करमाळा प्रतिनिधी : मंगळवार दिनांक 19 ऑगस्ट रोजी ठीक सकाळी अकरा वाजता शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे माजी आमदार बच्चू भाऊ कडू यांच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी शेतकऱ्यांचा जन आक्रोश मोर्चा निघणार आहे मोर्चेकर्यांच्या मागण्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करून सातबारा कोरा करा,केळी रोपे कंपनीच्या किमतीपेक्षा दुप्पट तिप्पट किमतीने शेतकऱ्यांना विकणाऱ्या एजंट वरती कारवाई करून कंपनीच्या किमतीतच शेतकऱ्यांना रोपे मिळावीत,
पात्र केशरी रेशन कार्ड धारकांना अन्नसुरक्षा योजनेमध्ये समाविष्ट करून धान्य मिळाले पाहिजे, रेशन कार्ड मध्ये नाव वाढविणे नाव कमी करणे हे अर्ज एक वर्षापासून पुरवठा विभागात पडून आहेत ही कामे लवकरात लवकर करा,
संजय गांधी योजनेचे पैसे कित्येक लाभार्थ्यांना सहा महिन्यापासून मिळालेले नाहीत ते लवकरात लवकर मिळावेत नवीन संजय गांधी चे प्रकरण मंजूर होऊन तीन महिने झाले त्यांना अध्याप पैसे मिळालेले नाहीत त्यांचे पैसे लवकरात लवकर मिळायला सुरू व्हावेत या सर्व मागण्या घेऊन बहुजन संघर्ष सेना मंगळवार दिनांक 19 ऑगस्ट 2025 रोजी ठीक सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा करमाळा येथून मोर्चाला सुरुवात करणार आहे तेव्हा सर्व नागरिकांनी मोर्चात सहभागी व्हावे असे आव्हान बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांनी केले आहे.
करमाळा, प्रतिनिधी : करमाळा येथील श्री संत नामदेव शिंपी समाजाच्या वतीने श्रीसंत नामदेव शिंपी महाराज…
करमाळा प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसचे करमाळा तालुकाध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य भरत (भाऊ) आवताडे यांच्या…
* करमाळा, प्रतिनिधी : करमाळा शहरातील शाहूनगर परिसरातील नागरिकांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या पाणीप्रश्नाच्या निराकरणाच्या दिशेने…
करमाळा (प्रतिनिधी) – करमाळा येथील ग्रामदैवत श्रीजगदंबा कमलादेवी मंदिराच्या जतन व संवर्धनाच्या कामाला भाविकांचा उत्स्फूर्त…
करमाळा प्रतिनिधी : संजय गांधी निराधार योजनेची प्रकरणे मार्च महिन्यामध्ये मंजूर झाली होती त्यानंतर चार…
करमाळा प्रतिनिधी भाषा ही केवळ परीक्षेतील गुणांची बाब नसून विद्यार्थ्यांच्या विचारांना आकार देणारे आणि जगाशी…