Categories: करमाळा

करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना कुकडीचे रब्बी आवर्तन 25 फेब्रुवारी 2025 पासून मिळणार- आमदार नारायण आबा पाटील

करमाळा प्रतिनिधी कुकडीचे रब्बी आवर्तन 25 फेब्रुवारी 2025 पासून मिळणार असल्याचे आमदार नारायण आबा पाटील यांनी सांगितले. आमदार पदाची सुत्र हाती घेतल्यानंतर करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना लागोपाठ दुसरे आवर्तन मिळवून देण्यात आ नारायण आबा पाटील याना यश मिळत आहे. याबाबत अधिक सविस्तर बोलताना आ.पाटील यांनी सांगितले की कूकडी पाणी वाटप कालवा सल्लागार समितीची बैठक अहिल्याबाई नगर (अहमदनगर) येथे पार पडली होती. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत आपण करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना रब्बी पिकांसाठी कुकडीच्या माध्यमातून पाणी आवर्तन मिळावे अशी आग्रही मागणी केली होती. यास मंत्रीमहोदय यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन लवकरच शेतीसाठी पाणी दिले जाईल असे ठाम आश्वासन सुध्दा दिले. याच बैठकीत आपण करमाळा तालुक्यातील पाणी मोजमाप करत असताना ते प्रत्यक्षात या तालुक्यातील कुकडी लाभ क्षेत्रात पाणी येण्यापूर्वी गृहीत धरले जाते व यामूळे अगोदर पाणी गळतीमुळे मिळत असलेल्या कमी पाण्याचे वाटप कमी दिवसात करणे अवघड होऊन जाते ही बाब जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समोर मांडली असता त्यांनी तात्काळ ही बाब तपासून करमाळा तालुक्यातील हद्दीत कुकडी किमी २२३ मध्ये पाणी प्रवेश केल्यानंतरच तेथील पाणी हिशोब अथवा प्राप्त पाणी मोजमाप धरले जावे असे आदेश‌ दिले. या आदेशाची अंमलबजावणी या चालू मिळणाऱ्या आवर्तनापासून होणार आहे. कुकडी आवर्तनात करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांवर‌ अनेक दशकांपासून होणारा हा अन्याय आपण ठासून‌ बाजू मांडल्याने आता दुर झाला असून यामुळे निश्चितच मिळणाऱ्या पाण्यात काही प्रमाणात का होईना वाढ होणार आहे. आता करमाळा तालुक्यातील‌ शेतकऱ्यांना दिनांक.25 फेब्रुवारी 2025 पासून‌ कुकडीचे पाणी मिळणार असुन‌ या आवर्तनाच्या कुकडी डावा कालवा व चिलवडी शाखा दोन्ही शाखेच्या पाणी वाटप तारखा बाबत सविस्तर माहिती लवकरच शेतकऱ्यांना कळवली जाईल असेही आमदार नारायण आबा पाटील यांनी सांगितले. सध्या करमाळा तालुक्यातील कुकडी लाभ क्षेत्रात गहू, ज्वारी, हरभरा, मका, कांदा आदिसह अनेक पिके उभी असून त्यांना पाण्याची किमान एक तरी पाणी पाळी मिळणे आवश्यक होते . आमदार नारायण आबा पाटील यांनी दाखवलेल्या या कार्यतप्तरतेने शेतकऱ्यांना आपले शेती पासुन‌ मिळणारे उत्पादन वाढवण्यासाठी निश्चितच आधार मिळणार असल्याने शेतकरी वर्गात समाधान दिसून येत आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

अखंड हिंदुस्तानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त १९ फेब्रुवारीला करमाळ्यात भव्य रक्तदान शिबीर

करमाळा प्रतिनिधी: अखंड हिंदुस्तानचे दैवत म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त करमाळा शहरात…

4 hours ago

जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना; १ मार्च रोजी पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी होणार-पृथ्वीराज पाटील

करमाळा प्रतिनिधी: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात…

9 hours ago

बार्शीचे मा.आमदार राजाभाऊ राऊत यांना विधानपरिषदेवर संधी द्यावी – माजी आमदार जयवंतराव जगताप

करमाळा प्रतिनिधी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी आपण…

14 hours ago

डिजिटल मिडिया पत्रकार संपादक संघटनेचे अध्यक्ष राजा माने यांना दुबईत “पत्रकाररत्न” आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मान

* करमाळा प्रतिनिधी डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे संस्थापक महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री. राजा माने…

21 hours ago

यशवंत परिवाराच्या वतीने स्व. अर्जुन तात्या फंड सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली

करमाळा प्रतिनिधी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांचे वडील, कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे…

1 day ago

विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांना पितृशोक; अर्जुन तात्या फंड सर यांचे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी: विद्या विकास मंडळचे अध्यक्ष तथा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांशी संबंधित नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालयाचे…

1 day ago