Categories: Uncategorized

माझ्या इतकी वीजेची कामे दुसऱ्या कोणी केली नाहीत, तालुक्यातील शेतकऱ्यांना वीजेची कमतरता भासू देणार नाही-आमदार नारायण आबा पाटील

करमाळा प्रतिनिधी माझ्या इतकी वीजेची कामे दुसऱ्या कोणी केली नाहीत, तालुक्यातील शेतकऱ्यांना वीजेची कमतरता भासू देणार नाही असे ठाम प्रतिपादन करमाळा मतदार संघाचे विद्यमान आमदार नारायण आबा पाटील यांनी केले. शेटफळ (नागोबाचे) ता करमाळा येथील आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. शेटफळ येथील ३३/११ उपवीज केंद्राचे सक्षमीकरण करण्यासाठी येथे पाच एम व्ही क्षमतेचा अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर बसवणे कामाचे भूमिपूजन आमदार नारायण आबा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दशरथ बापू लबडे हे होते तर व्यासपीठावर आदिनाथ माजी संचालक धुळाभाऊ कोकरे, नुतन संचालक महादेव पोरे, दत्तात्रय देशमुख, हणुमंत सरडे,, राजाभाऊ कदम, श्रीमान चौधरी, रामेश्वर तळेकर तसेच चिखलठाणचे सरपंच विकास गलांडे, नामांकित किर्तनकार हभप विठ्ठल महाराज पाटील, भागवत गुंड, बाजार समिती संचालक दादासाहेब लबडे, उपसरपंच अजित नाईकनवरे, माजी उपसरपंच बाळासाहेब गुंड, जयनाथ पोळ, राजेंद्र नाईकनवरे, आण्णा लबडे, विलास आप्पा लबडे, हरीभाऊ सरकाळे, कैलास नाईकनवरे बाळासाहेब लबडे, बापू गुंड, महादेव गुंड, नागनाथ गुड़बाळासाहेब , युवराज नाईकनवरे, बन्सीमामा चोरगे, सोपान काका निंबाळकर, सोमनाथ गुंड, बाबू गुंड,, नवनाथ गुटाळ, नागनाथ साबळे, कालीदास नलवडे, महाराष्ट्र राज्य रोप वे मल्लखांब असोसिएशन सचिव पांडुरंग वाघमारे सर आदि उपस्थित होते.यावेळी बोलताना आमदार नारायण आबा पाटील यांनी सांगितले की कृषी पंपाच्या वीज कनेक्शन साठी आता डिपी दिले जात नाहीत, सोलरचा पर्याय शेतकऱ्यांना उपलब्ध करुन दिला जातोय. परंतू सोलरच्या माध्यमातून वीजेसाठी शेतकरी स्वावलंबी होईलच असे नाही. ज्याच्या त्याच्या क्षेत्र गणतीनुसार वीजेची मागणी चालूच राहणार आहे. येत्या काही दिवसांत दहिगाव व लव्हे येथेही पाच एम व्ही क्षमतेचे अतिरिक्त फिडर बसवले जाणार आहेत. वांगी १ येथेही लवकरच पाच एम व्हीचा आणखी एक फिडर कार्यान्वित होईल. कुंभेज येथील नियोजित मंजुर असलेल्या ३३/११ उपवीज केंद्राची जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आता पुढील उभारणीचे कामही लवकरच सुरू होईल. ढोकरी येथेही ३३/११ उपवीज केंद्राची उभारणी होईल. यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे वीजेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आपण खंबीर असल्याने आमदार नारायण आबा पाटील यांनी बोलून दाखवले. प्रास्ताविक आमदार पाटील गटाचे प्रवक्ते सूनील तळेकर यांनी केले. तर यावेळी हभप विठ्ठल महाराज, संचालक राजाभाऊ कदम, सरपंच विकास गलांडे आदिंची भाषणे झाली. उपस्थितांचे आभार उपसरपंच आनंद नाईकनवरे यांनी मानले.

saptahikpawanputra

Recent Posts

नेरले–गौंडरे परिसराला दिलासा; करमाळा–कुर्डूवाडी एसटी सेवा पुन्हा सुरू- औदुंबरराजे भोसले

करमाळा, प्रतिनिधी दि. १५ जून : अनेक दिवसांपासून बंद असलेली करमाळा–कुर्डूवाडी–नेरले मार्गावरील एसटी बससेवा सोमवारपासून…

50 mins ago

निंभोरे ग्रामपंचायतीचा अभिनव उपक्रम : पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची घरपट्टी भरणार -सरपंच रविंद्र वळेकर

करमाळा प्रतिनिधी निंभोरे, ता. करमाळा : जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी आणि शासकीय शिक्षणाला…

1 hour ago

वाढदिवसाचा अनोखा उत्सव आकाश चिवटे यांच्याकडून १५० झाडांचे वृक्षारोपण; पर्यावरण संवर्धनाचा दिला प्रेरणादायी संदेश

" करमाळा प्रतिनिधी : आजच्या धावपळीच्या युगात वाढदिवस साजरा करण्यासाठी मोठमोठे कार्यक्रम, केक कापणे, फटाक्यांची…

2 days ago

करमाळा पोस्ट ऑफिसमध्ये १३ जुन रोजी‘आधार मेळावा नागरिकांनी संधीचा लाभ घ्यावा – उदय बंडगर

करमाळा, प्रतिनिधी :  करमाळा पोस्ट ऑफिसमध्ये  १३  जुनं रोजी आधार मेळावा  आयोजित केला असुन नागरिकांनी…

3 days ago

ब्राह्मण समाजाच्या संघटनासाठी केम येथे मेळावा; तरुणांनी समाज विकासासाठी पुढाकार घ्यावा – संतोष काका कुलकर्णी

करमाळा प्रतिनिधी केम (ता. करमाळा) : अल्पसंख्यांक व विखुरलेल्या ब्राह्मण समाजाने एकत्र येऊन संघटित व्हावे,…

3 days ago