आदिनाथ सहकारी साखर कारखाना यशस्वीपणे चालवण्यासाठी प्रा. रामदास झोळ सर ‌ यांच्या ‌ शेतकरी विकास पॅनलला विजयी करा-मा.खा.राजु शेट्टी

करमाळा प्रतिनिधी आदिनाथ सहकारी साखर कारखाना चालवण्यासाठी प्राध्यापक रामदास झोळ सर ‌ यांच्या ‌ शेतकरी विकास पॅनलला विजयी करा असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मा. खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले. .प्रस्थापित पुढारी नवनिर्माण करणाऱ्या नव्या लोकांना येण्यास विरोध करत असल्यामुळे सध्याच्या राजकीय परिस्थितीत सहकारी साखर कारखान्याची अवस्था बिकट झाली असल्याचे त्यांनी सांगितले . आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या पत्रकार परिषदेला दत्तकाला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पॅनलचे प्रमुख प्राध्यापक रामदास झोळ सर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी पाटील, उपाध्यक्ष रवींद्र गोडगे, तालुकाध्यक्ष सुदर्शन शेळके उपाध्यक्ष सुहास काळे पाटील, बापूराव गायकवाड उपस्थित होते. पुढे बोलताना ते म्हणाले की महाराष्ट्रामध्ये एकूण 200 सहकारी साखर कारखाने होते त्यापैकी जवळजवळ शंभर कारखाने खाजगी झाले आहेत म्हणजे प्रस्थापित पुढाऱ्यांनी आपल्या बगलबच्चांना निवडणूक लढवायला लावून ते कारखाने चालवायला घेऊन विकत घेतले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र महाराष्ट्र  राज्यातील सहकारी साखर कारखानदारी मोडकळी आली असून सर्वसामान्य शेतकरी ऊसतोड कामगार यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने सहकार टिकवायचा असेल आणि साखर कारखानदारी वाचवायची असेल तर नव्या पर्यायाचा विचार करून आपल्यासाठी लढणारा आपला स्वाभिमान जपणारा   नेताच खऱ्या अर्थाने कारखाना वाचवु शकतो. त्यामुळे प्राध्यापक रामदास झोळ सर हे खऱ्या अर्थाने सर्व सामान्य शेतकऱ्याची न्याय देणारे खंबीर नेतृत्व असून त्यांच्याकडे सहकारी साखर कारखाना चालवण्यासाठी योग्य दृष्टिकोन व नियोजन नियोजन आहे.शेतकरी सभासद यांच्या पाठबळावर त्यांचा विजय निश्चित आहे.त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने त्यांना पाठिंबा दिला असून आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये प्राध्यापक रामदास झोळ यांच्या नेतृत्वाखाली सर्व पॅनलला विजयी करावे त्यांना आपण विजयी केल्यास आदिनाथ कारखान्याला नक्कीच गतवैभव मिळवून देऊन शेतकरी ऊसतोड कामगार कर्मचारी यांचे कल्याण करणार असल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष  मा.खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.

saptahikpawanputra

Recent Posts

अखंड हिंदुस्तानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त १९ फेब्रुवारीला करमाळ्यात भव्य रक्तदान शिबीर

करमाळा प्रतिनिधी: अखंड हिंदुस्तानचे दैवत म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त करमाळा शहरात…

6 hours ago

जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना; १ मार्च रोजी पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी होणार-पृथ्वीराज पाटील

करमाळा प्रतिनिधी: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात…

10 hours ago

बार्शीचे मा.आमदार राजाभाऊ राऊत यांना विधानपरिषदेवर संधी द्यावी – माजी आमदार जयवंतराव जगताप

करमाळा प्रतिनिधी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी आपण…

16 hours ago

डिजिटल मिडिया पत्रकार संपादक संघटनेचे अध्यक्ष राजा माने यांना दुबईत “पत्रकाररत्न” आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मान

* करमाळा प्रतिनिधी डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे संस्थापक महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री. राजा माने…

22 hours ago

यशवंत परिवाराच्या वतीने स्व. अर्जुन तात्या फंड सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली

करमाळा प्रतिनिधी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांचे वडील, कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे…

1 day ago

विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांना पितृशोक; अर्जुन तात्या फंड सर यांचे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी: विद्या विकास मंडळचे अध्यक्ष तथा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांशी संबंधित नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालयाचे…

2 days ago