करमाळा(प्रतिनिधी) – सेंद्रिय खतांचा वापर करून विषमुक्त कृषी उत्पादन करणे हे भावी पिढ्यांच्या आरोग्यासाठी आणि जमिनींचा पोत सांभाळण्यासाठी गरजेचे असल्याचे प्रतिपादन तालुका कृषी अधिकारी राजेंद्र नेटके यांनी येथे बोलताना केले.
विजयराव पवार यांनी नव्याने सुरू केलेल्या श्री स्वामी समर्थ एग्रो या सेंद्रिय खतविक्री दुकानास त्यांनी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी त्यांचे व त्यांच्यासमवेत असलेल्या कृषी सहाय्यक उमाकांत जाधव यांचे स्वागत पवार दादा जमदाडे यांनी केले. राजेंद्र नेटके यांची करमाळा कृषी कार्यालयाचे प्रभारी म्हणून नुकतीच नियुक्ती झाल्याबद्दल यावेळी त्यांचा व जाधव यांचा पवार यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. नेटके यांनी विजय पवार यांच्या व्यवसायास शुभेच्छा दिल्या. यावेळी मकाईचे माजी संचालक विवेक येवले,हनुमंत भांडवलकर आदी उपस्थित होते.
करमाळा | प्रतिनिधी करमाळा तालुक्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे चिरंजीव शंभूराजे जगताप यांच्या नेतृत्वाखाली…
करमाळा प्रतिनिधी : अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील पाटेगाव येथील रहिवासी तसेच सामाजिक कार्यकर्ते व नगरसेवक…
करमाळा प्रतिनिधी वसंतराव नाईक कृषी संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणाऱ्या विविध कृषी…
करमाळा प्रतिनिधी पत्रकारांबाबत करण्यात आलेल्या कथित अपमानास्पद व धमकीवजा वक्तव्याचा तीव्र निषेध करत अखिल भारतीय…
* करमाळा प्रतिनिधी: वेगाने बदलणाऱ्या आधुनिक शिक्षण व्यवस्थेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मूल्याधिष्ठित व आध्यात्मिक…
करमाळा प्रतिनिधी आषाढी एकादशी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असून शहरातील सर्व मुख्य रस्त्यांची…