Categories: Uncategorized

आदिनाथ”च्या सभासदांनो डोळसपणे निर्णय घ्या… माजी.आ.संजयमामा शिंदे यांचे सभासदांना आवाहन.


करमाळा प्रतिनिधी
आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या रणधुमाळीत प्रचारादरम्यान दोन्ही गटांकडून दररोज एकमेकांवरती नवनवीन आरोप प्रत्यारोप केले जात आहेत.यामुळे सभासद शेतकरी हे मात्र संभ्रमित अवस्थेत आहेत.नेमका विश्वास कोणावर ठेवायचा असा गोंधळ निर्माण झालेल्या शेतकऱ्यांना आवाहन करताना माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी सभासदांनों डोळसपणे निर्णय घ्या व कारखाना चालू करण्याची कुवत व क्षमता कोणामध्ये आहे हे ओळखा.आपले अनमोल मत कारखान्याला उर्जित अवस्था प्राप्त करून देईल असे सांगतानाच आदिनाथच्या निवडणुकी पाठीमागे मोहिते पाटलांचे मोठे अर्थकारण व राजकारण असल्याची टीका शिंदे यांनी केली.
याविषयी बोलताना ते म्हणाले की,
विठ्ठलराव शिंदे ,पांडुरंग, सहकार महर्षी ,आदिनाथ हे सर्व उजनीच्या पाण्यामुळे अस्तित्वात आलेले साखर कारखाने आहेत.पण आज ह्या सर्वांमध्ये फरक पडला आहे हे आपण सर्वजण पाहत आहोत. मोहिते पाटलांचा सहकारमहर्षीचा दर हा शिंदे परिचारकांच्या कारखान्यापेक्षा कायम टनाला ३०० रुपयांनी कमी आहे.या कारणांमुळे आज माळशिरस तालुक्यात मोहिते पाटलांच्या कारखान्याला ऊस घालण्याची लोकांची मानसिकता राहिलेली नाही.त्यामुळे त्या कारखान्याचे गाळप सुद्धा दिवसेंदिवस कमी होत आहे.त्यासाठी आता त्यांना नवीन बाजारपेठ शोधायची आहे. म्हणून त्यांनी आपला करमाळा तालुक्यातील त्यांचा चेला असणाऱ्या विद्यमान आमदाराला पुढे करून आदिनाथ ताब्यात घेण्याचे मनसुबे आखले आहेत.
जेणेकरून आदिनाथ चालणारच नाही आणि चालू करण्याचा प्रयत्न झाला परंतु गाळप होऊ शकले नाही तर आदिनाथ तर्फे सहकारमहर्षी असा ऊस पाठवायचा.विद्यमान आमदाराकडे एक टिपरू गाळप करण्यासाठी साधे गुराळ सुद्धा नाही आणि मग कार्यकर्त्यांचे ऊस घालण्यासाठी ते सहकार महर्षीच्या वळचणीला आदिनाथ कारखाना बांधतील. मुळातच अडचणीत असलेला सहकार महर्षी कारखाना शेतकऱ्यांना उच्चांकी दर देऊ शकणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होईल. आदिनाथ ची निवडणूक दिसते तेवढी साधी ,सोपी, सरळ नाही त्यामागे फार मोठे राजकारण आणि अर्थकारण शिजत आहे. मोहिते पाटलांकडून माढा,पंढरपूर,माळशिरस या तीन तालुक्यांमध्ये गाढवाचा नांगर फिरवून झालेला आहे .आता त्यांची वाकडी नजर करमाळ्यावर पडलेली आहे.आणि ही सर्व सेना आपल्या करमाळ्यावर गाढवाचा नांगर फिरवण्यासाठी सज्ज झालेली आहे.त्यामुळे सभासदांनों सुज्ञ पणे विचार करून डोळस निर्णय घ्या असे आवाहन त्यांनी केले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

श्रीजगदंबा कमलादेवी मंदिराच्या जतन संवर्धनासाठी भाविकांचा वाढता प्रतिसाद; विकास चौकटे यांची ₹३,००१ देणगी

करमाळा (प्रतिनिधी) – करमाळा येथील ग्रामदैवत श्रीजगदंबा कमलादेवी मंदिराच्या जतन व संवर्धनाच्या कामाला भाविकांचा उत्स्फूर्त…

7 hours ago

संजय गांधी निराधार योजनेची प्रकरने चार महिन्यापासून मंजूर झाली नाहीत तत्काळ मंजूर करा अन्यथा आंदोलन करू – राजाभाऊ कदम

करमाळा प्रतिनिधी : संजय गांधी निराधार योजनेची प्रकरणे मार्च महिन्यामध्ये मंजूर झाली होती त्यानंतर चार…

8 hours ago

ग्रामीण विद्यार्थ्यांच्या इंग्रजी अभिव्यक्तीला जिल्हास्तरीय व्यासपीठ* *लोकशिक्षिका स्व. लीलाताई दिवेकर यांच्या स्मरणार्थ करमाळ्यात उद्या वक्तृत्व स्पर्धा

करमाळा प्रतिनिधी भाषा ही केवळ परीक्षेतील गुणांची बाब नसून विद्यार्थ्यांच्या विचारांना आकार देणारे आणि जगाशी…

1 day ago

मानव एकता दिनानिमित्त संत निरंकारी मंडळाच्या शिबीरात १६६ जणांचे रक्तदान*

करमाळा प्रतिनिधी - मानव एकता दिनानिमित्त संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन दिल्ली शाखा करमाळा यांचे वतीने…

2 days ago

जयकुमार गोरे यांच्यावरील आक्षेपार्ह वक्तव्याचा करमाळ्यात भाजपकडून तीव्र निषेध

  करमाळा प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.…

3 days ago

नाशवंत गोष्टीकडे दुर्लक्ष करून शाश्वत गोष्टी लक्षात घेवून युवकांनी समाजकारण व राजकारणातून जनतेची सेवा करावी . – मा .आ जयवंतराव जगताप

करमाळा प्रतिनिधी दिग्वीजय बागल यांची ' मूख्यमंत्री बळीराजा पाणंद/ शेत रस्ता समिती च्या करमाळा विधानसभा…

3 days ago