तर अधिवेशन काळात मंत्रालयात पार पडलेल्या उजनी धरण कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत आपण दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या उन्हाळी आवर्तनाची मागणी केली होती. काही दिवसांपूर्वी दहिगाव उपसा सिंचन योजनेचे रब्बी आवर्तन संपले होते. पुर्व भागातील काही ठिकाणी तांत्रिक अडचणी असलेले
अपवाद वगळता सर्वत्र मुबलक पाणी दिले गेले. यामुळे थोडासा अवधी लोटल्यानंतर आता गुरुवार पासून परत एकदा दहिगाव उपसा सिंचन योजनेचे उन्हाळी आवर्तन सुरु करण्याच्या सुचना आपण संबंधित विभागास दिल्या आहेत. त्यानूसार या विभागाकडून उन्हाळी आवर्तनासाठी तयारी सुध्दा करण्यात आली आहे. इलेक्ट्रिक पंप दुरुस्ती तसेच मुख्य कालवा संबंधित अडचणी दुर करण्यात आल्या असुन नियोजना प्रमाणे पाणी वाटप करण्याची सुचनाही आपण अधिकाऱ्यांना दिली आहे. पाटबंधारे अधिनियमानुसार योग्य त्या सुचना अंमलात आणुन दहिगाव उपसा सिंचन योजनेचे हे आवर्तन दिले जाईल. तसेच उन्हाळ्यात होणारी संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेऊन या आवर्तनाच्या माध्यमातून काही प्रश्न सोडवले जातील. शेतकऱ्यांनी या आवर्तनात सहकार्य करावे असे आवाहन आमदार नारायण आबा पाटील यांनी केले.
करमाळा प्रतिनिधी: अखंड हिंदुस्तानचे दैवत म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त करमाळा शहरात…
करमाळा प्रतिनिधी: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात…
करमाळा प्रतिनिधी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी आपण…
* करमाळा प्रतिनिधी डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे संस्थापक महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री. राजा माने…
करमाळा प्रतिनिधी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांचे वडील, कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे…
करमाळा प्रतिनिधी: विद्या विकास मंडळचे अध्यक्ष तथा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांशी संबंधित नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालयाचे…