गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी उजनी धरण 50 टक्के जास्त म्हणजे 111%भरले होते. यावेळी 123 टी एम सी पाणी जलाशयात साठलेले होते. परंतु कालवा सल्लागार समिती च्या ढिसाळ कारभारामुळे व उजनी धरणाच्या खालील लोकप्रतिनिधींकडून बेकायदेशीर पणे पळवून नेण्याच्या आग्रहामुळे परिपूर्ण भरलेले धरण रिकामे होत असून दोन महिन्यात 50 टक्के पाणी संपलेले असून आज 21 फेब्रुवारी रोजी केवळ 61% साठा शिल्लक आहे .असेच नियोजन बाह्य पद्धतीने पाणी सोडत राहिल्यास लवकरच धरण वजा मधे प्रवेश करेल.यामुळेच समांतर जलवाहिनी तात्काळ सुरू होणे काळाची गरज आहे . जलवाहिनी सुरू झाल्यास 25 ते 30 टी एम सी पाणी वाचेल . कारण नदीवाटे एका आवर्तनास सहा ते सात टी एम सी पाणी सोडावे लागते . अशी कमीत कमी डिसेंबर नंतर पाच आवर्तन सोडावी लागतात. सोलापूर शहराला पिण्यासाठी आख्ख्या वर्षाला कवळ अडीच ते तीन टी एम सी पाणी लागते. जलवाहिनी सुरू झाल्यास नदीवाटे वाया जाणारे पाणी वाचेल असे प्रा.शिवाजीराव बंडगर सांगितले आहे.
चौकट – सोलापूर ला पिण्यासाठी औज बंधार्यात पाणी सोडायच्या नावाखाली नदीवाटे पाणी नेले जाते .जाणून बुजून समांतर जलवाहिनीचे काम रखडवले जात आहे . प्रा.शिवाजीराव बंडगर
करमाळा, प्रतिनिधी : करमाळा येथील श्री संत नामदेव शिंपी समाजाच्या वतीने श्रीसंत नामदेव शिंपी महाराज…
करमाळा प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसचे करमाळा तालुकाध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य भरत (भाऊ) आवताडे यांच्या…
* करमाळा, प्रतिनिधी : करमाळा शहरातील शाहूनगर परिसरातील नागरिकांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या पाणीप्रश्नाच्या निराकरणाच्या दिशेने…
करमाळा (प्रतिनिधी) – करमाळा येथील ग्रामदैवत श्रीजगदंबा कमलादेवी मंदिराच्या जतन व संवर्धनाच्या कामाला भाविकांचा उत्स्फूर्त…
करमाळा प्रतिनिधी : संजय गांधी निराधार योजनेची प्रकरणे मार्च महिन्यामध्ये मंजूर झाली होती त्यानंतर चार…
करमाळा प्रतिनिधी भाषा ही केवळ परीक्षेतील गुणांची बाब नसून विद्यार्थ्यांच्या विचारांना आकार देणारे आणि जगाशी…