देणे गरजेचे आहे. यातील दहिगाव उपसा सिंचन योजना व सीना भीमा जोडकालवा यामधून रब्बी आवर्तन देण्यासाठी संबंधित विभागास तातडीने आदेश दिले जावेत. सध्या या योजनेवर आधारित कृषी क्षेत्रात केळी, ऊस यासारखी नागदि पिके तर गहू, ज्वारी, हरभरा, मका, कांदा आदी पिके उभी आहेत यासाठी रब्बी आवर्तन देऊन या पिकांची जोपासना करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी आपल्याकडे शेतीसाठी पाण्याची मागणी केली असून या सर्व योजनाच्या लाभ क्षेत्रातील पीक उत्पादन वाढण्यासाठी रब्बी आवर्तन देणे गरजेचे आहे.तरी आपण या विभागातील जिल्हा तसेच तालुका पातळीवरील अधिकाऱ्यांना रब्बी आवर्तन देण्याची सूचना करावी अशी मागणी आमदार नारायण (आबा) पाटील यांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रति मुख्य अभियंता जलसंपदा विभाग पुणे, अधीक्षक अभियंता लाभ क्षेत्र प्राधिकरण सोलापूर, अधीक्षक अभियंता धाराशिव पाटबंधारे विभाग व कार्यकारी अभियंता सीना कोळगाव प्रकल्प विभाग (परांडा) यांना पाठविण्यात आल्याची माहिती करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक देवांनंद बागल यांनी दिली.

saptahikpawanputra

Recent Posts

श्रीजगदंबा कमलादेवी मंदिराच्या जतन संवर्धनासाठी भाविकांचा वाढता प्रतिसाद; विकास चौकटे यांची ₹३,००१ देणगी

करमाळा (प्रतिनिधी) – करमाळा येथील ग्रामदैवत श्रीजगदंबा कमलादेवी मंदिराच्या जतन व संवर्धनाच्या कामाला भाविकांचा उत्स्फूर्त…

19 hours ago

संजय गांधी निराधार योजनेची प्रकरने चार महिन्यापासून मंजूर झाली नाहीत तत्काळ मंजूर करा अन्यथा आंदोलन करू – राजाभाऊ कदम

करमाळा प्रतिनिधी : संजय गांधी निराधार योजनेची प्रकरणे मार्च महिन्यामध्ये मंजूर झाली होती त्यानंतर चार…

19 hours ago

ग्रामीण विद्यार्थ्यांच्या इंग्रजी अभिव्यक्तीला जिल्हास्तरीय व्यासपीठ* *लोकशिक्षिका स्व. लीलाताई दिवेकर यांच्या स्मरणार्थ करमाळ्यात उद्या वक्तृत्व स्पर्धा

करमाळा प्रतिनिधी भाषा ही केवळ परीक्षेतील गुणांची बाब नसून विद्यार्थ्यांच्या विचारांना आकार देणारे आणि जगाशी…

2 days ago

मानव एकता दिनानिमित्त संत निरंकारी मंडळाच्या शिबीरात १६६ जणांचे रक्तदान*

करमाळा प्रतिनिधी - मानव एकता दिनानिमित्त संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन दिल्ली शाखा करमाळा यांचे वतीने…

2 days ago

जयकुमार गोरे यांच्यावरील आक्षेपार्ह वक्तव्याचा करमाळ्यात भाजपकडून तीव्र निषेध

  करमाळा प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.…

3 days ago

नाशवंत गोष्टीकडे दुर्लक्ष करून शाश्वत गोष्टी लक्षात घेवून युवकांनी समाजकारण व राजकारणातून जनतेची सेवा करावी . – मा .आ जयवंतराव जगताप

करमाळा प्रतिनिधी दिग्वीजय बागल यांची ' मूख्यमंत्री बळीराजा पाणंद/ शेत रस्ता समिती च्या करमाळा विधानसभा…

3 days ago