Categories: करमाळा

आदिनाथ साखर कारखाना निवडणुकीसाठी बागलगटाने थांबण्याचा निर्णय घेतला असून उमेदवारी अर्ज भरलेल्या सर्वांनी आपले अर्ज माघारी घ्यावेत-विलासराव घुमरे सर

करमाळा (प्रतिनिधी )- बागल गटाला राजकीय दृष्ट्या अडचणीत आणण्यासाठी सातत्याने आतापर्यंत श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याला लक्ष्य केले गेले आहे. पुन्हा असा प्रकार आदिनाथच्या बाबतीत होऊ नये याकरता उद्याच्या आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी बागल गटाने थांबण्याचा निर्णय घेतला असून बागल गटाच्या वतीने उमेदवारी अर्ज भरलेल्या सर्वांनी आपले उमेदवारी अर्ज येत्या दोन दिवसात माघारी घ्यावेत असे आवाहन बागल गटाचे मार्गदर्शक माननीय विलासरावजी घुमरे सर यांनी आज बागल संपर्क कार्यालयात केले यावेळी मकाई कारखान्याचे माजी चेअरमन व शिवसेना जिल्हा युवा नेते माननीय दिग्विजय बागल उपस्थित होते. आज बागल संपर्क कार्यालयात श्री आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीसाठी बागल गटाच्या वतीने ज्यांनी आपले फॉर्म भरले आहेत त्यांची विचार विनिमय बैठक संपन्न झाली प्रारंभी लोकनेते माजी मंत्री स्वर्गीय दिगंबररावजी बागल मामा यांच्या प्रतिमेचे पूजन सोमनाथ पोटे व अंगद पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी आदिनाथ निवडणूक संदर्भात विचार विनिमय करण्यात आले मार्केट कमिटीचे माजी चेअरमन प्राध्यापक शिवाजीराव बंडगर सर,आदिनाथ चे चेअरमन धनंजय डोंगरे, चिंतामणी दादा जगताप ,कल्याणराव सरडे सर ,रणजीत शिंदे, अंगद पाटील ,केरू गव्हाणे, अँड नानासाहेब शिंदे, आदि सह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपले विचार मांडले यावेळी सर्वांनी एक मुखाने आदिनाथ निवडणुकीच्या संदर्भात निर्णय घेण्याचे सर्व अधिकार गटाच्या नेत्या व भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्षा व साखर संघाच्या संचालिका आदरणीय रश्मीदीदी बागल व मार्गदर्शक माननीय विलासरावजी घुमरे सर यांना प्रदान करण्यात आले यावेळी मकाईचे माजी चेअरमन व शिवसेना युवा नेते माननीय दिग्विजय बागल यांनी आपल्या नेत्या आदरणीय रश्मीदीदी बागल व मार्गदर्शक माननीय विलासराव घुमरे सर जो निर्णय घेतील तो सर्वांनी मान्य करावा असे आवाहन केले यावेळी मार्गदर्शक विलासराव घुमरे सर यांनी बोलताना गेल्या वीस वर्षांमध्ये बागल गटाच्या राजकारणाला अडचणीत आणण्यासाठी आदिनाथ कारखान्याला अडचणीत आणून आदिनाथला लक्ष्य केले गेले आहे. कुठेतरी आता आदिनाथवरती पुन्हा असा प्रकार होऊ नये आणि बागल गटाला राजकीय लक्ष करण्यासाठी आदिनाथ चालू नये असा प्रयत्न होऊ नये त्यासाठी आम्ही या निवडणुकीत थांबण्याचा निर्णय घेतला आहे .आम्ही फक्त निवडणुकीपुरतं थांबलो आहोत आदिनाथ व्यवस्थित चालण्यासाठी आमचे योगदान सातत्याने असेल जो कोणी आदिनाथच्या सत्तेवर येईल त्याला बागल गटाच्या वतीने सर्व ते सहकार्य राहील अशी ग्वाही यावेळी श्री घुमरे यांनी दिली तसेच बागल गटाच्या सर्व फॉर्म भरलेल्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज येत्या दोन दिवसांमध्ये तातडीने माघारी घ्यावेत असेही आवाहन शेवटी श्री विलासराव घुमरे यांनी केले यावेळी बागल गटाच्या वतीने फॉर्म भरलेले सर्व उमेदवार उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

अखंड हिंदुस्तानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त १९ फेब्रुवारीला करमाळ्यात भव्य रक्तदान शिबीर

करमाळा प्रतिनिधी: अखंड हिंदुस्तानचे दैवत म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त करमाळा शहरात…

14 hours ago

जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना; १ मार्च रोजी पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी होणार-पृथ्वीराज पाटील

करमाळा प्रतिनिधी: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात…

18 hours ago

बार्शीचे मा.आमदार राजाभाऊ राऊत यांना विधानपरिषदेवर संधी द्यावी – माजी आमदार जयवंतराव जगताप

करमाळा प्रतिनिधी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी आपण…

24 hours ago

डिजिटल मिडिया पत्रकार संपादक संघटनेचे अध्यक्ष राजा माने यांना दुबईत “पत्रकाररत्न” आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मान

* करमाळा प्रतिनिधी डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे संस्थापक महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री. राजा माने…

1 day ago

यशवंत परिवाराच्या वतीने स्व. अर्जुन तात्या फंड सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली

करमाळा प्रतिनिधी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांचे वडील, कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे…

2 days ago

विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांना पितृशोक; अर्जुन तात्या फंड सर यांचे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी: विद्या विकास मंडळचे अध्यक्ष तथा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांशी संबंधित नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालयाचे…

2 days ago