Categories: Uncategorized

रक्षाबंधनचा धागा म्हणजे बहिणीचे प्रेम माया खऱ्या अर्थाने हीच खरी बहिणीची माया आपल्या सैनिकांना ऊर्जा देणारी ठरणार-माजी सैनिक अशोक शिंदे

करमाळा प्रतिनिधी 
रक्षाबंधनचा धागा म्हणजे हा केवळ धागा नसून या धाग्यामध्ये बहिणीचे प्रेम माया जिव्हाळा लपलेली आहे खऱ्या अर्थाने हीच खरी बहिणीची माया आपल्या सैनिकांना ऊर्जा देणारी ठरणार आहे. माजी सैनिक अशोक शिंदे माजी सैनिक अआपल्या माय भूमीतील राखी सैनिकां चे मनोबल ही वाढवणारी आहे अशी भावना माजी सैनिक श्री अशोक शिंदे यांनीपंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय, रावगाव येथे ‘राखी फॉर नेशन’ या राष्ट्रभक्तीने प्रेरित उपक्रम वेळी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री विजय कोळेकर हे होते.यावेळी ते म्हणाले की मातृभूमीसाठी सदैव तत्पर असणारे सैनिक ऊन वारा पाऊस अशा कोणत्याही गोष्टीची परवा न करता देशासाठी आपले कर्तव्य डोळ्यात तेल घालून बजावत असतात त्यांचा सन्मान करणे हे सर्व भारतीयांचे कर्तव्य आहेच सैनिकामुळेच आपण सुरक्षित आहोत यामध्ये रक्षाबंधन सारखे उत्सव म्हणजेच परिवारामधील नात्यांचा अनोखा संगम मानले तर वावगं ठरणार नाही. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर विद्यालयातर्फे जवानांप्रती कृतज्ञता आणि प्रेम व्यक्त करण्याच्या उद्देशाने शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वतःहून तयार केलेल्या राख्या आज थेट सीमारेषेवरील वीर जवानांसाठी पाठवण्यात आल्या..या कार्यक्रमाला माजी सैनिक श्री. अशोक शिंदे यांच्यासह पत्रकार प्राध्यापक श्री. राजेश गायकवाड, करमाळा तालुका डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे अध्यक्ष श्री दिनेश मडके, तालुका सचिव श्री. नरेंद्रसिंह ठाकूर तालुका संघटक. तुषार जाधव यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.कार्यक्रमावेळी पत्रकार बांधवांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले की, “देशासाठी अहोरात्र झटणाऱ्या जवानांविषयी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणारी ही भावना म्हणजेच शिक्षणाचा खरा उद्देश आहे. ‘राखी फॉर नेशन’ सारखे उपक्रम केवळ सामाजिक जाणीव नव्हे, तर विद्यार्थ्यांमध्ये देशसेवेची प्रेरणा जागवणारे असतात.”
त्यांनी शाळेच्या पुढाकाराचे व कार्यपद्धतीचे विशेष कौतुक करत असे उपक्रम ग्रामीण भागात घडत असल्यानेच शिक्षण क्षेत्रात खऱ्या अर्थाने बदल घडतो, असे गौरवोद्गार काढले. यावेळीशेवटी उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते जमा केलेल्या राख्या सीमेवरील जवानांसाठी कृतज्ञतेच्या आणि प्रेमाच्या संदेशासह सुपूर्द करण्यात आल्या.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री विजय कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली भाऊसाहेब सरडे, किरण परदेशी, हनुमंत रासकर, प्रताप बरडे, विलास पाटील, विशाल राठोड, रमेश मोरे, सुहास कानगुडे, सुरेश बरडे, दादा कांबळे आदींनी परिश्रम घेतले.

saptahikpawanputra

Recent Posts

बार्शीचे मा.आमदार राजाभाऊ राऊत यांना विधानपरिषदेवर संधी द्यावी – माजी आमदार जयवंतराव जगताप

करमाळा प्रतिनिधी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना विधान परिषदेवर संधी द्यावी अशी मागणी आपण…

5 hours ago

डिजिटल मिडिया पत्रकार संपादक संघटनेचे अध्यक्ष राजा माने यांना दुबईत “पत्रकाररत्न” आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मान

* करमाळा प्रतिनिधी डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे संस्थापक महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री. राजा माने…

11 hours ago

यशवंत परिवाराच्या वतीने स्व. अर्जुन तात्या फंड सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली

करमाळा प्रतिनिधी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांचे वडील, कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे…

21 hours ago

विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांना पितृशोक; अर्जुन तात्या फंड सर यांचे दुःखद निधन

करमाळा प्रतिनिधी: विद्या विकास मंडळचे अध्यक्ष तथा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांशी संबंधित नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालयाचे…

1 day ago

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात बारावीची परीक्षा उत्साहात; ११०४ विद्यार्थी केंद्रावर परीक्षार्थी

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील विद्या विकास मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व…

1 day ago

करमाळा शहर हद्दवाढीची भाजप नगरसेविका सौ. स्वाती महादेव फंड यांची मागणी; व्होटकर पुल–श्रीदेवीचामाळ रस्ता नगरपरिषदेकडे देण्याचा प्रस्ताव*

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहराची हद्दवाढ करून शहरालगत विकसित झालेल्या ग्रामीण भागाचा नगरपरिषदेच्या हद्दीत समावेश…

2 days ago