Categories: Uncategorized

आदिनाथ साखर कारखाना संजयमामांच्या नेतृत्वात पुन्हा ऊभारी घेईल याची विरोधकांना भिती, सभासदांचा मात्र संजयमामांच्या नेतृत्वावर विश्वास- ॲड. अजित विघ्ने.


करमाळा प्रतिनिधी.
करमाळा तालुक्यातील सहकाराचे मंदीर असणारा आदिनाथ सहकारी साखर कारखाना सहकारी तत्वावर चालावा व रसातळाला गेलेल्या आदिनाथ कारखान्याने पुन्हा गतवैभव प्राप्त करावे ही सर्व सामान्य सभासंदाची ईच्छा असुन, सभासदांच्या इच्छेनुसारच आदिनाथचे सभासद असणाऱ्या संजयमामा शिंदे यांनी या निवडणुकीत स्वतः नेतृत्व करीत उडी घेतली आहे. वास्तविक माजी आमदार संजयमामा शिंदे यांना साखर उद्योगधंद्यातील १७ वर्षाचा अनुभव असुन, या अनुभवाच्या जोरावर तसेच त्यांचे पाठीशी असणारे महाराष्ट्र सरकारचे पाठबळ, स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिलेला शब्द,तसेच बारामती ॲग्रोचे सर्व्हेसर्वा व कर्जत-जामखेडचे आमदार रोहीतदादा पवार यांचा प्रत्यक्ष पाठींबा या सर्व जमेच्या बाबी विचारात घेता आदिनाथला वाचविण्यासाठी शेवटची संधी म्हणुन प्रत्येक सभासद आणि कामगार या निवडणुकीकडे पहातो आहे.
आजपर्यंत या कारखान्यावर ज्यांची सत्ता आली ती कधीच एकमुखी व एक विचाराची नव्हती त्यामुळे गलिच्छ राजकारणाच्या खेळात आदिनाथचे वाट्टोळे झाले आहे.आज आदिनाथवर जवळपास २६४ कोटींचे कर्ज असुन व्यापारी, कामगारांची देणी थकीत आहेत. अशा आव्हानात्मक परिस्थितीतुन भांडवलाची स्वतः ऊभारणी करून पर्यायाने महराष्ट्र शासनाचे सहकार्य घेऊन आणि विविध बँकाच्या दाखल कायदेशीर प्रक्रियेतुन मार्ग काढुन या कारखान्याला पुन्हा ऊभारी द्यायची हे नक्कीच कठीण आहे. यासाठीच माजी आमदार संजयमामांचे एकमेव नेतृत्व या करीता सभासदांना सक्षम वाटते. एकीकडे मामांची कारखाना चालविण्यासाठीची तळमळ ते बोलून दाखवित आहेत तर दुसरीकडे मामांच्या नेतृत्वात कारखाना जाऊ नये म्हणुन काही जणांची चाललेली वळवळ दिसून येत असुन,विरोधक खालच्या पातळीवर जाऊन टिका टिप्पणी करीत आहेत. मामांनी त्यांचा खाजगी कारखाना धंद्यातले फायदे तोटे तपासुन कंपनी कायदयानुसार ओंकारेश्वर शुगर्स कंपनीमधे मर्ज केला आहे. विशेषतः या कंपनीचे इक्वीटी शेअर्स मामांचे आहेत.परंतु विरोधक विपर्यास करताना दिसत आहे.
खरं तर आदिनाथ करिता आघाडी करणारातच निवडणुकी आधीच बिघाडी झालेली आहे. त्यामुळे नेतेमंडळींची वक्तव्ये दिवसेंदिवस बदलत आहेत.ज्येष्ठ नेते मंडळींच्या या कोलांटउड्याने शेतकरी सभासदांचे मनोरंजन होत आहे.पाचकळ विनोद आणि असभ्य भाषेमुळे विरोधकांची सभा म्हणजे तमाशाचाच फड असल्याचा भास मतदारांना होत आहे.ज्या मोहीते पाटलांचे आदेशाने ही आघाडी झाली त्या मोहीते पाटलांनी त्यांचे कारखाने व्यवस्थित चालवले का?. त्यांच्या अनेक सहकारी संस्था बंद आवस्थेत का आहेत?.जिल्हा मध्यवर्ती बँकेचे वाटोळे कशामुळे झाले? आदिनाथ कारखान्यांमधून सोन्याचा धूर का निघाला नाही ? असे प्रश्न आता सभासद विचारत आहेत.पाटील गटाचे प्रवक्ते तळेकरांना प्रत्येक गोष्ट टाइमपासची वाटते यामध्ये त्यांचा काहीच दोष नाही, कारण त्यांच्या सभांमध्ये विनोद ,टाइमपास याशिवाय दुसरे काहीच नसते.
माजी आमदार संजयमामांवर टिका टिप्पणी करण्यातच विरोधक धन्यता मानत आहेत . त्यांनी कारखाना कसा चालू करणार ? त्या करीता निधीची उभारणी कशी करणार ? अर्थसहाय्य कोण करणार ? सभासदांना अधिक दर मिळावा यासाठी काय उपाययोजना करणार ? हे आजपर्यंत एकाही भाषणात जाहीर केलेले नाही.विरोधी आघाडीत उमेदवार असलेल्या लोकांनीच आजपर्यंत सर्व सामान्य सभासदांना वेगवेगळया माध्यमातुन किती त्रास दिला आहे हे सभासद स्पष्टपणे सांगत आहेत. सर्व पर्याय संपल्यामुळेच माजी आमदार संजयमामांचे नेतृत्वाला जनाधार मिळत आहे. बरेच लोक विधानसभेची झालेली चूक सुधारून मामांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहात आहेत. त्यामुळे आदिनाथ साखर कारखान्यावर परिवर्तन अटळ आहे असे मत शिंदे गटाचे प्रवक्ते ॲड. अजित विघ्ने यांनी मांडले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

अखंड हिंदुस्तानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त १९ फेब्रुवारीला करमाळ्यात भव्य रक्तदान शिबीर

करमाळा प्रतिनिधी: अखंड हिंदुस्तानचे दैवत म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त करमाळा शहरात…

6 hours ago

जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना; १ मार्च रोजी पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी होणार-पृथ्वीराज पाटील

करमाळा प्रतिनिधी: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात…

10 hours ago

बार्शीचे मा.आमदार राजाभाऊ राऊत यांना विधानपरिषदेवर संधी द्यावी – माजी आमदार जयवंतराव जगताप

करमाळा प्रतिनिधी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी आपण…

15 hours ago

डिजिटल मिडिया पत्रकार संपादक संघटनेचे अध्यक्ष राजा माने यांना दुबईत “पत्रकाररत्न” आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मान

* करमाळा प्रतिनिधी डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे संस्थापक महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री. राजा माने…

22 hours ago

यशवंत परिवाराच्या वतीने स्व. अर्जुन तात्या फंड सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली

करमाळा प्रतिनिधी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांचे वडील, कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे…

1 day ago

विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांना पितृशोक; अर्जुन तात्या फंड सर यांचे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी: विद्या विकास मंडळचे अध्यक्ष तथा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांशी संबंधित नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालयाचे…

1 day ago