Categories: Uncategorized

पाटबंधारे विभागाची गळचेपी भूमिका शेतकऱ्यांच्या मुळावर ! भरत आवताडे यांचा तीव्र आंदोलनाचा इशारा.


करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील 24 गावांची वरदायीनी असलेल्या दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या अपूर्ण कामांसाठी तत्कालीन आमदार संजयमामा शिंदे यांनी 116 कोटी निधी मंजूर करून आणून त्याचे काम डिसेंबर 2023 मध्ये सुरू केलेले होते, परंतु नोव्हेंबर 2024 रोजी करमाळा तालुक्यात सत्तांतर झाले आणि त्यानंतर दहिगाव योजनेचे सुरू असलेले काम जानेवारी 2025 मध्ये बंद पडले. हे बंद पडलेले काम सुरू करावे या मागणीसाठी आपण पाटबंधारे विभागाला रीतसर पत्र दिले होते.काम सुरू न झाल्यास आपण जनआंदोलन उभे करू असा इशाराही दिलेला होता.परंतु पाटबंधारे विभाग याविषयी गळचेपी भूमिका घेत असल्यामुळे शेतकरी उध्वस्त होण्याची वेळ आलेली आहे.
जानेवारी 2025 मध्ये बंद पडलेले दहिगाव योजनेचे काम एप्रिल 2025 अखेर सुरू झाले,परंतु हे काम पुन्हा एकाच दिवसात जेऊरच्या गावगुंडांनी येऊन बंद केले.यासंदर्भात पाटबंधारे विभाग, करमाळा पोलीस स्टेशन या सर्वांना कल्पना आहे.कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक यांचे सूचनेनुसार पोलिसांनी काम बंद पडलेल्या ठिकाणी जाऊन माहितीही घेतली परंतु दुर्दैवाने गुन्हा दाखल करण्यासाठी एकही कर्मचारी पुढे येत नाही. यापूर्वी जळीत पाईप प्रकरणात अज्ञातावरती गुन्हा दाखल केलेला होता असे असतानाही संबंधित गुन्हा दाखल करणारावरती प्रचंड दहशत दाखवली गेली. काम बंद पाडणारे गावगुंडांची नावे निष्पन्न झालेली आहेत ती पोलिसांकडे सुद्धा दिलेली आहेत .परंतु पाटबंधारे विभाग याविषयी तक्रार करायला पुढे येत नाही त्यामुळेच सरकारी कामात अडथळा म्हणून गुन्हा दाखल होत नाही याचाच गैरफायदा लोकप्रतिनिधीने पोसलेले गावगुंड घेत आहेत. त्यामुळे येत्या 16 मे रोजी अर्जुननगर फाटा येथे सकाळी 10 वाजता आपण रास्ता रोको आंदोलन करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष भरत भाऊ आवताडे यांनी दिली आहे.

चौकट –
MH 42 Q 3141 या गाडीतून 6 गावगुंड आले व त्यांनी दहिगाव उपसा सिंचन योजनेची डावी वितरिका क्र.1 चे पांडे हद्दीत सबस्टेशन लगत सुरू असलेले काम 26 एप्रिल रोजी बंद पाडले. पोलीस पाहणी करून गेले. त्यांना गाडी नंबर व गाडीतील दोघांची ओळख पटलेली नावे दिलेली आहेत. परंतु पाटबंधारे विभाग मात्र गुन्हा दाखल करण्यासाठी पुढे यायला तयार नाही.पाटबंधारे विभागाची हीच गळचेपी भूमिका शेतकऱ्यांना देशोधडीला लावत आहे.
– एस.बी.बिचितकर.कंत्राटदार प्रतिनिधी.

saptahikpawanputra

Recent Posts

जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना; १ मार्च रोजी पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी होणार-पृथ्वीराज पाटील

करमाळा प्रतिनिधी: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जेऊर येथे शिवजन्मोत्सव समितीची स्थापना उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात…

3 hours ago

बार्शीचे मा.आमदार राजाभाऊ राऊत यांना विधानपरिषदेवर संधी द्यावी – माजी आमदार जयवंतराव जगताप

करमाळा प्रतिनिधी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी आपण…

8 hours ago

डिजिटल मिडिया पत्रकार संपादक संघटनेचे अध्यक्ष राजा माने यांना दुबईत “पत्रकाररत्न” आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मान

* करमाळा प्रतिनिधी डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे संस्थापक महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री. राजा माने…

15 hours ago

यशवंत परिवाराच्या वतीने स्व. अर्जुन तात्या फंड सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली

करमाळा प्रतिनिधी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांचे वडील, कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे…

1 day ago

विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांना पितृशोक; अर्जुन तात्या फंड सर यांचे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी: विद्या विकास मंडळचे अध्यक्ष तथा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांशी संबंधित नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालयाचे…

1 day ago

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात बारावीची परीक्षा उत्साहात; ११०४ विद्यार्थी केंद्रावर परीक्षार्थी

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील विद्या विकास मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व…

2 days ago