Categories: Uncategorized

माझ्या इतकी वीजेची कामे दुसऱ्या कोणी केली नाहीत, तालुक्यातील शेतकऱ्यांना वीजेची कमतरता भासू देणार नाही-आमदार नारायण आबा पाटील

करमाळा प्रतिनिधी माझ्या इतकी वीजेची कामे दुसऱ्या कोणी केली नाहीत, तालुक्यातील शेतकऱ्यांना वीजेची कमतरता भासू देणार नाही असे ठाम प्रतिपादन करमाळा मतदार संघाचे विद्यमान आमदार नारायण आबा पाटील यांनी केले. शेटफळ (नागोबाचे) ता करमाळा येथील आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. शेटफळ येथील ३३/११ उपवीज केंद्राचे सक्षमीकरण करण्यासाठी येथे पाच एम व्ही क्षमतेचा अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर बसवणे कामाचे भूमिपूजन आमदार नारायण आबा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दशरथ बापू लबडे हे होते तर व्यासपीठावर आदिनाथ माजी संचालक धुळाभाऊ कोकरे, नुतन संचालक महादेव पोरे, दत्तात्रय देशमुख, हणुमंत सरडे,, राजाभाऊ कदम, श्रीमान चौधरी, रामेश्वर तळेकर तसेच चिखलठाणचे सरपंच विकास गलांडे, नामांकित किर्तनकार हभप विठ्ठल महाराज पाटील, भागवत गुंड, बाजार समिती संचालक दादासाहेब लबडे, उपसरपंच अजित नाईकनवरे, माजी उपसरपंच बाळासाहेब गुंड, जयनाथ पोळ, राजेंद्र नाईकनवरे, आण्णा लबडे, विलास आप्पा लबडे, हरीभाऊ सरकाळे, कैलास नाईकनवरे बाळासाहेब लबडे, बापू गुंड, महादेव गुंड, नागनाथ गुड़बाळासाहेब , युवराज नाईकनवरे, बन्सीमामा चोरगे, सोपान काका निंबाळकर, सोमनाथ गुंड, बाबू गुंड,, नवनाथ गुटाळ, नागनाथ साबळे, कालीदास नलवडे, महाराष्ट्र राज्य रोप वे मल्लखांब असोसिएशन सचिव पांडुरंग वाघमारे सर आदि उपस्थित होते.यावेळी बोलताना आमदार नारायण आबा पाटील यांनी सांगितले की कृषी पंपाच्या वीज कनेक्शन साठी आता डिपी दिले जात नाहीत, सोलरचा पर्याय शेतकऱ्यांना उपलब्ध करुन दिला जातोय. परंतू सोलरच्या माध्यमातून वीजेसाठी शेतकरी स्वावलंबी होईलच असे नाही. ज्याच्या त्याच्या क्षेत्र गणतीनुसार वीजेची मागणी चालूच राहणार आहे. येत्या काही दिवसांत दहिगाव व लव्हे येथेही पाच एम व्ही क्षमतेचे अतिरिक्त फिडर बसवले जाणार आहेत. वांगी १ येथेही लवकरच पाच एम व्हीचा आणखी एक फिडर कार्यान्वित होईल. कुंभेज येथील नियोजित मंजुर असलेल्या ३३/११ उपवीज केंद्राची जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आता पुढील उभारणीचे कामही लवकरच सुरू होईल. ढोकरी येथेही ३३/११ उपवीज केंद्राची उभारणी होईल. यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे वीजेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आपण खंबीर असल्याने आमदार नारायण आबा पाटील यांनी बोलून दाखवले. प्रास्ताविक आमदार पाटील गटाचे प्रवक्ते सूनील तळेकर यांनी केले. तर यावेळी हभप विठ्ठल महाराज, संचालक राजाभाऊ कदम, सरपंच विकास गलांडे आदिंची भाषणे झाली. उपस्थितांचे आभार उपसरपंच आनंद नाईकनवरे यांनी मानले.

saptahikpawanputra

Recent Posts

श्रीजगदंबा कमलादेवी मंदिराच्या जतन संवर्धनासाठी भाविकांचा वाढता प्रतिसाद; विकास चौकटे यांची ₹३,००१ देणगी

करमाळा (प्रतिनिधी) – करमाळा येथील ग्रामदैवत श्रीजगदंबा कमलादेवी मंदिराच्या जतन व संवर्धनाच्या कामाला भाविकांचा उत्स्फूर्त…

5 hours ago

संजय गांधी निराधार योजनेची प्रकरने चार महिन्यापासून मंजूर झाली नाहीत तत्काळ मंजूर करा अन्यथा आंदोलन करू – राजाभाऊ कदम

करमाळा प्रतिनिधी : संजय गांधी निराधार योजनेची प्रकरणे मार्च महिन्यामध्ये मंजूर झाली होती त्यानंतर चार…

6 hours ago

ग्रामीण विद्यार्थ्यांच्या इंग्रजी अभिव्यक्तीला जिल्हास्तरीय व्यासपीठ* *लोकशिक्षिका स्व. लीलाताई दिवेकर यांच्या स्मरणार्थ करमाळ्यात उद्या वक्तृत्व स्पर्धा

करमाळा प्रतिनिधी भाषा ही केवळ परीक्षेतील गुणांची बाब नसून विद्यार्थ्यांच्या विचारांना आकार देणारे आणि जगाशी…

1 day ago

मानव एकता दिनानिमित्त संत निरंकारी मंडळाच्या शिबीरात १६६ जणांचे रक्तदान*

करमाळा प्रतिनिधी - मानव एकता दिनानिमित्त संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन दिल्ली शाखा करमाळा यांचे वतीने…

2 days ago

जयकुमार गोरे यांच्यावरील आक्षेपार्ह वक्तव्याचा करमाळ्यात भाजपकडून तीव्र निषेध

  करमाळा प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.…

3 days ago

नाशवंत गोष्टीकडे दुर्लक्ष करून शाश्वत गोष्टी लक्षात घेवून युवकांनी समाजकारण व राजकारणातून जनतेची सेवा करावी . – मा .आ जयवंतराव जगताप

करमाळा प्रतिनिधी दिग्वीजय बागल यांची ' मूख्यमंत्री बळीराजा पाणंद/ शेत रस्ता समिती च्या करमाळा विधानसभा…

3 days ago