गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी उजनी धरण 50 टक्के जास्त म्हणजे 111%भरले होते. यावेळी 123 टी एम सी पाणी जलाशयात साठलेले होते. परंतु कालवा सल्लागार समिती च्या ढिसाळ कारभारामुळे व उजनी धरणाच्या खालील लोकप्रतिनिधींकडून बेकायदेशीर पणे पळवून नेण्याच्या आग्रहामुळे परिपूर्ण भरलेले धरण रिकामे होत असून दोन महिन्यात 50 टक्के पाणी संपलेले असून आज 21 फेब्रुवारी रोजी केवळ 61% साठा शिल्लक आहे .असेच नियोजन बाह्य पद्धतीने पाणी सोडत राहिल्यास लवकरच धरण वजा मधे प्रवेश करेल.यामुळेच समांतर जलवाहिनी तात्काळ सुरू होणे काळाची गरज आहे . जलवाहिनी सुरू झाल्यास 25 ते 30 टी एम सी पाणी वाचेल . कारण नदीवाटे एका आवर्तनास सहा ते सात टी एम सी पाणी सोडावे लागते . अशी कमीत कमी डिसेंबर नंतर पाच आवर्तन सोडावी लागतात. सोलापूर शहराला पिण्यासाठी आख्ख्या वर्षाला कवळ अडीच ते तीन टी एम सी पाणी लागते. जलवाहिनी सुरू झाल्यास नदीवाटे वाया जाणारे पाणी वाचेल असे प्रा.शिवाजीराव बंडगर सांगितले आहे.
चौकट – सोलापूर ला पिण्यासाठी औज बंधार्यात पाणी सोडायच्या नावाखाली नदीवाटे पाणी नेले जाते .जाणून बुजून समांतर जलवाहिनीचे काम रखडवले जात आहे . प्रा.शिवाजीराव बंडगर
करमाळा, प्रतिनिधी दि. १५ जून : अनेक दिवसांपासून बंद असलेली करमाळा–कुर्डूवाडी–नेरले मार्गावरील एसटी बससेवा सोमवारपासून…
करमाळा प्रतिनिधी निंभोरे, ता. करमाळा : जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी आणि शासकीय शिक्षणाला…
" करमाळा प्रतिनिधी : आजच्या धावपळीच्या युगात वाढदिवस साजरा करण्यासाठी मोठमोठे कार्यक्रम, केक कापणे, फटाक्यांची…
करमाळा, प्रतिनिधी : करमाळा पोस्ट ऑफिसमध्ये १३ जुनं रोजी आधार मेळावा आयोजित केला असुन नागरिकांनी…
करमाळा प्रतिनिधी केम (ता. करमाळा) : अल्पसंख्यांक व विखुरलेल्या ब्राह्मण समाजाने एकत्र येऊन संघटित व्हावे,…
करमाळा प्रतिनिधी करमाळा, ता. ५ जून : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त करमाळा नगरपरिषदेच्या वतीने महावीर उद्यान…