आदिनाथ सहकारी साखर कारखाना यशस्वीपणे चालवण्यासाठी प्रा. रामदास झोळ सर ‌ यांच्या ‌ शेतकरी विकास पॅनलला विजयी करा-मा.खा.राजु शेट्टी

करमाळा प्रतिनिधी आदिनाथ सहकारी साखर कारखाना चालवण्यासाठी प्राध्यापक रामदास झोळ सर ‌ यांच्या ‌ शेतकरी विकास पॅनलला विजयी करा असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मा. खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले. .प्रस्थापित पुढारी नवनिर्माण करणाऱ्या नव्या लोकांना येण्यास विरोध करत असल्यामुळे सध्याच्या राजकीय परिस्थितीत सहकारी साखर कारखान्याची अवस्था बिकट झाली असल्याचे त्यांनी सांगितले . आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या पत्रकार परिषदेला दत्तकाला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पॅनलचे प्रमुख प्राध्यापक रामदास झोळ सर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी पाटील, उपाध्यक्ष रवींद्र गोडगे, तालुकाध्यक्ष सुदर्शन शेळके उपाध्यक्ष सुहास काळे पाटील, बापूराव गायकवाड उपस्थित होते. पुढे बोलताना ते म्हणाले की महाराष्ट्रामध्ये एकूण 200 सहकारी साखर कारखाने होते त्यापैकी जवळजवळ शंभर कारखाने खाजगी झाले आहेत म्हणजे प्रस्थापित पुढाऱ्यांनी आपल्या बगलबच्चांना निवडणूक लढवायला लावून ते कारखाने चालवायला घेऊन विकत घेतले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र महाराष्ट्र  राज्यातील सहकारी साखर कारखानदारी मोडकळी आली असून सर्वसामान्य शेतकरी ऊसतोड कामगार यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने सहकार टिकवायचा असेल आणि साखर कारखानदारी वाचवायची असेल तर नव्या पर्यायाचा विचार करून आपल्यासाठी लढणारा आपला स्वाभिमान जपणारा   नेताच खऱ्या अर्थाने कारखाना वाचवु शकतो. त्यामुळे प्राध्यापक रामदास झोळ सर हे खऱ्या अर्थाने सर्व सामान्य शेतकऱ्याची न्याय देणारे खंबीर नेतृत्व असून त्यांच्याकडे सहकारी साखर कारखाना चालवण्यासाठी योग्य दृष्टिकोन व नियोजन नियोजन आहे.शेतकरी सभासद यांच्या पाठबळावर त्यांचा विजय निश्चित आहे.त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने त्यांना पाठिंबा दिला असून आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये प्राध्यापक रामदास झोळ यांच्या नेतृत्वाखाली सर्व पॅनलला विजयी करावे त्यांना आपण विजयी केल्यास आदिनाथ कारखान्याला नक्कीच गतवैभव मिळवून देऊन शेतकरी ऊसतोड कामगार कर्मचारी यांचे कल्याण करणार असल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष  मा.खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.

saptahikpawanputra

Recent Posts

समाजकारणातून राजकारणात यशस्वी वाटचाल करणाऱ्या सावंत कुटुंबाचे करमाळा तालुक्याच्या विकासासाठी महत्वपुर्ण योगदान -आमदार नारायण आबा पाटील

करमाळा प्रतिनिधी समाजकारणातून राजकारणात यशस्वी वाटचाल करणाऱ्या सावंत गटाचे करमाळा तालुक्याच्या विकासासाठी योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे…

19 hours ago

आमदार नारायण आबा पाटील यांच्या प्रयत्नातून आता आणखी पाच एस टी बस करमाळा आगारात दाखल होणार

करमाळा प्रतिनिधी आमदार नारायण आबा पाटील यांनी नामदार प्रताप सरनाईक यांचेकडे करमाळा आगारासाठी एकुण वीस…

1 day ago

श्री आदिनाथ साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अथवा व्हाईस चेअरमनपदी जेष्ठ संचालक डॉ. हरिदास केवारे यांची निवड करण्याची मागणी

करमाळा प्रतिनिधी श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये सोसायटी मतदारसंघातून डॉक्टर हरिदास केवारे यांची सहाव्या…

2 days ago

प्रहारचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या विचाराने प्रेरित होऊन निंभोरेत महिला आरोग्य शिबीर संपन्न

करमाळा प्रतिनिधी प्रहार जनशक्ती पक्ष करमाळा,यशश्री हॉस्पिटल कंदर व आरोग्यवर्धीनी केंद्र व ग्रामपंचायत निंभोरे यांच्या…

2 days ago

नूतन पोलीस निरीक्षक रणजीत माने साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा पोलीस ठाणेची दमदार कामगिरी सुमारे २ लाख ५८ हजार २५० रुपये किंमतीचा १० किलो गांजा जप्त

करमाळा प्रतिनिधी नूतन पोलीस निरीक्षक रंणजीत माने साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा पोलीस ठाणेची दमदार कामगिरी…

3 days ago

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये स्वच्छता अभियानाचा शुभारंभ

करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शंभर दिवसाच्या विकास आराखडा अंतर्गत मुख्यमंत्री कृषी उत्पन्न…

3 days ago