Categories: करमाळा

करमाळा मतदार संघातील शेतकऱ्यांना रब्बी आवर्तना द्वारे शेतीसाठी उजनीतून पाण्याची पाळी देण्यात यावी-आमदार नारायण आबा पाटील

करमाळा प्रतिनिधी करमाळा मतदार संघातील शेतकऱ्यांना रब्बी आवर्तना द्वारे शेतीसाठी उजनीतून पाण्याची पाळी देण्यात यावी अशी मागणी आमदार नारायण (आबा) पाटील यांनी केली आहे. यासाठी त्यांनी कार्यकारी संचालक (कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे ) यांना निवेदन दिले आहे. या बाबत अधिक माहिती देताना आमदार नारायण (आबा) पाटील म्हणाले कि उजनी धरणातून करमाळा मतदार संघातील दहिगाव उपसा सिंचन योजनेसाठी 1.80 टी एम सी इतका पाणी साठा राखीव आहे तर भीमा सीना जोडकालवा अर्थात बोगद्यासाठी 3.50 टी एम सी एवढा पाणी साठा राखीव ठेवण्यात आला आहे. तर सीना कोळगाव धरणातून सीना कोळगाव उपसा सिंचन योजना पुन्हा कार्यान्वित करणे गरजेचे आहे. तसेच मतदार संघातील सर्वात मोठा तलाव म्हणून गणल्या गेलेल्या मांगी तलाव ( 890 एम सी एफ टी ) यातूनही आवर्तन देणे गरजेचे आहे. यातील दहिगाव उपसा सिंचन योजना व सीना भीमा जोडकालवा यामधून रब्बी आवर्तन देण्यासाठी संबंधित विभागास तातडीने आदेश दिले जावेत. सध्या या योजनेवर आधारित कृषी क्षेत्रात केळी, ऊस यासारखी नागदि पिके तर गहू, ज्वारी, हरभरा, मका, कांदा आदी पिके उभी आहेत यासाठी रब्बी आवर्तन देऊन या पिकांची जोपासना करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी आपल्याकडे शेतीसाठी पाण्याची मागणी केली असून या सर्व योजनाच्या लाभ क्षेत्रातील पीक उत्पादन वाढण्यासाठी रब्बी आवर्तन देणे गरजेचे आहे.तरी आपण या विभागातील जिल्हा तसेच तालुका पातळीवरील अधिकाऱ्यांना रब्बी आवर्तन देण्याची सूचना करावी अशी मागणी आमदार नारायण (आबा) पाटील यांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रति मुख्य अभियंता जलसंपदा विभाग पुणे, अधीक्षक अभियंता लाभ क्षेत्र प्राधिकरण सोलापूर, अधीक्षक अभियंता धाराशिव पाटबंधारे विभाग व कार्यकारी अभियंता सीना कोळगाव प्रकल्प विभाग (परांडा) यांना पाठविण्यात आल्याची माहिती करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक देवांनंद बागल यांनी दिली.
[12/29, 18:58] +91 92729 93941: करमाळा मतदार संघातील शेतकऱ्यांना रब्बी आवर्तना द्वारे शेतीसाठी उजनीतून पाण्याची पाळी देण्यात यावी अशी मागणी आमदार नारायण (आबा) पाटील यांनी केली आहे. यासाठी त्यांनी कार्यकारी संचालक (कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे ) यांना निवेदन दिले आहे. या बाबत अधिक माहिती देताना आमदार नारायण (आबा) पाटील म्हणाले कि उजनी धरणातून करमाळा मतदार संघातील दहिगाव उपसा सिंचन योजनेसाठी 1.80 टी एम सी इतका पाणी साठा राखीव आहे तर भीमा सीना जोडकालवा अर्थात बोगद्यासाठी 3.50 टी एम सी एवढा पाणी साठा राखीव ठेवण्यात आला आहे. तर सीना कोळगाव धरणातून सीना कोळगाव उपसा सिंचन योजना पुन्हा कार्यान्वित करणे गरजेचे आहे. तसेच मतदार संघातील सर्वात मोठा तलाव म्हणून गणल्या गेलेल्या मांगी तलाव ( 890 एम सी एफ टी ) यातूनही आवर्तन देणे गरजेचे आहे. यातील दहिगाव उपसा सिंचन योजना व सीना भीमा जोडकालवा यामधून रब्बी आवर्तन देण्यासाठी संबंधित विभागास तातडीने आदेश दिले जावेत. सध्या या योजनेवर आधारित कृषी क्षेत्रात केळी, ऊस यासारखी नागदि पिके तर गहू, ज्वारी, हरभरा, मका, कांदा आदी पिके उभी आहेत यासाठी रब्बी आवर्तन देऊन या पिकांची जोपासना करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी आपल्याकडे शेतीसाठी पाण्याची मागणी केली असून या सर्व योजनाच्या लाभ क्षेत्रातील पीक उत्पादन वाढण्यासाठी रब्बी आवर्तन देणे गरजेचे आहे.तरी आपण या विभागातील जिल्हा तसेच तालुका पातळीवरील अधिकाऱ्यांना रब्बी आवर्तन देण्याची सूचना करावी अशी मागणी आमदार नारायण (आबा) पाटील यांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रति मुख्य अभियंता जलसंपदा विभाग पुणे, अधीक्षक अभियंता लाभ क्षेत्र प्राधिकरण सोलापूर, अधीक्षक अभियंता धाराशिव पाटबंधारे विभाग व कार्यकारी अभियंता सीना कोळगाव प्रकल्प विभाग (परांडा) यांना पाठविण्यात आल्याची माहिती करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक देवांनंद बागल यांनी दिली.

saptahikpawanputra

Recent Posts

अखंड हिंदुस्तानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त १९ फेब्रुवारीला करमाळ्यात भव्य रक्तदान शिबीर

करमाळा प्रतिनिधी: अखंड हिंदुस्तानचे दैवत म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त करमाळा शहरात…

14 hours ago

जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना; १ मार्च रोजी पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी होणार-पृथ्वीराज पाटील

करमाळा प्रतिनिधी: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात…

19 hours ago

बार्शीचे मा.आमदार राजाभाऊ राऊत यांना विधानपरिषदेवर संधी द्यावी – माजी आमदार जयवंतराव जगताप

करमाळा प्रतिनिधी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी आपण…

1 day ago

डिजिटल मिडिया पत्रकार संपादक संघटनेचे अध्यक्ष राजा माने यांना दुबईत “पत्रकाररत्न” आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मान

* करमाळा प्रतिनिधी डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे संस्थापक महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री. राजा माने…

1 day ago

यशवंत परिवाराच्या वतीने स्व. अर्जुन तात्या फंड सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली

करमाळा प्रतिनिधी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांचे वडील, कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे…

2 days ago

विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांना पितृशोक; अर्जुन तात्या फंड सर यांचे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी: विद्या विकास मंडळचे अध्यक्ष तथा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांशी संबंधित नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालयाचे…

2 days ago