Categories: करमाळा

करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना कुकडीचे रब्बी आवर्तन 25 फेब्रुवारी 2025 पासून मिळणार- आमदार नारायण आबा पाटील

करमाळा प्रतिनिधी कुकडीचे रब्बी आवर्तन 25 फेब्रुवारी 2025 पासून मिळणार असल्याचे आमदार नारायण आबा पाटील यांनी सांगितले. आमदार पदाची सुत्र हाती घेतल्यानंतर करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना लागोपाठ दुसरे आवर्तन मिळवून देण्यात आ नारायण आबा पाटील याना यश मिळत आहे. याबाबत अधिक सविस्तर बोलताना आ.पाटील यांनी सांगितले की कूकडी पाणी वाटप कालवा सल्लागार समितीची बैठक अहिल्याबाई नगर (अहमदनगर) येथे पार पडली होती. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत आपण करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना रब्बी पिकांसाठी कुकडीच्या माध्यमातून पाणी आवर्तन मिळावे अशी आग्रही मागणी केली होती. यास मंत्रीमहोदय यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन लवकरच शेतीसाठी पाणी दिले जाईल असे ठाम आश्वासन सुध्दा दिले. याच बैठकीत आपण करमाळा तालुक्यातील पाणी मोजमाप करत असताना ते प्रत्यक्षात या तालुक्यातील कुकडी लाभ क्षेत्रात पाणी येण्यापूर्वी गृहीत धरले जाते व यामूळे अगोदर पाणी गळतीमुळे मिळत असलेल्या कमी पाण्याचे वाटप कमी दिवसात करणे अवघड होऊन जाते ही बाब जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समोर मांडली असता त्यांनी तात्काळ ही बाब तपासून करमाळा तालुक्यातील हद्दीत कुकडी किमी २२३ मध्ये पाणी प्रवेश केल्यानंतरच तेथील पाणी हिशोब अथवा प्राप्त पाणी मोजमाप धरले जावे असे आदेश‌ दिले. या आदेशाची अंमलबजावणी या चालू मिळणाऱ्या आवर्तनापासून होणार आहे. कुकडी आवर्तनात करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांवर‌ अनेक दशकांपासून होणारा हा अन्याय आपण ठासून‌ बाजू मांडल्याने आता दुर झाला असून यामुळे निश्चितच मिळणाऱ्या पाण्यात काही प्रमाणात का होईना वाढ होणार आहे. आता करमाळा तालुक्यातील‌ शेतकऱ्यांना दिनांक.25 फेब्रुवारी 2025 पासून‌ कुकडीचे पाणी मिळणार असुन‌ या आवर्तनाच्या कुकडी डावा कालवा व चिलवडी शाखा दोन्ही शाखेच्या पाणी वाटप तारखा बाबत सविस्तर माहिती लवकरच शेतकऱ्यांना कळवली जाईल असेही आमदार नारायण आबा पाटील यांनी सांगितले. सध्या करमाळा तालुक्यातील कुकडी लाभ क्षेत्रात गहू, ज्वारी, हरभरा, मका, कांदा आदिसह अनेक पिके उभी असून त्यांना पाण्याची किमान एक तरी पाणी पाळी मिळणे आवश्यक होते . आमदार नारायण आबा पाटील यांनी दाखवलेल्या या कार्यतप्तरतेने शेतकऱ्यांना आपले शेती पासुन‌ मिळणारे उत्पादन वाढवण्यासाठी निश्चितच आधार मिळणार असल्याने शेतकरी वर्गात समाधान दिसून येत आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळ्यात श्री संत नामदेव शिंपी महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहास भक्तिमय प्रारंभ११ ऑगस्ट रोजी संजीवन समाधी सोहळा महाप्रसाद,

करमाळा, प्रतिनिधी : करमाळा येथील श्री संत नामदेव शिंपी समाजाच्या वतीने श्रीसंत नामदेव शिंपी महाराज…

1 hour ago

स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी स्व. रुक्मिणी विठ्ठल आवताडे यांच्या २७ व्या पुण्यस्मरणानिमित विशाल महाराज खोले यांचा ‘आई-वडील हेच खरे दैवत’चा हृदयस्पर्शी संदेश

करमाळा प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसचे करमाळा तालुकाध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य भरत (भाऊ) आवताडे यांच्या…

3 hours ago

शाहुनगर पाणीप्रश्नाला मोठा दिलासा; नवीन चार इंची पाईपलाईनच्या कामाचा शुभारंभ उत्साहात नगरपरिषदेचा महत्त्वाकांक्षी उपक्रम

* करमाळा, प्रतिनिधी : करमाळा शहरातील शाहूनगर परिसरातील नागरिकांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या पाणीप्रश्नाच्या निराकरणाच्या दिशेने…

4 hours ago

श्रीजगदंबा कमलादेवी मंदिराच्या जतन संवर्धनासाठी भाविकांचा वाढता प्रतिसाद; विकास चौकटे यांची ₹३,००१ देणगी

करमाळा (प्रतिनिधी) – करमाळा येथील ग्रामदैवत श्रीजगदंबा कमलादेवी मंदिराच्या जतन व संवर्धनाच्या कामाला भाविकांचा उत्स्फूर्त…

1 day ago

संजय गांधी निराधार योजनेची प्रकरने चार महिन्यापासून मंजूर झाली नाहीत तत्काळ मंजूर करा अन्यथा आंदोलन करू – राजाभाऊ कदम

करमाळा प्रतिनिधी : संजय गांधी निराधार योजनेची प्रकरणे मार्च महिन्यामध्ये मंजूर झाली होती त्यानंतर चार…

1 day ago

ग्रामीण विद्यार्थ्यांच्या इंग्रजी अभिव्यक्तीला जिल्हास्तरीय व्यासपीठ* *लोकशिक्षिका स्व. लीलाताई दिवेकर यांच्या स्मरणार्थ करमाळ्यात उद्या वक्तृत्व स्पर्धा

करमाळा प्रतिनिधी भाषा ही केवळ परीक्षेतील गुणांची बाब नसून विद्यार्थ्यांच्या विचारांना आकार देणारे आणि जगाशी…

2 days ago