Categories: करमाळा

दहिगाव उपसासह सीना माढा व भीमा सीना जोड कालव्यातून रब्बी पिकासाठी उद्यापासून आवर्तन सुरु होणार – आमदार नारायण आबा पाटील

करमाळा प्रतिनिधी दहिगाव उपसा सह सीना माढा व भीमा सीना जोड कालव्यातून रब्बी पिकासाठी उद्यापासून आवर्तन सुरु होणार असल्याचे आमदार नारायण आबा पाटील यांनी सांगितले. काल कालवा सल्लगार समिती मधील चर्चे नंतर संबंधित खात्याना पाणी देण्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आदेश दिल्याचेही आमदार नारायण आबा पाटील यांनी सांगितले. याबाबत सविस्तर माहिती अशी की कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत आमदार नारायण आबा पाटील यांनी रितेवाडी सह सर्वच प्रकल्पा बाबत आग्रही मागणी केली. सोलापूर येथे काल कालवा सल्लगार समितीची बैठक पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी नामदार राधाकृष्ण विखे पाटील हे होते तर सोलापर जिल्ह्यातील सर्व आमदार व खासदार यांचं सह जलसंपदा व पाटबंधारे विभागातील अधिकारी व जिल्हाधिकारी उपस्थित होते. यावेळी आमदार नारायण आबा पाटील यांनी नामदार विखे पाटील यांचा सत्कार करून करमाळा विधानसभा मतदार संघातील सिंचना बाबतच्या प्रश्नावर उपाययोजना व्हाव्यात म्हणून एक लेखी निवेदनही सादर केले. तसेच प्रत्यक्ष बैठकीत सिंचनाच्या समस्या मांडल्या. करमाळा तालुका हा कुकडी प्रकल्पतील शेवटचे टोक असल्याने जवळपास 257 कि मी अंतरावरून आमच्या तालुक्याला हक्काचे राखीव असलेले 5.50 टीमसी पाणी मिळत नसल्याची तक्रार आमदार नारायण आबा पाटील यांनी बोलून दाखवली. तसेच यावर उपाययोजना म्हणून नियोजित रिटेवाडी उपसा सिंचन योजना मान्यता देऊन कार्यान्वित केली जावी व या योजने द्वारे उजनीत येणारे पावसाळ्यातील अतिरिक्त पाणी आम्हाला कुकडी लाभ क्षेत्रात दिले जावे अशी आग्रही मागणी केली. यावर उजनीतून पावसाळ्यात जवळपास शंभर हुन अधिक टी म सी पाणी हे धरणाचे दरवाजे उघडून अथवा ओव्हरफ्लो होऊन जाते आणि याच पाण्यातील काही पाणी आम्हाला दिल्यास कुकडी लाभ क्षेत्रातील मांगी तलावा सह सर्वच तलावत साठवण करून ठेवता येईल व यामुळे जवळपास 65 हजार क्षेत्र ऑलिता खाली येईल असेही आमदार नारायण (आबा) पाटील यांनी सांगितले. तसेच सध्या करमाळा मतदार संघातील पीक लागचाड क्षेत्रातील ऊस, केळी, गहू, हरभरा, कांदा, ज्वारी, मका आदी पिकांना पाण्याची गरज असल्याने दहिगाव उपसा सिंचन प्रकल्प, सीना माढा व भीमा सीना जोडकालचा अर्थात बोगद्यातून रब्बी आवर्तन दिले जावे अशीही मागणी आमदार नारायण आबा पाटील यांनी केली.यावर तातडीने मंजुरी देऊन उद्यापासून पाण्याची पाळी देण्याचे आदेश नामदार विखे पाटील यांनी अधिकऱ्यांना दिले.तसेच अद्यापही कुकडी प्रकपासाठी जमिनी दिलेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचे भू भाडे मिळाले नसल्याने. भू भाड्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने पैसे जमा केले जावेत अशीही मागणी आमदार नारायण आबा पाटील यांनी केली. या सोबतच बेंद ओढा प्रश्न मांडून या भागातील शेतकऱ्यांसाठी या बेंद ओढ्याचे पुनर्जीवन केले जाणे ही अतिशय महत्वाची बाब असल्याचे त्यांनी नामदार विखे पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले व या ओढ्यात आणखी नवीन गावांचा समावेश केला जावा व या भागातील सिंचन क्षेत्र वाढचाचे असा आग्रह आमदार पाटील यांनी केला. तसेच दहिगाव उपसा सिंचन योजनेतील वंचित तलाव व गावांचा प्रकलपात समावेश केला जावा ही मागणी लावून धरली. यावर ज्या बाबीना तांत्रिक गोष्टी तपासून घेण्याची गरज आहे त्या तपासल्या जातील व हे प्रश्न मार्गी लावले जातील असा सकारात्मक प्रतिसाद नामदार विखे पाटील यांनी दिला.

saptahikpawanputra

Recent Posts

श्रीजगदंबा कमलादेवी मंदिराच्या जतन संवर्धनासाठी भाविकांचा वाढता प्रतिसाद; विकास चौकटे यांची ₹३,००१ देणगी

करमाळा (प्रतिनिधी) – करमाळा येथील ग्रामदैवत श्रीजगदंबा कमलादेवी मंदिराच्या जतन व संवर्धनाच्या कामाला भाविकांचा उत्स्फूर्त…

20 hours ago

संजय गांधी निराधार योजनेची प्रकरने चार महिन्यापासून मंजूर झाली नाहीत तत्काळ मंजूर करा अन्यथा आंदोलन करू – राजाभाऊ कदम

करमाळा प्रतिनिधी : संजय गांधी निराधार योजनेची प्रकरणे मार्च महिन्यामध्ये मंजूर झाली होती त्यानंतर चार…

21 hours ago

ग्रामीण विद्यार्थ्यांच्या इंग्रजी अभिव्यक्तीला जिल्हास्तरीय व्यासपीठ* *लोकशिक्षिका स्व. लीलाताई दिवेकर यांच्या स्मरणार्थ करमाळ्यात उद्या वक्तृत्व स्पर्धा

करमाळा प्रतिनिधी भाषा ही केवळ परीक्षेतील गुणांची बाब नसून विद्यार्थ्यांच्या विचारांना आकार देणारे आणि जगाशी…

2 days ago

मानव एकता दिनानिमित्त संत निरंकारी मंडळाच्या शिबीरात १६६ जणांचे रक्तदान*

करमाळा प्रतिनिधी - मानव एकता दिनानिमित्त संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन दिल्ली शाखा करमाळा यांचे वतीने…

3 days ago

जयकुमार गोरे यांच्यावरील आक्षेपार्ह वक्तव्याचा करमाळ्यात भाजपकडून तीव्र निषेध

  करमाळा प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.…

3 days ago

नाशवंत गोष्टीकडे दुर्लक्ष करून शाश्वत गोष्टी लक्षात घेवून युवकांनी समाजकारण व राजकारणातून जनतेची सेवा करावी . – मा .आ जयवंतराव जगताप

करमाळा प्रतिनिधी दिग्वीजय बागल यांची ' मूख्यमंत्री बळीराजा पाणंद/ शेत रस्ता समिती च्या करमाळा विधानसभा…

3 days ago